शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

हत्येच्या आदल्या दिवशी संतोष देशमुख पत्नीला काय बोलले?; जबाबातून धक्कादायक दावा उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 15:16 IST

Santosh Deshmukh Murder: तेव्हापासून संतोष देशमुख अस्वस्थ होते. त्यावेळी पत्नीने पती संतोष देशमुख यांना विचारले तेव्हा त्यांनी या विषयावर पत्नीशी संवाद साधला.

बीड - संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे उघड होत आहेत. या हत्येतील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये दिसून आल्याचं समोर आले. त्यानंतर आता संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पोलीस जबाब समोर आला आहे. त्यात हत्येच्या आदल्या दिवशी पती संतोष देशमुख यांनी पत्नीशी काय संवाद साधला हे पत्नीने पोलिसांना सांगितले.

पोलीस जबाबात संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी म्हटलं की, वाल्मीक कराड आणि त्याचे लोक गुंड प्रवृत्तीचे असून ते आपल्याला मारून टाकतील असं संतोष यांनी सांगितले होते. विष्णू चाटेचा फोन आल्यानंतर संतोष देशमुख आणि पत्नी अश्विनी यांच्यात चर्चा झाली. वाल्मीक अण्णा, जिवंत सोडणार नाही असं चाटे म्हणाल्याचं संतोष देशमुखांनी पत्नीला सांगितले होते. ६ तारखेला अवादा कंपनीला खंडणी मागण्यासाठी कराड यांचे लोक सुदर्शन घुले गावात आले असताना त्यांच्याशी संतोष देशमुख यांचा वाद झाला. तेव्हापासून ते अस्वस्थ होते. त्यावेळी पत्नीने पती संतोष देशमुख यांना विचारले तेव्हा त्यांनी या विषयावर पत्नीशी संवाद साधला.

जी भांडणे झाली, ज्यांच्यासोबत भांडण झाले ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. वाल्मीक कराड हा विष्णू चाटेच्या माध्यमातून खंडणीसाठी धमकी देत होता. संतोष देशमुख यांनाही धमकी दिली होती. त्यातून संतोष देशमुख तणावात होते. त्यानंतर पुढच्या ३ दिवसात ९ तारखेला संतोष देशमुख यांचं अपहरण झाले. अपहरणानंतर त्यांच्यासोबत क्रूरपणे अमानुष छळ करून हत्या करण्यात आली. मात्र ६ ते ९ या ३ दिवसांच्या काळात संतोष देशमुख आणि पत्नीचे या विषयावर बोलणे झाले होते. विष्णू चाटेचा फोन पत्नीसमोर संतोष देशमुख यांना आला होता असं जबाबात पुढे आले आहे.

आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांचाही जबाब, ६ वेळा मागितली खंडणी

आवादा एनर्जी प्रा.लि या कंपनीच्या मस्साजोग येथील पवन ऊर्जा प्रकल्पाचे अधिकारी म्हणून सुनील शिंदे काम पाहतात. त्यांचाही सीआयडीकडून जबाब घेतला आहे. त्यात वाल्मीक कराडने एक दोन नव्हे तर तब्बल ६ वेळा खंडणी मागितली. फोनवरून न ऐकल्याने ६ डिसेंबर २०२४ रोजी सुदर्शन घुलेसह गुंडांना तिथे पाठवले. परंतु संतोष देशमुख यांनी मध्यस्थी केली. याचाच राग मनात धरून देशमुख यांची हत्या झाली असं त्यांनी जबाबात सांगितले आहे. 

टॅग्स :Santosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराडBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या