शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

एक चिता अन् 7 मृतदेह! पत्‍नीच्या व्यभिचारानं पूर्णपणे उध्वस्त झालं हसतं-खेळतं कुटुंब, कॉल रेकॉडिंग बनले 'अणुबॉम्ब'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 12:21 IST

एका दाम्पत्याने 5 मुलांसह नर्मदेच्या कालव्यात उडी घेऊन जीवन यात्रा संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे....

सांचोर (जालोर) -राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात असलेल्या सांचोर येथे एका दाम्पत्याने 5 मुलांसह नर्मदेच्या कालव्यात उडी घेऊन जीवन यात्रा संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेत सातही जणांचा मृत्यू झाला. ही माहिती संपूर्ण परिसरात वाऱ्याप्रमाणे पसरली. एकाच वेळी 7 जणांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. एवढेच नाही, तर पोलिस-प्रशासनही हादरले. खरे तर, आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करणार्‍या व्यक्तीने एवढे भयंकर पाऊल कसे उचलले हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र आता या प्रकरणाचा उलगडा होऊ लागला आहे. या भीषण घटनेमागील धक्कादायक कहाणी आता समोर आली आहे. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.

ही खळबळजनक घटना 1 मार्च 2023 रोजी घडली. याच दिवशी शंकर राम उर्फ ​​शंकरा कोळी याचे पत्नी बादली सोबत भांडणही झाले होते. या दाम्पत्याला तीन मुली आणि दोन मुलं अशी 5 अपत्य होती. शंकर पत्नी बादली आणि मुलांसह सिद्धेश्वरला गेला होता. यानंतर शंकरने कुटुंबासह नर्मदेच्या कालव्यात उडी घेतल्याची बातमी येऊन धडकली. घाई गडबडीत ही माहिती पोलिसांनाही देण्यात आली. घटनेची माहिती मुळताच जिल्हाधिकारी-एसपी पथकासह घटनास्थळी पोहोचले. यानंतर गोताखोरांनी एक-एक करून 7 ही मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी मृताच्या भावाने शेजारीच राहणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे.

पत्‍नीचे परपुरुषाशी संबंध? -मिळालेल्या माहितीनुसार, शंकरची पत्नी बादली शेजारीच राहणाऱ्या एका तरुणासोबत मोबाईलवर बोलत असल्याचा संशय शंकरला आला होता. यामुळे त्याने एक दिवस चोरून तिच्या मोबाईलचे रेकॉर्डिंग अॅक्टिव्ह मोडवर केले. यानंतर जेव्हा शंकरने संपूर्ण रेकॉर्डिंग ऐकले तेव्हा संपूर्ण सत्य समोर आले. यासंदर्भात शंकरने पत्नीलाही समजावून सांगितले होते. एवढेच नाही, तर हे प्रकरण वाढल्यानंतर सामाजिक पातळीवरही तिला समजावून सांगण्यात आले. यानंतरही शंकरच्या पत्नीने संबंधित तरुणाशी बोलणे सुरूच होते. यासंदर्भात एकदा पंचायतही झाली, यात संबंधित तरूण भविष्यात असे करणार नाही, असे ठरले. मात्र या सर्व गोष्टींचा काहीही उपयोग झाला नाही.

महिलेच्या प्रियकराचा उद्धटपणा -पंचायत आणि सामाजिक पातळीवर समजावल्यानंतरही महिलेच्या प्रियकराने शंकरला फोन करून धमकी दिल्याचा आरोपही आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, आरोपी तरुण शंकरला म्हणाला, पंचायत करून काय मिळवले. यानंतर शंकरच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. शंकरने 1 मार्च रोजी पत्नी आणि मुलांसह नर्मदेच्या कालव्यात उडी घेतली. या घटनेत सर्वांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे पत्नीच्या व्यभिचारामुळे हसते खेळते कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhusband and wifeपती- जोडीदार