शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

आई-वडिलांनी दोन मुलींची त्रिशुळानं केली हत्या; स्वत:लाही संपवणार होते, तितक्यात...

By कुणाल गवाणकर | Updated: January 25, 2021 18:22 IST

धक्कादायक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ; पोलीसही चक्रावले

चित्तूर: आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कलियुग सत्ययुगात बदलणार असल्यानं आई, वडिलांनी त्यांच्या दोन मुलींची हत्या केली आहे. कलियुगाचं रुपांतर सत्ययुगात होणार असल्यानं दैवी शक्तींनी मुली पुन्हा जिवंत होतील, अशा समजुतीत असलेल्या पालकांनी त्यांच्या पोटच्या मुलींना संपवलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली.मृत मुलींचे आई, वडील अतिशय सुशिक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र तरीही त्यांनी अशा प्रकारचं पाऊल का उचललं याचा शोध पोलिसांकडून सध्या घेतला जात आहे. 'रविवारी रात्री आई, वडिलांनी स्वत:च्या मुलींची हत्या केली. त्यानंतर त्यांनी याची माहिती आपल्या एक सहकाऱ्याला दिली. त्यानंतर सहकाऱ्यानं हा संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी मृत मुलींचे आई वडील बेशुद्धावस्थेत आढळून आले,' अशी माहिती पोलिसांनी दिली.मदनपल्लीच्या डीएसपींनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींच्या आईनंच त्यांची हत्या केली. एका मुलीला संपवण्याआधी तिचं मुंडन करण्यात आलं होतं. त्यावेळी वडील सर्व पाहत होते. आईनं त्रिशूळाच्या मदतीनं आधी लहान मुलीला संपवलं. त्यानंतर मोठ्या मुलीची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे यानंतर दाम्पत्य स्वत:ला संपवणार होतं. मात्र पोलीस वेळीच पोहोचल्यानं पुढील अनर्थ टळला.मृत मुलींच्या वडिलांचं नाव व्ही. पुरुषोत्तम नायडू (एम. एसस्सी, पीएचडी) आहे. ते मदनपल्लीत सरकारी महिला पदवी महाविद्यालयात एसोसिएट प्रोफेसर आहेत. तर मृत मुलींची आई पोस्ट ग्रॅज्युएट आणि सुवर्ण पदक विजेती आहे. त्या एका स्थानिक खासगी शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेश