शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

बिश्नोई टोळीला ड्रोनद्वारे पाकमधून शस्त्रपुरवठा, सलमानच्या घरावरील हल्ल्यातील पिस्तूल देशी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 08:07 IST

वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये असलेल्या सलमानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी बिश्नोई टोळीने वापरलेली पिस्तुले आणि कडतुसे देशी बनावटीची असल्याचा अहवाल न्यायवैद्यक प्रयोगशाळेने दिला आहे.

मुंबई : अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणानंतर रडारवर आलेल्या कुख्यात बिश्नोई टोळीला शस्त्रास्त्रांचा पुरवठा पाकिस्तानातून ड्रोनद्वारे होत असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासातून उघड झाली आहे.  

वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये असलेल्या सलमानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी बिश्नोई टोळीने वापरलेली पिस्तुले आणि कडतुसे देशी बनावटीची असल्याचा अहवाल न्यायवैद्यक प्रयोगशाळेने दिला आहे. गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलने १४ एप्रिलच्या पहाटे शूटर सागर पाल आणि विकीकुमार गुप्ता यांच्याकरवी सलमानच्या घरावर गोळीबार केला होता. 

गुन्हे शाखेने पाल आणि गुप्ता यांच्यासह सोनूकुमार बिश्नोई, अनुज थापन, मोहम्मद रफीक चौधरी आणि हरपाल सिंग ऊर्फ हॅरी यांना अटक केली. आरोपी अनुज थापन याने गुन्हे शाखेच्या कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली. सलमानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी आरोपी पाल आणि गुप्ता यांना दोन पिस्तुले आणि ४० काडतुसे देण्यात आली होती. बिश्नोई टोळीतील काही आरोपींना चंडीगड पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून परदेशी बनावटीची शस्त्रे जप्त करण्यात आली होती. त्यांचा पुरवठा पाकिस्तानातून ड्रोनच्या साहाय्याने केला गेल्याची माहिती गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिली आहे. 

सलमानवरील हल्ल्यासाठी... पाकिस्तानातील डोगर ही व्यक्ती एके ४७, एम १६, एके ९२ ही शस्त्रे पुरवत होती. प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येसाठी ‘जिगाना’ या शस्त्राचा वापर केला गेला होता. तशाच प्रकारचे शस्त्र सलमानवरील हल्ल्यासाठी आरोपींना देण्यात येणार होते. हे काम सुखा शूटर करत होता. तो अनमोल बिश्नोईच्या थेट संपर्कात होता. अत्याधुनिक हत्यारे चालविणारे शार्प शूटर्स मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, रायगड आणि गुजरात येथे गोल्डी ब्रारच्या आदेशाने दबा धरून बसले होते. 

समुद्रमार्गे श्रीलंकेला पलायनाचा प्लॅन  गोल्डी ब्रार, अनमोल बिश्नोई, रोहित गोधारा यांच्या आदेशाने आरोपी सलमानवर हल्ला करणार होते. हल्ल्यासाठी १८ वर्षांच्या आतील मुलांना वापरण्याचा या टोळीचा मनसुबा होता.  हल्ल्यासाठी गाड्या पुरविण्याची जबाबदारी जॉन या व्यक्तीकडे होती. तर, काम पूर्ण झाल्यानंतर सर्वांना कन्याकुमारी येथे एकत्र जमण्यास सांगून तेथून समुद्रमार्गे प्रथम श्रीलंकेत आणि नंतर अन्य देशांत पळून जाण्याची व्यवस्था बिश्नोईने करून ठेवल्याचेही पनवेल पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी