शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुंबईत घाण करताय तर सावधान; तुमच्यावर दाखल होणार गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 20:42 IST

पालिका आणि पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने मुंबईला स्वच्छ ठेवण्यासाठी 'कचरा मुक्त अभियान' सुरू करण्यात आलं आहे.

ठळक मुद्देमुंबईत महापालिकेच्या २४ वॉर्डात आता मुंबईच्या ९४ पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या मदतीने प्रत्येक शनिवारी आणि रविवार स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. मुंबई पोलीस थेट पोलीस अधिनियम १९५१ नुसार कलम २२ व नियम ११५ अंतर्गत गुन्हा नोंदवून कारवाई केली जाणार असल्याचे बर्वे यांनी सांगितले. 

मुंबई - रस्ते, नाले आणि सार्वजनिक परिसर घाण करणाऱ्यांवर आता मुंबई पोलीस थेट गुन्हा नोंदवणार आहेत. पालिका आणि पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने मुंबईला स्वच्छ ठेवण्यासाठी 'कचरा मुक्त अभियान' सुरू करण्यात आलं आहे. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी दिली.

मुंबईत महापालिकेच्या २४ वॉर्डात आता मुंबईच्या ९४ पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या मदतीने प्रत्येक शनिवारी आणि रविवार स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. या स्वच्छता मोहिमेत स्थानिक पोलीस ठाणे आणि पालिका कर्मचारी असं २०० जणांचं पथक प्रत्येक वॉर्डात साफसफाई करणार आहे. या मोहिमेअंतर्गत झोपडपट्टी परिसर, नाल्यालगतच्या वस्त्यांमध्ये पोलीस आणि पालिका कर्मचारी मोठ्या साफसफाई मोहिम राबवणार आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत क्लिन-अप मार्शल आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने नाल्यात, उघड्यावर घाण टाकणारे, थुंकणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर आता मुंबई पोलीस थेट पोलीस अधिनियम १९५१ नुसार कलम २२ व नियम ११५ अंतर्गत गुन्हा नोंदवून कारवाई केली जाणार असल्याचे बर्वे यांनी सांगितले. 

मुंबईतील मंदिरं, रस्त्यावरील नाके, चौक अशा सार्वजनिक ठिकाणी पाळीव जनावरांना बांधून त्यांना त्याच ठिकाणी चारा दिला जातो. त्या जनावरांची विष्ठा व मलमूत्रामुळे तो परिसर अस्वच्छ होतो आणि मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. त्यामुळे भाजप नगरसेविका नेहला शहा यांनी महापालिका प्रशासनाकडे अशा लोकांवर कारवाईचा बडगा उभागण्याची मागणी केली होती. त्याला महापालिका प्रशासनानं सहमती दर्शवली आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पाळीव प्राण्यांमुळे होणाऱ्या अस्वच्छतेस कारणीभूत ठरणाऱ्यांवर १० हजार रुपये महापालिका दंड आकारणार आहे. तर लहान जनावरांसाठी ६ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

टॅग्स :Sanjay Barveसंजय बर्वेMumbaiमुंबईPoliceपोलिसMuncipal Corporationनगर पालिका