शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

अ‍ॅसिड हल्ला करणारा आरोपी अद्याप मोकाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 20:24 IST

पुरावे नसल्याने पोलिसांपुढे आव्हान, निकटवर्तीयांचे जबाब नोंदविणे सुरू

ठळक मुद्देदोघांच्या निकटवर्तीयांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. उपचारापूर्वीच  तिवारी यांचा मृत्यू झाला तर सीमा विश्वकर्मा यांच्या हात आणि चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. हा हल्ला वैयक्तिक वैमन्यसातून घडला असावा अशी शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे.

 

वसई - वसईतील जोडप्यावर झालेल्या अ‍ॅसिड हल्ला प्रकरणी तीन दिवस उलटूनही पोलिसांना कसलाच सुगावा लागलेला नाही. हा हल्ला वैयक्तिक वैमनस्यातून झाला आहे का याबाबत वालीव पोलिसांनी तपास कऱण्यास सुरवात केली असून दोघांच्या निकटवर्तीयांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दहिसर येथील कांदरपाडा येथे राहणारे अविनाश तिवारी (४१) हे सीमा अग्रवाल (३८) मंगळवारी रात्री हे दोघे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील एका हॉटेलात जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर ते रात्री अडीचच्या सुमारास मुंबईच्या दिशेने घरी जाण्यासाठी निघाले होते. तिवारी यांनी आपली दुचाकी विरूध्द दिशेच्या मार्गिकेवरून काढली आणि रस्ता ओलांडण्यासाठी थांबले होते. त्यावेळी अचानक समोर आलेल्या एका अज्ञात इसमाने दोघांवर अ‍ॅसिड फेकले. तिवारी लगेच जवळच्या पेट्रोलपंपाजवळ गेले आणि तिथे असलेल्या लोकांनी पाणी मारून  अ‍ॅसिडची तीव्रता कमी कऱण्याचा प्रयत्न केला. मात्र ते  अ‍ॅसिडमुळे गंभीर भाजल्याने त्या दोघांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच  तिवारी यांचा मृत्यू झाला तर सीमा विश्वकर्मा यांच्या हात आणि चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून रुग्णालयातून उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहेया घटनेला तीन दिवस उलटूनही पोलिसांना अद्याप कुठलाही सुगावा मिळालेला नाही. हे दोघे लिव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशीपमध्ये रहात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. घटनेचे सीसीटीव्ही मिळाले नाही. हल्ल्यासाठी वापरलेले अ‍ॅसिड हे तीव्र क्षमतेचे होते. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठिवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात तिवारी आणि विश्वकर्मा यांच्या निकटवर्तियांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. हा हल्ला वैयक्तिक वैमन्यसातून घडला असावा अशी शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसVasai Virarवसई विरारcctvसीसीटीव्ही