शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

तब्बल २८.९३ कोटींचा ऐवज वर्षभरात लंपास, चोरीचा ३२ टक्के मुद्देमाल जप्त करण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 02:56 IST

पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातून वर्षभरात चोरट्यांनी तब्बल २८ कोटी ९३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे.

 - सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातून वर्षभरात चोरट्यांनी तब्बल २८ कोटी ९३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. मात्र, त्यापैकी अवघा ३२ टक्के मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. घडलेले गुन्हे उघड केल्यानंतरही मुद्देमाल परत मिळण्याचे प्रमाण कमी असल्याने वर्षभरातील आकडेवारीवरून दिसून येत आहे.शहरात घडणाऱ्या एकूण गुन्ह्यांमध्ये मालमत्तेशी संबंधित गुन्हे सर्वाधिक आहेत. एकूण गुन्ह्यांच्या ४० टक्के गुन्हे मालमत्ता चोरीसंबंधी आहेत. त्यामध्ये घरफोडी, वाहनचोरी, सोनसाखळीचोरी, अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. गुन्हे घडल्यानंतर अनेकदा पोलिसांकडून शीघ्र गतीने तपास करून गुन्ह्याची उकल केली जाते; परंतु आरोपी पकडल्यानंतरही चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी अत्यल्प मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागतो. त्यामुळे गुन्हेगारांकडून चोरीचा मुद्देमाल परत मिळवण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान असते. अनेकदा ते आव्हान स्वीकारत पोलिसांकडून अधिकाधिक मुद्देमाल जप्तीचा प्रयत्नही होतो. त्यानंतरही अपेक्षित मुद्देमाल हाती लागत नसल्याने तक्रारदाराचा हिरमोड झालेला असतो. त्यांची ही नाराजी अनेकदा उघडही झाल्याचे पोलिसांकडून मुद्देमाल परत देतेवेळी पाहायला मिळते.गतवर्षात नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ६,८९५ गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये २,२६० गुन्हे मालमत्तेशी संबंधित असून त्यापैकी ८६१ गुन्हे उघडकीस आले आहेत. तीन वर्षांच्या तुलनेत मालमत्तेविषयक गुन्ह्यांचा आलेख वाढल्याचे दिसून येत आहे. गतवर्षात तब्बल २८ कोटी ९३ लाख १४ हजार १३२ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. मात्र, त्यापैकी अवघा आठ कोटी १८ लाख ५० हजार ९७४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २०१८ मध्ये मालमत्तांचे एकूण २,२८० गुन्हे घडले होते. त्यामध्ये २६ कोटी ५७ लाख ३७ हजार ३६० रुपये किमतीच्या मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला होता. त्यापैकी सात कोटी ९६ लाख १३ हजार ४२९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या दोन वर्षांच्या तुलनेत गतवर्षात २० गुन्ह्यांनी घट झाली आहे, तसेच मुद्देमाल जप्तीच्या प्रमाणातही दोन टक्क्याने वाढले आहे. मुद्देमाल जप्तीचे हे प्रमाण वाढावे, त्याकरिता पोलिसांकडून गुन्हे प्रकटीकरणात माहिरत मिळवण्याची गरज आहे.कारवाईनंतरही चांदीघडलेल्या गुन्ह्याची उकल करून पोलिसांनी गुन्हेगाराला अटक केल्यानंतरही त्यांच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल मिळवण्यात अपेक्षित यश येत नाहीये, त्यामुळे गुन्ह्यात गेलेल्या एकूण मुद्देमालापैकी अत्यल्प मुद्देमाल परत मिळाल्यानंतरही तक्रारदाराकडून फारसे समाधान व्यक्त केले जात नाहीये. तर एखाद्या गुन्ह्यात कारवाई झाल्यानंतरही पोलिसांपुढे बोलते न झाल्याने लपवलेल्या ऐवजामुळे संबंधित चोरट्याची चांदी होत असल्याचे दिसून येत आहे.३८ कोटींचा मुद्देमाल चोरट्यांच्या घशातनवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात दोन वर्षात मालमत्तेचे ४,५४० गुन्हे घडले आहेत. त्यापैकी अवघे १,८३५ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामध्ये १७ कोटी १४ लाख ६४ हजार ४०३ रुपये किमतीचा मुद्देमाल संबंधित गुन्हेगारांकडून जप्त करण्यात आला आहे; परंतु दोन वर्षांत लंपास झालेल्या सुमारे ५५ कोटी ५० लाख रुपये किमतीच्या मुद्देमालाच्या तुलनेत जप्तीचा ऐवज कमी आहे. त्यामुळे उर्वरित ३८ कोटी ३५ लाख ८७ हजार ८९ रुपये किमतीचा मुद्देमाल तपासात पोलिसांच्या हाती न लागल्याने चोरट्यांनी तो फस्त केल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई