शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

फटाके फोडल्याने तामिळनाडूत ७ जणांना अटक; २०० हून अधिक  जणांवर गुन्हे दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 18:47 IST

तामिळनाडूमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून घालून दिलेली वेळ न पाळता फटाके फोडल्याने २०० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ७ जणांना अटक करण्यात आली. 

नवी दिल्ली - दिवाळी सणाचा उत्साह आणि आनंद देशभरात ओसंडून वाहताना दिसत आहे. मात्र, या सणाला वेळ न पाळता फटाके फोडल्याने गालबोट लागले आहे. तामिळनाडूमध्येसर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून घालून दिलेली वेळ न पाळता फटाके फोडल्याने २०० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ७ जणांना अटक करण्यात आली. 

मंगळवारी सायंकाळी ६ वाजता फटाके फोडताना आढळून आल्याने तामिळनाडू पोलिसांनी कडक पावलं उचलत हे गुन्हे दाखल केले आहेत. कारण तामिळनाडू सरकारने सकाळी ६ ते ७ आणि सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत फटाके फोडण्यासाठी वेळेचे बंधन घालून दिले आहे. मात्र तरी देखील वेळेबाहेर फटाके फोडल्याने पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तामिळनाडू राज्यात सर्वात जास्त गुन्हे हे विल्लूपुरम जिल्ह्यात दाखल झाले आहेत. या जिल्ह्यात ८० लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वीरूधुनगर पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४० लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तर कोईम्बतूर येथे ३० आणि दिंडीगुलमध्ये २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमक्कल पोलिसांनी एकाला अटक केली असून तिरुनेलवेली पोलिसांनी ६ जणांना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बेड्या ठोकल्या. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून या सर्वांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCrackersफटाकेSupreme Courtसर्वोच्च न्यायालयTamilnaduतामिळनाडूArrestअटक