शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

लग्नात रसगुल्ला न दिल्यामुळे वाद; दोन गटात तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू तर अनेक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 17:32 IST

जेवताना जास्तीचा रसगुल्ला न दिल्यामुळे वाद पेटला आणि मोठा गोंधळ उडाला.

लग्नामध्ये एखादी गोष्ट कमी झाल्यावर मानापमानाचे नाट्य नेहमी होत असते. कधीकधी यावरुन वाद होऊन लग्नही मोडल्याचे तुम्ही ऐकले असेल. पण, आग्रा शहरात झालेल्या लग्नात शुल्लक कारणाचे मोठ्या वादात रुपांतर झाले आणि यातच एकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वादाचे कारण होते रसगुल्ले. होय, तुम्ही बरोबर ऐकले. रसगुल्ल्यावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यादरम्यान, काही लोकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या, चाकू आणि चमच्याने हल्ला केला. यावेळी 10 हून अधिक जण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, मारहाणीनंतर मुलाच्या घरच्यांनी लग्न मोडले. या घटनेनंतर लग्नस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

आग्रा येथील खंडौली येथील व्यापारी वकार यांची दोन मुले जावेद आणि रशीद यांचे लग्न एतमादपूरमध्ये ठरले होते. या दोन्ही मुलांचे लग्न उस्मानच्या मुली झैनाब आणि साजियासोबत ठरले होते. मुलांची वरात आली, त्यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले. लग्नात खान्यापिण्याचे अनेक स्टॉलही लावण्यात आले. यावेळी एका व्यक्तीला जास्तीचा रसगुल्ला न दिल्यामुळे वाद पेटला. 

यावेळी तरुणांच्या दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी महिला व ज्येष्ठांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीही ऐकायला तयार नव्हते. लग्नाच्या मांडवाचे रुपांतर भांडणाच्या मैदानात झाले. या भांडणात जखमी झालेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. तसेच, यात अनेक लोकही जखमी झाले. या वादानंतर मुलाच्या घरच्यांनी लग्न मोडले. मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नDeathमृत्यू