शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Accident: नव्याकोऱ्या कारमधील प्रवास ठरला अखेरचा, तीन सख्या भावांसह ५ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 16:28 IST

Accident News: राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यामध्ये नवी कार घेऊन कुटुंबीयांना न सांगता फिरायला गेलेलेल्या तीन सख्खा भावांसह पाच तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. अपघातामध्ये कारचा चेंदामेंदा झाला.

जयपूर - राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यामध्ये नवी कार घेऊन कुटुंबीयांना न सांगता फिरायला गेलेलेल्या तीन सख्खा भावांसह पाच तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. अपघातामध्ये कारचा चेंदामेंदा झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे यातील एका तरुणाचा आठवडाभरापूर्वीच विवाह झाला होता. अपघाताची माहिती समजताच मृतांच्या घरी शोकाकूल वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी मृतदेहांचा पोस्टमार्टेम करून ते कुटुंबीयांकडे सुपुर्द केले. या अपघातात या युवकांच्या कारवर आदळलेल्या बोलेरोमधील चार जण जखमी झाले आहेत.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक रघुवीर सिंह यांनी सांगितले की, हा भीषण अपघात जिल्ह्याती बरखेडा गावामध्ये बुधवारी रात्री झाला. तिथे एक कार आणि बोलेरो यांच्यात जोरदार टक्कर झाली. कारमध्ये पाच जण तर बोलेरोमध्ये चार जण होते. अपघातात सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत. यादरम्यान, पहाडी येथून गोपालगडला जात असलेल्या एएसआय बाबूलाल मीणा यांनी जखमींना पाहिले. त्यांनी त्यांना पहाडी सीएचसीमध्ये नेऊन दाखल केले. त्यानंतर पोलिसांनीही रुग्णालयात धाव घेतली.

उपचारादरम्यान, कारमधून प्रवास करत असलेल्या तरुणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी पाचही मृतांच्या मृतदेहांचं पहाडी येथील आरोग्य केंद्रावर पोस्टमार्टेम करून ते नातेवाईकांकडे सुपुर्द केले. मृतांमधील तिघे तरुण सख्खे भाऊ होते. तर चौथा मामेभाऊ आणि पाचवा त्यांचा भाचा होता. सर्व तरुणांचं वय हे १७ ते २५ दरम्यान होते. मृतांमधील अरबाज, परवेज, आणि वासिम हे सख्खे भाऊ होते. आलम हा त्यांच्या मामाचा मुलगा तर आशिक सख्ख्या बहिणीचा मुलगा होता.  

टॅग्स :AccidentअपघातRajasthanराजस्थान