शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नागपुरात कंटेनरमधून १.५९ कोटीच्या मोबाईलची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 11:53 PM

पांजरी टोल नाक्यावर उभ्या असलेल्या कंटेनगरमधून १.५९ कोटी रुपयांचे मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली आहे. तीन महिन्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपांजरी टोल नाक्यावरील घटना, तीन महिन्यानंतर झाला गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पांजरी टोल नाक्यावर उभ्या असलेल्या कंटेनगरमधून १.५९ कोटी रुपयांचे मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली आहे. तीन महिन्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथील रहिवासी चालक आदेश कुमार कथेरिया (३४) हा १० कोटी रुपयांचे मोबाईल घेऊन कंटेनर क्रमांक आर. जे. ११, जीबी-५६६६ ने हरियाणाला जात होता. कंटेनरमध्ये आदेश कुमार याच्या शिवाय दुसरे कुणीही नव्हते. आंध्रप्रदेशवरून रवाना झाल्यानंतर तो यवतमाळ मधील पांढरकवडा येथे पोहोचला. तेथे धाब्यावर भोजन केल्यानंतर तो झोपी गेला. काही वेळ आराम केल्यानंतर १८ मार्चला दुपारी बेलतरोडी ठाण्यांतर्गत पांजरी टोल नाक्यावर पोहोचला. तेथे आदेश कुमारने कंटनेरच्या टायरची हवा तपासली. त्याला कंटेनरचे सील आणि सेंटर लॉक तोडण्यात आल्याचे समजले. कंटेनरची तपासणी केली असता मोबाईल चोरीला गेल्याचे समजले. या घटनेची बेलतरोडी ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. आदेश कुमार काही वेळासाठीच पांजरीला उतरला होता. दरम्यान तो कंटेनरजवळ उभा होता. पांढरकवडा येथे कंटेनर बराच वेळ उभा होता. यामुळे हे प्रकरण यवतमाळ पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. पांढरकवडा पोलिसांनी त्यांच्या परिसरात चोरी झाली नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर बेलतरोडी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कंटेनरमधून ओप्पो कंपनीचे २३६० मोबाईल चोरी झाल्याची माहिती आहे. त्यांची किंमत १.५९ कोटी रुपये आहे. आता तीन महिन्यानंतर बेलतरोडी पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Mobileमोबाइलtheftचोरी