शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 12:22 IST

Bajrang Dal Worker Murder: बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर समोर आली, भयंकर माहिती. सुहासवर एका व्यक्तीच्या हत्येचा आरोप होता. त्याची हत्या भाजप कार्यकर्ता प्रवीण नेतारूच्या हत्येनंतर करण्यात आली होती.

Bajrang Dal Worker killed: बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची भरदिवसा हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या हत्या प्रकरणासंदर्भातील एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  काही लोक धारदार शस्त्रांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर हल्ला करताना दिसत आहे. तर आजूबाजूचे लोक बघत आहेत. कर्नाटकातील मंगळुरूमध्ये ही घटना घडली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सुहास शेट्टी असे हत्या करण्यात आलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर तो फैजल नावाच्या व्यक्तीच्या हत्येतील आरोपी होता, असे समोर आले. 

बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर शहरात तणाव

सुहास शेट्टीच्या हत्येनंतर मंगळुरूमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पोलिसांनी घटना घडलेल्या भागात आणि शहरातील इतर भागात बंदोबस्तात वाढ केली.

वाचा >>अल्पवयीन मुलीला पळवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला अटक

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातून अशी माहिती समोर आली की, सुहास शेट्टीवर फैजल नावाच्या व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप होता. भाजपचा कार्यकर्ता प्रवीण नेतारूच्या हत्येनंतर फैजलची हत्या करण्यात आली होती. प्रवीण नेतारूच्या हत्येचा तपास सध्या एनआयएकडे आहे. 

बजरंग दलाचा कार्यकर्ता सुहासची हत्या झाल्याची बातमी शहरभर पसरल्याने तणाव वाढला. ज्या रुग्णालयामध्ये सुहासचा मृतदेह आणण्यात आला, तिथली सुरक्षाही वाढवण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजप खासदार नलिन कुमार कटील यांनी रुग्णालयात धाव घेतली. 

६ मे पर्यंत शहरात जमावबंदी

सुहास शेट्टीच्या हत्येनंतर तणाव वाढला. अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी जमाव बंदी आदेश लागू केले आहेत. ज्या व्यक्तींनी सुहासवर हल्ला केला होता, त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. 

दरम्यान, सुहास शेट्टीवर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ज्या ठिकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, तिथेही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी आणि हिंसक घटना टाळण्यासाठी पाच जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य राखीव दलाच्या ५२ तुकड्या आणि १००० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी शहरात तैनात करण्यात आले आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटकPoliceपोलिसDeathमृत्यू