शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 12:22 IST

Bajrang Dal Worker Murder: बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर समोर आली, भयंकर माहिती. सुहासवर एका व्यक्तीच्या हत्येचा आरोप होता. त्याची हत्या भाजप कार्यकर्ता प्रवीण नेतारूच्या हत्येनंतर करण्यात आली होती.

Bajrang Dal Worker killed: बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची भरदिवसा हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या हत्या प्रकरणासंदर्भातील एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  काही लोक धारदार शस्त्रांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर हल्ला करताना दिसत आहे. तर आजूबाजूचे लोक बघत आहेत. कर्नाटकातील मंगळुरूमध्ये ही घटना घडली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सुहास शेट्टी असे हत्या करण्यात आलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर तो फैजल नावाच्या व्यक्तीच्या हत्येतील आरोपी होता, असे समोर आले. 

बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर शहरात तणाव

सुहास शेट्टीच्या हत्येनंतर मंगळुरूमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पोलिसांनी घटना घडलेल्या भागात आणि शहरातील इतर भागात बंदोबस्तात वाढ केली.

वाचा >>अल्पवयीन मुलीला पळवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला अटक

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातून अशी माहिती समोर आली की, सुहास शेट्टीवर फैजल नावाच्या व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप होता. भाजपचा कार्यकर्ता प्रवीण नेतारूच्या हत्येनंतर फैजलची हत्या करण्यात आली होती. प्रवीण नेतारूच्या हत्येचा तपास सध्या एनआयएकडे आहे. 

बजरंग दलाचा कार्यकर्ता सुहासची हत्या झाल्याची बातमी शहरभर पसरल्याने तणाव वाढला. ज्या रुग्णालयामध्ये सुहासचा मृतदेह आणण्यात आला, तिथली सुरक्षाही वाढवण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजप खासदार नलिन कुमार कटील यांनी रुग्णालयात धाव घेतली. 

६ मे पर्यंत शहरात जमावबंदी

सुहास शेट्टीच्या हत्येनंतर तणाव वाढला. अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी जमाव बंदी आदेश लागू केले आहेत. ज्या व्यक्तींनी सुहासवर हल्ला केला होता, त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. 

दरम्यान, सुहास शेट्टीवर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ज्या ठिकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, तिथेही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी आणि हिंसक घटना टाळण्यासाठी पाच जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य राखीव दलाच्या ५२ तुकड्या आणि १००० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी शहरात तैनात करण्यात आले आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटकPoliceपोलिसDeathमृत्यू