शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 12:22 IST

Bajrang Dal Worker Murder: बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर समोर आली, भयंकर माहिती. सुहासवर एका व्यक्तीच्या हत्येचा आरोप होता. त्याची हत्या भाजप कार्यकर्ता प्रवीण नेतारूच्या हत्येनंतर करण्यात आली होती.

Bajrang Dal Worker killed: बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची भरदिवसा हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या हत्या प्रकरणासंदर्भातील एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  काही लोक धारदार शस्त्रांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर हल्ला करताना दिसत आहे. तर आजूबाजूचे लोक बघत आहेत. कर्नाटकातील मंगळुरूमध्ये ही घटना घडली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सुहास शेट्टी असे हत्या करण्यात आलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर तो फैजल नावाच्या व्यक्तीच्या हत्येतील आरोपी होता, असे समोर आले. 

बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर शहरात तणाव

सुहास शेट्टीच्या हत्येनंतर मंगळुरूमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पोलिसांनी घटना घडलेल्या भागात आणि शहरातील इतर भागात बंदोबस्तात वाढ केली.

वाचा >>अल्पवयीन मुलीला पळवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला अटक

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातून अशी माहिती समोर आली की, सुहास शेट्टीवर फैजल नावाच्या व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप होता. भाजपचा कार्यकर्ता प्रवीण नेतारूच्या हत्येनंतर फैजलची हत्या करण्यात आली होती. प्रवीण नेतारूच्या हत्येचा तपास सध्या एनआयएकडे आहे. 

बजरंग दलाचा कार्यकर्ता सुहासची हत्या झाल्याची बातमी शहरभर पसरल्याने तणाव वाढला. ज्या रुग्णालयामध्ये सुहासचा मृतदेह आणण्यात आला, तिथली सुरक्षाही वाढवण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजप खासदार नलिन कुमार कटील यांनी रुग्णालयात धाव घेतली. 

६ मे पर्यंत शहरात जमावबंदी

सुहास शेट्टीच्या हत्येनंतर तणाव वाढला. अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी जमाव बंदी आदेश लागू केले आहेत. ज्या व्यक्तींनी सुहासवर हल्ला केला होता, त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. 

दरम्यान, सुहास शेट्टीवर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ज्या ठिकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, तिथेही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी आणि हिंसक घटना टाळण्यासाठी पाच जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य राखीव दलाच्या ५२ तुकड्या आणि १००० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी शहरात तैनात करण्यात आले आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटकPoliceपोलिसDeathमृत्यू