शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

माणुसकीला काळीमा! आंध्र प्रदेशात 300 भटक्या श्वानांना विष देऊन मारलं, घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 11:53 IST

300 stray dogs killing poison in andhra pradesh west godavari village : आंध्र प्रदेशमधील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातल्या एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशातच आंध्र प्रदेशमधील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातल्या एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. शेक़डो भटक्या श्वानांना विष देऊन मारण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लिंगापालेम गावात 300 हून अधिक श्वानांना विष देऊन मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी प्राणी मित्र संघटनांनी लिंगापालेम गाव पंचायतीला जबाबदार धरलं आहे. श्वानांना दफन करत असताना ही घटना उघड झाली.

फाइट फॉर अ‍ॅनिमल्स एक्टिविस्ट ललिता यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच पोलीस देखील अधिक तपास करत आहेत. ललिता यांनी ग्राम पंचायतीने श्वानांची नसबंदी करण्याऐवजी त्यांना मारण्याचा निर्णय घेतला आणि विषाचं इंजेक्शन देऊन मारून टाकलं असं म्हटलं आहे. तसेच त्या गावात गेल्या होत्या. तिथे त्यांनी 300 हून अधिक श्वानांना दफन केलं जात असल्याचं पाहिलं. तसेच याचा एक व्हिडीओ देखील रेकॉर्ड केल्याचा दावा केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी धर्माजीगुडेम पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. ग्राम पंचायतीने मात्र ललिता यांचे हे गंभीर आरोप फेटाळून लावले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. पती-पत्नीतील भांडणाने एका चिमुकलीचा जीव घेतला आहे. माहेरी असलेल्या पत्नीने सोबत जाण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने आपल्याच आठ महिन्यांच्या बाळाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रागाच्या भरात पतीने बाळाला पत्नीच्या हातातून खेचून घेऊन जमिनीवर आपटलं, यानंतर बाळ गंभीररित्या जखमी झालं. मुलीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं मात्र डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केलं. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. 

भयंकर! पत्नीने सोबत येण्यास नकार दिल्याने पती झाला हैवान; 8 महिन्यांच्या लेकीला जमिनीवर आपटून घेतला जीव

बिजनौर मंडावली येथील रहिवासी असलेल्या नाजिमचं राहतपूरच्या मेहताबसोबत दीड वर्षापूर्वी लग्न झालं. दोघांना एक मुलगी होती. मात्र, पतीच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे मेहताबने पतीचं घर सोडलं आणि ती आपल्या माहेरी येऊन राहू लागली. नाजिम पत्नीला घेऊन जाण्यासाठी तिच्या माहेरी पोहोचला होता. त्याने पत्नीला आपल्यासोबत येण्यास सांगितलं. मात्र त्यावेळी देखील नाजिम नशेत असल्याने दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद सुरू झाला. मेहताबने पतीसोबत जाण्यास नकार दिला. याच कारणामुळे रागावलेल्या नाजिमने पत्नीच्या हातातून बाळ हिसकावून घेतलं आणि आठ महिन्यांच्या चिमुकलीला जोरात जमिनीवर आदळलं. या घटनेत आठ महिन्यांची चिमुकली गंभीर जखमी झाली. चिमुकलीला लगेचच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशdogकुत्रा