शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

'अभ्यासाला कंटाळलेय', पण ते माझ्या मृत्यूचं कारण नाही; चिठ्ठीने गूढ वाढवलं, साताऱ्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 21:33 IST

प्रियांका निलकंठ आलाटकर (वय १९, रा. विलासपूर, सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे.

सातारा : एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना साताऱ्यातील विलासपूरमध्ये सोमवारी दुपारी उघडकीस आली. अभ्यासाला कंटाळलेय; पण ते माझ्या मृत्यूचं कारण नाही, अशी चिठ्ठी लिहून विद्यार्थिनीने स्वत:च्याच मृत्यूचं गूढ वाढवलंय. यामुळे साताऱ्यात खळबळ उडालीय.

प्रियांका निलकंठ आलाटकर (वय १९, रा. विलासपूर, सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रियांका आलाटकर ही तरूणी पुणे येथील ससून वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकत होती. मंगळवारपासून तिची परीक्षा सुरू होणार होती. त्यासाठी ती सोमवारी सायंकाळी चार वाजता पुण्याला जाणार होती. मात्र, तत्पूर्वीच तिने राहत्या घरात फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकाराची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास`थळी धाव घेतली.

प्रियांकाच्या बेडरुममधील खोलीची पोलिसांनी तपासणी केल्यानंतर एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीमध्ये प्रियांकाने ‘मी अभ्यासाला कंटाळले आहे. पण माझ्या मृत्यूचं कारण ते नाही. हा माझा स्वत:चा निर्णय असून, माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये,’ असा उल्लेख केला आहे. यामुळे प्रियांकाच्या आत्महत्येचे गूढ वाढले आहे. सोमवार सकाळपासून ती तणावात होती. फारशी कोणाशी बोलायचीही नाही. असे पोलीस सांगत आहेत. अचानक तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याने तिच्या आर्इवडिलांना जबर मानसिक धक्का बसला आहे. कितीही अडचणी आल्या तरी तीडगमगणारी नव्हती. तिला डाॅक्टर होऊन स्वत:चं हाॅस्पीटल थाटायचंहोतं. असं एका तिच्या नातेवाइकांन सांगितलं.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDeathमृत्यूPoliceपोलिस