शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

आई-वडिलांनी दोन मुलींची त्रिशुळानं केली हत्या; स्वत:लाही संपवणार होते, तितक्यात...

By कुणाल गवाणकर | Updated: January 25, 2021 18:22 IST

धक्कादायक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ; पोलीसही चक्रावले

चित्तूर: आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कलियुग सत्ययुगात बदलणार असल्यानं आई, वडिलांनी त्यांच्या दोन मुलींची हत्या केली आहे. कलियुगाचं रुपांतर सत्ययुगात होणार असल्यानं दैवी शक्तींनी मुली पुन्हा जिवंत होतील, अशा समजुतीत असलेल्या पालकांनी त्यांच्या पोटच्या मुलींना संपवलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली.मृत मुलींचे आई, वडील अतिशय सुशिक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र तरीही त्यांनी अशा प्रकारचं पाऊल का उचललं याचा शोध पोलिसांकडून सध्या घेतला जात आहे. 'रविवारी रात्री आई, वडिलांनी स्वत:च्या मुलींची हत्या केली. त्यानंतर त्यांनी याची माहिती आपल्या एक सहकाऱ्याला दिली. त्यानंतर सहकाऱ्यानं हा संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी मृत मुलींचे आई वडील बेशुद्धावस्थेत आढळून आले,' अशी माहिती पोलिसांनी दिली.मदनपल्लीच्या डीएसपींनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींच्या आईनंच त्यांची हत्या केली. एका मुलीला संपवण्याआधी तिचं मुंडन करण्यात आलं होतं. त्यावेळी वडील सर्व पाहत होते. आईनं त्रिशूळाच्या मदतीनं आधी लहान मुलीला संपवलं. त्यानंतर मोठ्या मुलीची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे यानंतर दाम्पत्य स्वत:ला संपवणार होतं. मात्र पोलीस वेळीच पोहोचल्यानं पुढील अनर्थ टळला.मृत मुलींच्या वडिलांचं नाव व्ही. पुरुषोत्तम नायडू (एम. एसस्सी, पीएचडी) आहे. ते मदनपल्लीत सरकारी महिला पदवी महाविद्यालयात एसोसिएट प्रोफेसर आहेत. तर मृत मुलींची आई पोस्ट ग्रॅज्युएट आणि सुवर्ण पदक विजेती आहे. त्या एका स्थानिक खासगी शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेश