शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

बॉम्बस्फोटानंतर केला जावयाला फोन अन् दहशतवादी कमालचा किस्सा खतम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 19:44 IST

Terrorist Kamal Died due to corona : मुंबईत ११ मिनिटांत सात स्फोट; १८९ जणांचे बळी अन् ८२४ जखमी

ठळक मुद्देसहा वर्षांपासून सरकारी भत्त्यावर जगणाऱ्या कमालवर कोरोनाने घाव घातला अन् सोमवारी त्याचा किस्सा खतम केला.

नरेश डोंगरे 

नागपूर : मुंबईच्या जीवनवाहिनीत मृत्यूचे तांडव घडवून १८९ जणांचे बळी घेणाऱ्या दहशतवादी कमाल अहमद अंसारीने नंतर आपल्या जावयाला फोन करून ही माहिती कळविली. तोच धागा पकडून एटीएसने त्याच्या मुसक्या आवळल्या अन् त्याला फाशी यार्डमध्ये पोहचवले. येथे सहा वर्षांपासून सरकारी भत्त्यावर जगणाऱ्या कमालवर कोरोनाने घाव घातला अन् सोमवारी त्याचा किस्सा खतम केला.

गेल्या नऊ दिवसांपासून मेडिकलमध्ये कोरोनाचा उपचार घेत असलेला दहशतवादी कमाल अंसारी (५०) याचा सोमवारी पहाटे १ च्या सुमारास मृत्यू झाल्याने अंगावर शहारे आणणाऱ्या मुंबईस्फोट मालिकेच्या आठवणी पुन्हा एकदा चर्चेला आल्या. इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी ११ जुलै २००६ ला मुंबईच नव्हे, तर देश हादरवला होता. सायंकाळच्या वेळी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांमध्ये अवघ्या ११ मिनिटांत सात बॉम्बस्फोट घडवून त्यांनी १८९ जणांचे बळी घेतले, तर ८२४ प्रवाशांना जीवघेण्या जखमा दिल्या होत्या. या स्फोटाचा तपास त्यावेळी मुंबई पोलिसांच्या मदतीने दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सुरू केला. तपासासाठी सात पथके नेमली. रॉ तसेच सीबीआयचीही मदत घेण्यात आली होती. तपास पथकांनी सुमारे ४०० जण ताब्यात घेतले. एका प्रेशर कूकर विक्रेत्याने आरोपींचा धागा दिला. त्यानंतर १८ ते २० जुलैला बिहारचा रहिवासी कमाल अहमद अंसारी याच्या तपास पथकाने मुसक्या आवळल्या. साखळी स्फोटाच्या थराराची कथा कमालने त्याचा जावई मुमताज चाैधरीला फोन करून ऐकवली होती. हे टेलिफोनवरील संभाषण हाती लागल्यानेच कमालच्या मुसक्या आवळल्या अन् नंतर एका पाठोपाठ १३ जणांना अटक करण्यात आली. त्यात इंडियन मुजाहिदीनचे काही दहशतवादीही होते.

जिहादच्या नावाने ब्रेन वॉश केल्यानंतर मूळचा बिहारचा रहिवासी असलेला कमाल अहमद अंसारी सैतानच बनला होता. त्यानेच आपल्या साथीदारांच्या माध्यमातून मुंबईच्या जीवनवाहिनीत मृत्यूचे तांडव घडवल्याचे तपास पथकाला सांगितले होते. पुढे मोक्का न्यायालयाने २०१५ मध्ये १३ आरोपींपैकी कमाल अंसारीसह पाच जणांना फाशी, तर सात जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. 

२०१५ पासून नागपुरातफाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याने कमाल अंसारी याला २०१५ मध्येच मुंबईतून नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात हलविवण्यात आले होते. तेव्हापासून तो येथेच होता. त्याला कधी फासावर टांगले जाईल, याबाबत कुणाकडेच माहिती नव्हती. मात्र, कोरोनाने त्याला ९ एप्रिलला विळखा घातला अन् अवघ्या नऊ दिवसांत त्याच्याभोवतीचा पाश घट्ट करीत सोमवारी त्याचा किस्सा खतम केला.

टॅग्स :terroristदहशतवादीBlastस्फोटMumbaiमुंबईnagpurनागपूरcorona virusकोरोना वायरस बातम्याjailतुरुंगIndian Mujahideenइंडियन मुजाहिदीन