शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

लग्नाच्या दीड महिन्यानंतर नवविवाहितेला कारसाठी टाकले मारून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 21:34 IST

Dowry Case :नववधूच्या हातावरची मेहंदीचा रंगही फिका पडला नव्हता आणि तिच्या मृत्यूच्या बातमीने तिचे कुटुंबीय हादरून गेले आहे.

हाजीपूर- बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील हाजीपूरमध्ये हुंड्यासाठी हत्या केल्याची घटना समोर आली आहे. महिलेची हत्या केल्याचा आरोप तिच्या सासरच्या मंडळींनी केला आहे. विजया कुमारी उर्फ ​​निधी कुमारी यांचे दीड महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. नववधूच्या हातावरची मेहंदीचा रंगही फिका पडला नव्हता आणि तिच्या मृत्यूच्या बातमीने तिचे कुटुंबीय हादरून गेले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, 10 फेब्रुवारीला वैशालीच्या लालगंज पोलीस स्टेशन हद्दीतील रौडी पोखर गावातील बबन सिंह यांनी आपली मुलगी विजया कुमारी उर्फ ​​निधी कुमारी हिचा विवाह सराई पोलीस स्टेशन हद्दीतील शंभूपूर कोअरी गावातील रहिवासी रणवीर सिंहसोबत केला होता. लग्नात भेट म्हणून पाच लाख रोख, दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ९४ हजार पाचशे रुपये किमतीची मोटारसायकल आणि सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे घरगुती साहित्य दिले. मात्र, विजयासोबतच तिच्या सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी चारचाकी (कार) साठी तिला मारहाण व छळ करण्यास सुरुवात केली.पीडित मुलगी तिच्या आईला फोनवरून छळाची माहिती देत ​​असे. मृताच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा फोन आला. मुलीचे संपूर्ण कुटुंब तात्काळ  मुलीच्या घरी पोहोचले, तेव्हा विजयाचा मृतदेह जमिनीवर पडला होता. तिच्या मानेवर खोलवर खुणा होत्या. त्याचवेळी मुलीचे सासरचे लोक घर सोडून फरार झाले आहेत. विजयाच्या वडिलांनी माहिती दिल्यानंतर, सराई पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि तिचा मृतदेह त्यांच्या ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी हाजीपूर सदर रुग्णालयात पाठवला.नवविवाहित मुलीच्या हत्येनंतर तिच्या घरात हाहाकार माजला आहे. बबन सिंग यांनी आपल्या मुलीच्या सासरच्या मंडळींवर हत्येचा आरोप करत सराई पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास करून आरोपींना अटक करण्यासाठी छापेमारी सुरू असल्याचे सराई पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी म्हणाले.

टॅग्स :dowryहुंडाBiharबिहारPoliceपोलिसcarकारmarriageलग्न