शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

'पोलिसाचे निधन झाल्यास 1 करोड अन् पोलिसांनी ठार मारल्यास 10 लाख'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 16:52 IST

संतप्त झालेल्या पत्नीने पतीच्या मृत्यूच्या आक्रोश करत पोलीस दलावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. जर माझा मुलगा पोलीस बनणार असेल तर त्याला का बनायला सांगू? लोकांच्या रक्षणासाठी असणाऱ्या पोलिसांनीच माझ्या पतीचा जीव घेतला.

ठळक मुद्दे पोलीस शहीद झाल्यास 1 कोटी आणि पोलिसांनी ठार केल्यास 10 लाख?, असा प्रश्न मिनाक्षी यांनी विचारला आहे. 

कानपूर – गुरुग्रामहून २ मित्रांसोबत गोरखपूरला फिरण्यासाठी आलेले कानपूरच्या व्यवसायिक मनिष गुप्ता यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. चौकशीचा विरोध करण्यावरुन पोलीस कर्मचाऱ्यांना मनिष गुप्ता यांना बेदम मारहाण केली. या घटनेनंतर मंगळवारी ४ वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन मनिषची पत्नी मिनाक्षी न्याय मागण्यासाठी पुढे आली आहे. पित्याच्या मृत्यूबाबत मुलाला काय सांगू? असा सवाल तिने केला आहे. तसेच, सरकारने देऊ केलेल्या 10 लाख रुपयांच्या मदतीवरही तिने प्रश्न उपस्थित केला आहे. 

मिनाक्षी यांनी पतीच्या निधनानंतर तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. बिकारु हत्याकांडमध्ये जे पोलीस शहीद झाले त्यांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची मदत देण्यात आली. पण, पोलिसांनी माझ्या निर्दोष पतीला ठार केले, तेव्हा 10 लाख रुपयांची मदत देतात. हा कुठला न्याय आहे. पोलीस शहीद झाल्यास 1 कोटी आणि पोलिसांनी ठार केल्यास 10 लाख?, असा प्रश्न मिनाक्षी यांनी विचारला आहे. 

संतप्त झालेल्या पत्नीने पतीच्या मृत्यूच्या आक्रोश करत पोलीस दलावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. जर माझा मुलगा पोलीस बनणार असेल तर त्याला का बनायला सांगू? लोकांच्या रक्षणासाठी असणाऱ्या पोलिसांनीच माझ्या पतीचा जीव घेतला. लोकांना ठार करण हे पोलिसांचे काम आहे का? मिनाक्षीच्या या प्रश्नाची उत्तरं कुणाकडेच नाहीत. माझ्या नवऱ्याला मारहाण करण्यात आली. कुठल्या कायद्यातंर्गत पोलीस चेकिंगच्या बहाण्याने अर्ध्या रात्री खोलीत घुसले आणि मारहाण करत पतीचा जीव घेतला. या प्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार करूनही न्याय मिळत नाही.

मिनाक्षीच्या पतीचा मृत्यू झाल्याचं त्याच्या मित्रांनी घरच्यांना सांगितले. तेव्हा पहाटे ५ वाजता ते तिथे पोहचले. मृतदेह पाहताच किती बेदम मारहाण झालीय त्याचा अंदाज येऊ शकतो. शरीरावर अनेक ठिकाणी जखमा दिसत होत्या. माझ्या पतीचा मृत्यू पडल्याने नाही तर मारहाणीत झालाय. मला न्याय हवाय असं मिनाक्षी सगळ्यांना ओरडून सांगत आहे. मनिषच्या घरी जेव्हा पोलिसांनी तपासणी केली तेव्हा त्यांनी स्थानिक भाजपा नेत्यांना फोन करून माहिती दिली. जबरदस्तीने पोलीस कर्मचाऱ्यांनी मनिषला पोलीस स्टेशनला नेले.

सपा नेत्यांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट

बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये मनिषची पत्नी मिनाक्षीला भेटण्यासाठी सपाचे नेते पोहचले होते. त्यांनी पीडित कुटुंबाला न्याय देण्याची मागणी करत दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी असं म्हटलं. या ३ मित्रांबाबत अशी कुठली माहिती आली ज्यामुळे पोलिसांनी अर्ध्या रात्री चेकिंग केली. तिसऱ्या मजल्यावरील रुममध्ये पोलीस का गेले? जर मनिष जखमी झाले असतील तर त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात न नेता खासगी रुग्णालयात का नेले? मनिषचा पडून मृत्यू झालाय असं पोलीस सांगतात मग शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्याच्या खूणा कुठून आल्या? मनिषच्या मृत्यूची माहिती पोलिसांनी न देता त्याच्या मित्रांनी का दिली? या प्रश्नांची उत्तरं मनिषा शोधत आहे.

प्रत्यक्षदर्शी मित्रानं काय सांगितले?

हॉटेलच्या रुममध्ये मित्रांसोबत असलेल्या हरदीप सिंहने सांगितले की, रात्री पोलीस चेकिंग करण्यासाठी खोलीत घुसले. तेव्हा प्रदीप, मनिष बेडवर झोपले होते. खोलीची बेल वाजल्यानंतर मी दरवाजा उघडला. आयडी मागितल्यावर आम्ही दिलं. मनिषला जाग आली तेव्हा तो म्हणाला आम्ही दहशतवादी दिसतोय का? पोलिसांना हीच गोष्ट खटकली आणि त्यांनी मनिषला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. तेव्हा मनिष तोंडावर खाली पडला. ज्यात त्याची अवस्था खराब झाली. त्याला घेऊन पोलीस नर्सिंग होमला गेले परंतु आम्हाला सोबत नेलं नाही असं मनिषच्या मित्रांनी सांगितले. आता मनिषची पत्नी त्याच्या मृत्यूबद्दल न्याय मागत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKanpur Policeकानपूर पोलीसPoliceपोलिस