शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Accident: वऱ्हाडाच्या गाडीला अपघात, तडफडत होते जखमी, पोलीस ठाण्यातील कर्मचारी म्हणाले, साहेब आता झोपलेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 15:33 IST

Accident News: रात्री २ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पोलिसांना याची खबर देण्यात आली. मात्र पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले नाहीत, असा आरोप करण्यात येत आहे.

रांची - झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पोलिसांचा कर्तव्यात कसूर करणारा चेहरा समोर आला आहे. गिरिडीह जिल्ह्यातील गडकुरा गावाजवळ वऱ्हाड्यांनी भरलेली गाडी अनियंत्रित होऊन उलटली. गाडी उलटल्याने सुमारे पाच-सहा जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आले. या घटनेबाबत सांगण्यात आले की, पडरिया गावातून पपिलो गावामध्ये वऱ्हाड जात होते. तेवढ्यात हा अपघात झाला. रात्री २ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पोलिसांना याची खबर देण्यात आली. मात्र पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले नाहीत, असा आरोप करण्यात येत आहे.

अपघाताची माहिती देण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधला असता. पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले की, साहेब आता झोपले आहेत. त्यांच्या उठण्याची वेळ सकाळी आठ वाजताची आहे. दरम्यान, अपघातानंतर जखमी प्रवासी वाहनाखाली अडकून तडफडत होते. मात्र पोलीस घटनास्थळी वेळीच पोहोचले नाहीत. त्यानंतर ग्रामस्थांनी जखमींना बाहेर काढून उपचारांसाठी रुग्णालयात पाठवले. तर उलटलेल्या गाडीला उचलण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली.

अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, गाडीचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. त्यामुळे ही घटना घडली आहे. मात्र जेव्हा अपघाताचाची माहिती तिसरी पोलीस ठाण्यातील पोलिसांना देण्यात आली तेव्हा पोलीस प्रशासन तिथे पोहोचले नाही. त्यामुळे स्थानिकांनी पोलीस प्रशासनाचा निषेध केला.

ग्रामस्थांनी सांगितले की, आम्हीच जेसीबी आणले आणि गाडीला उचलून दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये पाठवले. तर जखमींना उपचार करण्यासाठी खोरी यमहुआ येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. तसेच ज्यांची प्रकृती गंभीर होती त्यांनी धरबाद येथे पाठवण्यात आले.  

टॅग्स :AccidentअपघातJharkhandझारखंडPoliceपोलिस