शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

भिवंडीत दाम्पत्याला जाळण्याचा प्रयत्न, घराला लावली आग; आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 10:27 IST

सुदैवाने नागरिकांनी तत्काळ आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला असल्याची माहिती मिळत आहे.

भिवंडी :  शहरातील निजामपूर पोलिस ठाण्याच्या कुरेशीनगर परिसरातील एका घरात पतिपत्नी झोपलेले असताना, घराला आग लावून त्यांना जळून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. यात पतिपत्नी भाजल्याने जखमी झाले आहेत. आग भडकल्यावर सिलिंडरनेही पेट घेतला. सुदैवाने नागरिकांनी तत्काळ आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला असल्याची माहिती मिळत आहे.

फरिन आसिफ कुरेशी व पती आसिफ कुरेशी असे दोघा जखमींची नावे आहेत. मध्यरात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान अनोळखी व्यक्तीने घराच्या दरवाजावर पेट्रोल टाकून आग लावून आरोपी फरार झाले. यावेळी हल्लेखोराने घराच्या मागील दरवाजाची बाहेरून कडी लावली होती. आगीने पेट घेत घरात धूर जमा झाल्याने दोघे जागे झाले. त्यांनी दुसऱ्या दरवाजाने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता,  तो दरवाजा बाहेरून बंद होता. दोघांनी आरडाओरड केल्याने शेजारी जागे होऊन घटनास्थळी धाव घेत आग विझविली. दरम्यान, पतिपत्नी हे आग विझविण्याचा प्रयत्न करत असताना भाजल्याने जखमी झाले आहेत. 

स्थानिकांनी या दोघांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. स्थानिक निजामपूर पोलिस व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.

जीवे मारण्याची धमकी परिसरात मादक पदार्थ विक्री करून गुंडगिरी करणारे तौकिर आणि त्याच्या साथीदारांनी ही आग लावल्याचा आरोप जखमी आसिफ यांनी केला आहे. तीन महिन्यांपूर्वी तौकिर आणि त्याच्या साथीदारांनी आसिफ याचा मेव्हणा अनस व त्याच्या कुटुंबीयांना क्षुल्लक वादातून मारहाण केली होती.  या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा मागे घे, नाहीतर तुमचे कुटुंब संपवून टाकू, अशी धमकी आरोपींनी दिली होती. त्या रागातून हे कृत्य केल्याचे सांगत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जखमी आसिफ याने केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfireआग