शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

एक चिता अन् 7 मृतदेह! पत्‍नीच्या व्यभिचारानं पूर्णपणे उध्वस्त झालं हसतं-खेळतं कुटुंब, कॉल रेकॉडिंग बनले 'अणुबॉम्ब'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 12:21 IST

एका दाम्पत्याने 5 मुलांसह नर्मदेच्या कालव्यात उडी घेऊन जीवन यात्रा संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे....

सांचोर (जालोर) -राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात असलेल्या सांचोर येथे एका दाम्पत्याने 5 मुलांसह नर्मदेच्या कालव्यात उडी घेऊन जीवन यात्रा संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेत सातही जणांचा मृत्यू झाला. ही माहिती संपूर्ण परिसरात वाऱ्याप्रमाणे पसरली. एकाच वेळी 7 जणांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. एवढेच नाही, तर पोलिस-प्रशासनही हादरले. खरे तर, आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करणार्‍या व्यक्तीने एवढे भयंकर पाऊल कसे उचलले हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र आता या प्रकरणाचा उलगडा होऊ लागला आहे. या भीषण घटनेमागील धक्कादायक कहाणी आता समोर आली आहे. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.

ही खळबळजनक घटना 1 मार्च 2023 रोजी घडली. याच दिवशी शंकर राम उर्फ ​​शंकरा कोळी याचे पत्नी बादली सोबत भांडणही झाले होते. या दाम्पत्याला तीन मुली आणि दोन मुलं अशी 5 अपत्य होती. शंकर पत्नी बादली आणि मुलांसह सिद्धेश्वरला गेला होता. यानंतर शंकरने कुटुंबासह नर्मदेच्या कालव्यात उडी घेतल्याची बातमी येऊन धडकली. घाई गडबडीत ही माहिती पोलिसांनाही देण्यात आली. घटनेची माहिती मुळताच जिल्हाधिकारी-एसपी पथकासह घटनास्थळी पोहोचले. यानंतर गोताखोरांनी एक-एक करून 7 ही मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी मृताच्या भावाने शेजारीच राहणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे.

पत्‍नीचे परपुरुषाशी संबंध? -मिळालेल्या माहितीनुसार, शंकरची पत्नी बादली शेजारीच राहणाऱ्या एका तरुणासोबत मोबाईलवर बोलत असल्याचा संशय शंकरला आला होता. यामुळे त्याने एक दिवस चोरून तिच्या मोबाईलचे रेकॉर्डिंग अॅक्टिव्ह मोडवर केले. यानंतर जेव्हा शंकरने संपूर्ण रेकॉर्डिंग ऐकले तेव्हा संपूर्ण सत्य समोर आले. यासंदर्भात शंकरने पत्नीलाही समजावून सांगितले होते. एवढेच नाही, तर हे प्रकरण वाढल्यानंतर सामाजिक पातळीवरही तिला समजावून सांगण्यात आले. यानंतरही शंकरच्या पत्नीने संबंधित तरुणाशी बोलणे सुरूच होते. यासंदर्भात एकदा पंचायतही झाली, यात संबंधित तरूण भविष्यात असे करणार नाही, असे ठरले. मात्र या सर्व गोष्टींचा काहीही उपयोग झाला नाही.

महिलेच्या प्रियकराचा उद्धटपणा -पंचायत आणि सामाजिक पातळीवर समजावल्यानंतरही महिलेच्या प्रियकराने शंकरला फोन करून धमकी दिल्याचा आरोपही आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, आरोपी तरुण शंकरला म्हणाला, पंचायत करून काय मिळवले. यानंतर शंकरच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. शंकरने 1 मार्च रोजी पत्नी आणि मुलांसह नर्मदेच्या कालव्यात उडी घेतली. या घटनेत सर्वांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे पत्नीच्या व्यभिचारामुळे हसते खेळते कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhusband and wifeपती- जोडीदार