शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आईला गळा दाबून मारलं, मग स्वत: गळफास घेतला; चिठ्ठी वाचून सर्वांना धक्काच बसला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 14:19 IST

कोल्हापूरमधील धक्कादायक घटना

आष्टा : वयोवृद्ध आईचा गळा आवळून खून करीत मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी आष्टा येथील दत्त वसाहतीमध्ये घडला. रतन रामचंद्र कांबळे (वय ८०) व शशिकांत रामचंद्र कांबळे (४७) अशी मायलेकांची नावे आहेत. घटनास्थळी शशिकांत यांनी लिहिलेली चिठ्ठी मिळाली असून, त्यामध्ये ‘दम्याच्या विकाराने निराश असल्याने आत्महत्या करीत आहोत. वयोवृद्ध आईस सांभाळण्यास कोण नसल्याने तिलाही घेऊन जात आहे,’ असे म्हटले आहे.

शशिकांत यांचे वडील रामचंद्र व आई रतन दोघेही प्राथमिक शिक्षक होते. त्यांचे वडील, भाऊ, भावजय व बहिणीचे निधन झाले आहे. त्यांचे आष्ट्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर कापड दुकान आहे. मंगळवारी त्यांची पत्नी मुलांसह माहेरी गेली हाेती. दिवसभर घरी शशिकांत व त्यांची आई हे दाेघेच हाेते.

शशिकांत यांना दम्याचा आजार आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते तणावाखाली हाेते. या नैराश्यातून त्यांनी कॉटवर विश्रांती घेत असलेल्या आईचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला. यानंतर दुसऱ्या खोलीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस