शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडिलांनी दोन मुलींची त्रिशुळानं केली हत्या; स्वत:लाही संपवणार होते, तितक्यात...

By कुणाल गवाणकर | Updated: January 25, 2021 18:22 IST

धक्कादायक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ; पोलीसही चक्रावले

चित्तूर: आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कलियुग सत्ययुगात बदलणार असल्यानं आई, वडिलांनी त्यांच्या दोन मुलींची हत्या केली आहे. कलियुगाचं रुपांतर सत्ययुगात होणार असल्यानं दैवी शक्तींनी मुली पुन्हा जिवंत होतील, अशा समजुतीत असलेल्या पालकांनी त्यांच्या पोटच्या मुलींना संपवलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली.मृत मुलींचे आई, वडील अतिशय सुशिक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र तरीही त्यांनी अशा प्रकारचं पाऊल का उचललं याचा शोध पोलिसांकडून सध्या घेतला जात आहे. 'रविवारी रात्री आई, वडिलांनी स्वत:च्या मुलींची हत्या केली. त्यानंतर त्यांनी याची माहिती आपल्या एक सहकाऱ्याला दिली. त्यानंतर सहकाऱ्यानं हा संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी मृत मुलींचे आई वडील बेशुद्धावस्थेत आढळून आले,' अशी माहिती पोलिसांनी दिली.मदनपल्लीच्या डीएसपींनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींच्या आईनंच त्यांची हत्या केली. एका मुलीला संपवण्याआधी तिचं मुंडन करण्यात आलं होतं. त्यावेळी वडील सर्व पाहत होते. आईनं त्रिशूळाच्या मदतीनं आधी लहान मुलीला संपवलं. त्यानंतर मोठ्या मुलीची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे यानंतर दाम्पत्य स्वत:ला संपवणार होतं. मात्र पोलीस वेळीच पोहोचल्यानं पुढील अनर्थ टळला.मृत मुलींच्या वडिलांचं नाव व्ही. पुरुषोत्तम नायडू (एम. एसस्सी, पीएचडी) आहे. ते मदनपल्लीत सरकारी महिला पदवी महाविद्यालयात एसोसिएट प्रोफेसर आहेत. तर मृत मुलींची आई पोस्ट ग्रॅज्युएट आणि सुवर्ण पदक विजेती आहे. त्या एका स्थानिक खासगी शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेश