शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सायन - पनवेल महामार्गावर ठिय्या आंदोलन; वाहनांची तोडफोड, पोलिसांना मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 15:09 IST

परिस्थिती नियंत्रणाबाहेर असून वाहनांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली जात आहे. 

ठळक मुद्देपांचाराम रिठाडिया असं अपहृत मुलीचे वडिलांचे नाव आहे. प्रकरण चिघळत चालले असून आंदोलकांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आलेल्या पोलिसांना मारहाण केली आहे.

मुंबई - १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्यानंतर नैराश्येतून  कुर्ला परिसरात ४८ वर्षीय पित्याने लोकलखाली जाऊन आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. पांचाराम रिठाडिया असं अपहृत मुलीचे वडिलांचे नाव आहे. या प्रकरणी वडाळा रेल्वे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. मात्र, पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलीचा अद्याप शोध लावलेला नाही म्हणून स्थानिकांनी कुर्ला सिग्नल रोखून धरला. तर आंदोलकांनी सायन - पनवेल महामार्गावर ठिय्या आंदोलन पुकारले. प्रकरण चिघळत चालले असून आंदोलकांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आलेल्या पोलिसांना मारहाण केली आहे. तसेच वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर असून वाहनांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली जात आहे. 

कुर्ला येथील ठक्कर बापा कॉलनी पांचाराम रिठाडिया हे मागील दोन मुले, मुलगी आणि पत्नीसोबत रहात होते. घरात एकटी मुलगी असल्यामुळे पांचाराम यांचा तिच्यावर जीव होता. लहानपणापासून इतर भावंडापैकी ते तिचे लाड जास्त करायचे. मुलगी आता काँलेजला जाऊ लागली होती. त्यामुळे तिच्या वागणूकीत बद्दल पंचाराम यांच्या व्यतिरिक्त घरातील इतर सदस्यांना जाणवत होता. वारंवार चोरून मोबाइलवर बोलणे, कॉलेजहून उशिरा येणे हे सर्वांनी हेरल होतं. मात्र पांचाराम यांचा मुलीवर असलेल्या विश्वासामुळे त्यांनी ही गोष्ट फारशी गांभीर्याने घेतली नाही. काही महिन्यांपूर्वी त्याची १७ वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली. मुलीचा शोध घेऊनही तिचा काही थांगपत्ता लागत नसल्यामुळे पंचाराम याने नेहरूनगर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मुलगी गेल्यामुळे पांचाराम हे दुखी होते. मात्र, पोलिसांना मुलीचा थांगपत्ता लागला नाही. अखेर टोकाचे पाऊल उचलले. पांचाराम यांनी हार्बर मार्गावरील टिळकनगर रेल्वेस्थानकजवळ धावत्या लोकलखाली स्वतःला झोकून आत्महत्या केली. या घटनेने पडसाद आता उमटू लागले आहे. संतप्त स्थानिकांनी सायन - पनवेल महामार्ग रोखला आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत. 

चेंबूर पोलीस ठाण्यात चौकशीची प्रक्रिया सुरु 

नेहरूनगर‌ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून निघालेली अंत्ययात्रा चेंबुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमरशी बाप्पा चौक येथे आल्यानंतर त्यातील काही लोकांनी चौकात रस्त्यात बसून रस्ता रोको‌ करू लागले. त्यांना पोलीसांनी विरोध केला असता त्यातील काही लोकांनी प्रक्षोभक होवून पोलीसांवर हल्ला केला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि या हल्ल्यात पोलीस गंभीर जखमी झाले. त्यावेळी आवश्यकता भासल्याने पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला असल्याची माहिती चेंबूर पोलिसांनी दिली आहे. तसेच याप्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची देखील माहिती चेंबूर पोलिसांनी दिली. 

टॅग्स :agitationआंदोलनKurlaकुर्लाMumbaiमुंबईPoliceपोलिस