शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

लग्नात रसगुल्ला न दिल्यामुळे वाद; दोन गटात तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू तर अनेक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 17:32 IST

जेवताना जास्तीचा रसगुल्ला न दिल्यामुळे वाद पेटला आणि मोठा गोंधळ उडाला.

लग्नामध्ये एखादी गोष्ट कमी झाल्यावर मानापमानाचे नाट्य नेहमी होत असते. कधीकधी यावरुन वाद होऊन लग्नही मोडल्याचे तुम्ही ऐकले असेल. पण, आग्रा शहरात झालेल्या लग्नात शुल्लक कारणाचे मोठ्या वादात रुपांतर झाले आणि यातच एकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वादाचे कारण होते रसगुल्ले. होय, तुम्ही बरोबर ऐकले. रसगुल्ल्यावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यादरम्यान, काही लोकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या, चाकू आणि चमच्याने हल्ला केला. यावेळी 10 हून अधिक जण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, मारहाणीनंतर मुलाच्या घरच्यांनी लग्न मोडले. या घटनेनंतर लग्नस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

आग्रा येथील खंडौली येथील व्यापारी वकार यांची दोन मुले जावेद आणि रशीद यांचे लग्न एतमादपूरमध्ये ठरले होते. या दोन्ही मुलांचे लग्न उस्मानच्या मुली झैनाब आणि साजियासोबत ठरले होते. मुलांची वरात आली, त्यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले. लग्नात खान्यापिण्याचे अनेक स्टॉलही लावण्यात आले. यावेळी एका व्यक्तीला जास्तीचा रसगुल्ला न दिल्यामुळे वाद पेटला. 

यावेळी तरुणांच्या दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी महिला व ज्येष्ठांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीही ऐकायला तयार नव्हते. लग्नाच्या मांडवाचे रुपांतर भांडणाच्या मैदानात झाले. या भांडणात जखमी झालेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. तसेच, यात अनेक लोकही जखमी झाले. या वादानंतर मुलाच्या घरच्यांनी लग्न मोडले. मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नDeathमृत्यू