शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

2006 Varanasi Blast : तब्बल 16 वर्षांनंतर निकाल आला, दहशतवादी वलीउल्लाहला फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 17:44 IST

2006 Varanasi Blast: या स्फोटांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला होता असून 35 हून अधिक लोक जखमी झाले होते.

2006 Varanasi Blast: गाझियाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयाने (court) वाराणसीतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दहशतवादी वलीउल्लाहला फाशीची शिक्षा सुनावली आहे. बॉम्बस्फोटांना 16 वर्षांनी हा निर्णय आला आहे. वाराणसीतील संकट मोचन मंदिर आणि कँट रेल्वे स्थानकावर २००६ मध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला होता असून 35 हून अधिक लोक जखमी झाले होते. त्याच दिवशी संध्याकाळी दशाश्वमेध घाटावरही स्फोटके सापडली होती.

5 एप्रिल 2006 रोजी वाराणसी पोलिसांनी या प्रकरणी अलाहाबादमधील फुलपूर गावातील रहिवासी असलेल्या वलीउल्लाला लखनऊच्या गोसाईगंज परिसरातून अटक केली होती. दोषी वलीउल्लाहवर संकट मोचन मंदिर आणि वाराणसी कॅंट रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोटाचा कट रचणे, त्यांना आपला कट साध्य करण्यापर्यंत पोहोचवून दहशतवाद पसरवण्याचा आरोप ४ जून रोजी सिद्ध झाला आहे.

वाराणसीच्या वकिलांनी वलीउल्लाहचा खटला लढण्यास नकार दिला होता. यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने हे प्रकरण गाझियाबाद जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात वर्ग केले. तेव्हापासून गाझियाबाद येथील जिल्हा न्यायाधीश न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.

यापूर्वी 4 जून रोजी गाझियाबाद जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांच्या न्यायालयाने वलीउल्लाहला दोषी ठरवले होते. यापूर्वी 23 मे रोजी वाराणसी बॉम्ब प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांच्या न्यायालयात सुनावणी झाली होती. खटला सुरू होण्यापूर्वी आरोपी वलीउल्लाला कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निर्णयासाठी 4 जूनची तारीख निश्चित करण्यात आली.खरं तर, 7 मार्च 2006 रोजी वाराणसीतील संकटमोचन मंदिर आणि रेल्वे कॅन्टमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. बॉम्बस्फोटानंतर एकच गोंधळ उडाला. यासोबतच दशाश्वमेध घाटावर कुकर बॉम्ब सापडला आहे. संकट मोचन मंदिरात झालेल्या बॉम्बस्फोटात ७ तर कँट स्थानकात ११ जणांचा मृत्यू झाला होता.

वाराणसीतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी गाझियाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयाने  दहशतवादी वलीउल्लाहला फाशीची शिक्षा सुनावली आहे. बॉम्बस्फोटांना 16 वर्षांनी हा निर्णय आला आहे. वाराणसीतील संकट मोचन मंदिर आणि कँट रेल्वे स्थानकावर २००६ मध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला असून 35 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्याच दिवशी संध्याकाळी दशाश्वमेध घाटावरही स्फोटके सापडली होती.

टॅग्स :Blastस्फोटCourtन्यायालयPoliceपोलिसVaranasiवाराणसीDeathमृत्यूterroristदहशतवादी