शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

महिलेचे अपहरण, हत्या करणारा चोरीच्या कारमधून पळाला; जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 19:44 IST

त्याला न्यायालयात हजर केले असता ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

ठळक मुद्देआरोपीचे नाव अशोककुमार कोनार (४२) असून तो तामिळनाडूचा आहे. कारची नंबरप्लेट बदलून तो अनेक दिवसांपासून वापरत होता.

नवी मुंबई : कारमध्ये बसलेल्या महिलेचे कारसह अपहरण करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल, दोन मॅगझिन व नऊ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तो सराईत गुन्हेगार असून त्याने लुटीच्या उद्देशानेच महिलेचे अपहरण करून हत्या केल्याची कबुली दिली आहे. मात्र, याबाबत पोलिसांना अद्यापही संशय असल्याने अधिक तपास सुरू आहे. आरोपीचे नाव अशोककुमार कोनार (४२) असून तो तामिळनाडूचा आहे. त्याच्याविरोधात ५ चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

धक्कादायक! चोरटयांनी महिलेसह कार पळवली अन् तिच्यावर झाडली गोळी 

उलवे सेक्टर 19 येथे सोमवारी दुपारी ही घटना घडली होती. तेथील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत शेलगरचे रहिवासी बाळकृष्ण भगत हे पैसे काढण्यासाठी गेले होते. या वेळी त्यांच्या पत्नी प्रभावती भगत (56) ह्या कारमध्येच बसल्या होत्या. याच वेळी कार सुरू असल्याने व कारमध्ये प्रभावती ह्या एकटय़ाच बसल्या असल्याची संधी साधून एक जण कारमध्ये घुसला. त्याने कारसह प्रभावती यांचे अपहरण करून त्यांना सेक्टर 23 परिसरात नेले. त्या ठिकाणी प्रभावती यांच्यावर गोळी झाडून त्याने पळ काढला होता. या वेळी प्रभावती यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी एनआरआय पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी कसून तपासाला सुरुवात केली होती. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी परिमंडळ १, परिमंडळ २ तसेच गुन्हे शाखेची विविध पथके तयार करण्यात आली होती. त्यांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासासाठी मिळवले होते. त्याद्वारे संशयित आरोपीची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार बुधवारी संध्याकाळी खारघर परिसरात सापळा रचून एकाला ताब्यात घेण्यात आले. झडती वेळी त्याच्याकडे एक पिस्तूल, दोन मॅगङिान व नऊ काडतुसे आढळून आली. चौकशीत त्याचे नाव अशोककुमार मुर्गन कोनार (42) असल्याचे समोर आले. तसेच त्याने प्रभावती यांची हत्या केल्याचीही कबुली दिली. तसेच तोही उलवे सेक्टर 9 येथील राहणारा आहे. सखोल चौकशीअंती बुधवारी रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. त्याने लुटीच्या उद्देशानेच प्रभावती यांचे अपहरण करून पळ काढल्याची कबुली दिल्याचे उपायुक्त पंकज डहाणो यांनी सांगितले. तर या प्रकरणी अधिकही चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. गुन्ह्यानंतर तो ज्या कारने उलवे परिसरातून पळाला होता, त्याच कारसह तो खारघरमध्ये आढळून आला. ही कार त्याने वाशी परिसरातून चोरली होती. त्यानंतर कारची नंबरप्लेट बदलून तो अनेक दिवसांपासून वापरत होता.

टॅग्स :ArrestअटकKidnappingअपहरणMurderखूनPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई