शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

Bhima Koragoan Case : आनंद तेलतुंबडें, गौतम नवलखा यांना 18 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 20:35 IST

Bhima Koragoan Case : बुधवारी त्यांनी विशेष न्यायालयात हजर केले असताना तपास अधिकारी दहा दिवसाच्या कोठडीची मागणी केली

ठळक मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने दोघाचा अटकपूर्व जमीन फेटाळून 14 एप्रिलपर्यंत तपास यंत्रणेसमोर  हजर रहाण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी राज्य सरकारने दोन्ही गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून गेल्यावर्षी  न्यायालयात दोषरोपपत्र दाखलही केले.

मुंबई :  पुण्यातील एल्गार परिषदेच्या माध्यमातून कथित शहरी नक्षलवादी कारवाई केल्याप्रकरणी जेष्ठ लेखक प्रो. आनंद तेलतुबंडे व प्रा.गौतम नवलखा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) 18 एप्रिलपर्यंत कोठडी मिळाली आहे.  बुधवारी त्यांनी विशेष न्यायालयात हजर केले असताना तपास अधिकारी दहा दिवसाच्या कोठडीची मागणी केली असता त्यांना 4 दिवसाची कोठडी मंजूर करण्यात आली.    

सर्वोच्च न्यायालयाने दोघाचा अटकपूर्व जमीन फेटाळून 14 एप्रिलपर्यंत तपास यंत्रणेसमोर  हजर रहाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दोघेही स्वतंत्रपणे मंगळवारी  हजर झाले होते.  एक जानेवारी 2018 रोजी कोरगाव-भीमा येथे मोठी दंगल झाली होती. त्याच्या पूर्वदिनी म्हणजे 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात शनिवार वाड्यासमोर झालेल्या  एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषणे दिल्याने जमाव प्रबुद्ध झाला होता.त्यामुळे दंगल घडली, असा निष्कर्ष तत्कालीन भाजप सरकारच्या सूचनेनुसार कार्यरत असलेल्या  पोलिसांनी काढला. त्यानुसार प्रा.तेलतुंबडें, नवलखा यांच्यासह दलित चळवळीत काम करनाऱ्या अनेक जेष्ठ लेखक, कार्यकर्त्यांवर नक्षली चळवळ फेलावत असल्याप्रकरणी  देशद्रोह करीत असल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले होते. तेव्हापासून संबंधीताच्या अटक -जमीन,असा खेळ सुरु होता. याप्रकरणी राज्य सरकारने दोन्ही गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून गेल्यावर्षी  न्यायालयात दोषरोपपत्र दाखलही केले. 

दरम्यान, राज्यात भाजपाविरोधात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले, त्याचे निर्माते आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी एल्गार परिषदेप्रकरणी चुकीच्या पद्धतीने तपास करण्यात आला आहे, त्याबाबत पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याने त्याची चॊकशी करण्याची लेखी मागणी राज्य सरकारकडे  केली. त्याच्या दुसऱ्यादिवशी केंद्राने हा तपास स्थानिक पोलिसांकडून एनआयएकडे वर्ग केला. त्याच्या या निर्णयाविरुद्ध टीका झाली. 

या प्रकरणी डॉ. तेलतुंबडें व नवलखा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.त्यांनी अटकपूर्व जमीन फेटाळल्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी जामीन फेटाळत एनआयएसमोर हजर होण्यासाठी 30 दिवसाची मुदत दिली होती.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारMumbaiमुंबईNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाCourtन्यायालय