शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

रानडुक्करांच्या शिकारीनंतर 'अविनाश'ने मारली 'टायगर हंटींग'ची मजल; विविध साहित्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2022 13:53 IST

वन कोठडी दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपीकडून वाघाला ठार करण्यासाठी वापरण्यात आलेले विविध साहित्य जप्त केले आहे.

- महेश सायखेडे 

वर्धा : शेत शिवारातील तारेच्या कुंपनात विद्युत प्रवाहित करून छुप्या पद्धतीने रानडुक्करांची शिकार करूनही वनविभागाच्या गळाला न लागल्यामुळे मनोधैर्य वाढलेल्या अविनाश भारत सोयाम (३४) रा. महालगाव (खुर्द) ता. वरोरा जि. चंद्रपूर याने जंगली वराहांना ठार करण्यासाठी वापरलेल्या युक्तीचा वापर थेट वाघाची शिकार करण्यासाठी केल्याचे वनविभागाच्या चौकशीत पुढे आले आहे. वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील कोरा नजीकच्या मौजा पवनगाव शिवारातील झुडपी जंगलात तुकड्या तुकड्यांतील वाघाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्यावर वनविभागही ॲक्शनमोडवर आला.

शिकारीचा अंदाज बाळगून वनविभागाने अवघ्या काही तासांतच या गुन्ह्याचा छडा लावत पट्टेदार वाघाची शिकार करीत वाघाच्या मृतदेहाचे तुकडे करणारा मुख्य आरोपी अविनाश भारत सोयाम याला अटक करीत त्याची तीन दिवसीय वन कोठडी मिळविली आहे. वन कोठडी दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपीकडून वाघाला ठार करण्यासाठी वापरण्यात आलेले विविध साहित्य जप्त केले आहे. यात लोखंडी तार, वायर, अवैध वीज जोडण्यासाठी वापरण्यात येणारा आकडा आदीचा समावेश आहे. या गुन्ह्यात मुख्य आरोपीला आणखी काही व्यक्तींनी सहकार्य केल्याचा अंदाज वनविभागाला असून गोपनीय पद्धतीने माहिती घेत इतर आरोपींचा शोध सध्या वनविभागाचे अधिकारी घेत आहेत.

अविनाशकडे आहे दहा एकर शेती

तारेच्या कुंपनात विद्युत प्रवाहित करून वाघाची शिकार करून वाघाच्या मृतदेहाचे तुकडे करीत त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न झाल्या प्रकरणी वनविभागाने चंद्रपूर जिल्ह्यातील अविनाश सोयाम याला अटक केली आहे. अविनाश याने ज्या ठिकाणी वाघाची शिकार केली ती मौजा महालगाव सर्वे क्रमांक ८२ व ८३ ही शेतजमीन सोयाम याच्या नावाने आहे. या एकूण दहा एकर शेत जमिनीवर सोयाबीन व कपाशीची लागवड करण्यात झाली आहे, हे विशेष.

महावितरणकडून प्राप्त झाला अहवाल

या गुन्ह्याच्या संदर्भातील अधिकची ठोस तांत्रिक माहिती मिळावी या उद्देशाने समुद्रपूर वनविभागाच्या वतीने महावितरणकडे काही माहिती मागितली. महावितरणकडून तांत्रिक माहिती संदर्भातील अहवाल समुद्रपूर वनविभागाला प्राप्त झालेला आहे. हा अहवाल या गुन्ह्याच्या संदर्भाने महत्त्वाचाच असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.आरोपीचे पाहिजे तसे सहकार्य नाहीच

वाघाची शिकार करून वाघाच्या मृतदेहाची निर्दयतेने तुकडे करणारा अविनाश भारत सोयाम सध्या वनकोठडीत असून त्याच्याकडून वनविभागाचे अधिकारी गुन्ह्याच्या संदर्भातील अधिकची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. पण आरोपी तपासी अधिकाऱ्यांना पाहिजे तसे सहकार्यच करीत नसल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.

आरोपीने तीन ठिकानांचा केला वापर

वरोरा तालुक्यातील मौजा महालगाव सर्वे क्रमांक ८२ व ८३ मधील शेतजमिनीवरील तारेच्या कुंपनात विद्युत प्रवाहित करून पट्टेदार वाघाची शिकार केली. त्यानंतर आरोपीने वाघाचा मृतदेह याच मौजातील ८१ क्रमांकाच्या पडीक शेतजमिनीवर नेला. तेथे सुरूवातीला वाघाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. पण यश न आल्याने वाघाचा मृतदेह थेट वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील कोरा नजीकच्या पवनगाव मौजातील झुडपी जंगलात आणल्याचे आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.

टॅग्स :TigerवाघPoliceपोलिस