शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

४७७ हरवलेल्या, घरातून पळालेल्या मुलांची केली सुटका; पालकांशी पुन्हा भेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 20:19 IST

477 missing, runaway children rescued : मध्य रेल्वेच्या आरपीएफ स्टाफची उल्लेखनीय कामगिरी

ठळक मुद्देमध्य रेल्वेवरील रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवरील ३१० मुले आणि १६७ मुलींचा समावेश आहे आणि चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र आणण्यात आले.  

डोंबिवली: रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या ७ महिन्यांत मध्य रेल्वेवरील स्थानकांच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरून ४७७ मुलांना शोधले, काहींना विविध ठिकाणामधून सोडवले आणि त्यांच्या पालकांशी पुन्हा भेट घडवून आणली. यामध्ये मध्य रेल्वेवरील रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवरील ३१० मुले आणि १६७ मुलींचा समावेश आहे आणि चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र आणण्यात आले.  

त्यापैकी बरेच जण काही भांडणे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगल्या आयुष्याच्या किंवा ग्लॅमरच्या शोधात, त्यांच्या कुटुंबीयांना न कळवता रेल्वे स्टेशनवर आले होते.  प्रशिक्षित रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना ते प्लॅटफॉर्मवर किंवा रेल्वे स्थानकांजवळ किंवा कधीकधी गाड्यांमध्येही फिरताना आढळले.  अनेक पालक रेल्वेच्या या उत्कृष्ट सेवेबद्दल मनापासून कृतज्ञता आणि आभार व्यक्त करतात.  या कामगिरीबाबत महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, मध्य रेल्वे पळून गेलेल्या मुलांशी संपर्क साधून, त्यांच्या समस्या समजून घेऊन आणि त्यांच्या कुटुंबासोबत जाण्यासाठी समुपदेशन करून सामाजिक जबाबदारीची भूमिका बजावते.  त्यांनी आरपीएफ आणि फ्रंटलाईन स्टाफचे कौतुक केले जे अशा प्रकरणांतील गांभीर्य ओळखून आणि समुपदेशक म्हणून त्वरित कारवाई करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. 

जानेवारी ते जुलै २०२१ पर्यंत बचावलेल्या मुलांचे विभागवार विभाजन बाबत पोलिसांनी सांगितले की, मुंबई विभाग १६६ मुले (१०४ मुले आणि ६२ मुली). भुसावळ विभाग ७० मुले (३९ मुले आणि ३१ मुली). नागपूर विभाग ४० मुले (२२ मुले आणि १८ मुली). पुणे विभाग १७१ मुले (१३० मुले आणि ४१ मुली). सोलापूर विभाग ३० मुले (१५ मुले आणि १५ मुली).

केवळ जुलै २०२१ मध्ये ७३ मुलांची (४७ मुले आणि २६ मुली) सुटका करण्यात आली आणि  त्यांच्या पालकांसोबत पुन्हा एकत्र आणण्यात आले. यापैकी एका प्रकरणात  २४ जुलै रोजी कर्तव्यावरील ट्रेन तिकीट परीक्षक (टीटीई) नरेंद्र मिश्रा यांना एक १७ वर्षांची, अल्पवयीन मुलगी ट्रेन क्र. 03201 मध्ये कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान एकटी प्रवास करताना आढळली.  लोकमान्य टिळक टर्मिनसवर पोहोचल्यावर, टीटीईने तिला ड्युटीवर असलेल्या महिला आरपीएफ  बी. पाटीदार आणि चाईल्डलाइन संस्थेच्या शारदा कांबळे यांच्याकडे सोपवले.  चाइल्ड लाइन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आरपीएफ उपनिरीक्षक बबलू कुमार यांनी तीची चौकशी केली असता तीने तिचे नाव शीतल (नाव बदलले आहे) असल्याचे सांगितले.  ती बिहारच्या पाटणा येथे राहते आणि मुंबईत मॉडेलिंग, अभिनयामध्ये करिअर करण्यासाठी कोणालाही न सांगता घरातून पळून आली असल्याचेही तीने सांगितले.  पुढील कारवाईसाठी चाइल्डलाइन कर्मचारी  शारदा कांबळे आणि महिला आरपीएफ कॉन्स्टेबल पूनम तिवारी यांनी या मुलीला बालसुधार गृह, डोंगरी यांच्याकडे पाठवण्यात आले.

 दुसऱ्या एका घटनेत, मेहबूबनगर जिल्ह्यातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या आईने तिला फटकारल्यानंतर  घरातून पळून  विशेष ट्रेन क्र.  06524 निजामुद्दीन- पुणे यशवंतपूर एक्सप्रेस या गाडीने आली.  आरपीएफ कॉन्स्टेबल शशिकांत जाधव आणि महिला कॉन्स्टेबल पी श्रीवास यांना  14 जुलै रोजी हडपसर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर ती सापडली.  चौकशी केल्यावर मुलीने तिचे नाव गीतांजली (नाव बदलले) उघड केले ती फक्त तेलगू बोलू शकते.  तिने दिलेल्या नंबरवर तिच्या काकांशी संपर्क साधला.  त्यानंतर, आरपीएफ कॉन्स्टेबल जाधव आणि लेडी कॉन्स्टेबल पी श्रीवास यांनी पुढील कारवाईसाठी मुलीला साथी या सामाजिक संस्थेकडे सोपवल्याचे जनसंपर्क विभागाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.

टॅग्स :Missingबेपत्ता होणंcentral railwayमध्य रेल्वेPoliceपोलिसdombivaliडोंबिवलीrailwayरेल्वे