शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

दहावी झाली आता पुढे काय? मुकबधिर विद्यार्थी व पालकांपुढील प्रश्न

By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST

पुणे : तल्लख बुध्दी असली तरी बोलता व ऐकू न येणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांपुढे दहावी झाली आता पुढे काय? हा प्रश्न पडला आहे. दहावीनंतर पुढे अकरावी-बारावी करून उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असली तरी त्यांच्यासाठी विशेष महाविद्यालये नसल्याने त्यापासून दुर राहण्याची वेळ येत आहे. अशावेळी काही विद्यार्थी आयटीआय किंवा इतर व्यवसाय कौशल्य अभ्यासक्रमाचे शिक्षण घेवून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पुणे : तल्लख बुध्दी असली तरी बोलता व ऐकू न येणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांपुढे दहावी झाली आता पुढे काय? हा प्रश्न पडला आहे. दहावीनंतर पुढे अकरावी-बारावी करून उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असली तरी त्यांच्यासाठी विशेष महाविद्यालये नसल्याने त्यापासून दुर राहण्याची वेळ येत आहे. अशावेळी काही विद्यार्थी आयटीआय किंवा इतर व्यवसाय कौशल्य अभ्यासक्रमाचे शिक्षण घेवून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.
वि. रा. रूईया मुकबधिर विद्यालयातील बारा विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत यश मिळविले आहे. विद्यालयातील १६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थी प्रथम श्रेणीत आले आहेत. केतन गव्हाणे या विद्यार्थ्याने ६४.६० टक्के गुण मिळवित शाळेत पहिला क्रमांक पटकावला आहे. तो मुळचा भीमा कोरेगावचा. इयत्ता सहावीपासून तो या शाळेत शिकत आहे. मागील सहा वर्ष तो दररोज बसने प्रवास करून शाळेत येत होता. सकाळी आठ वाजता घरातून निघायचे आणि पुन्हा बारा तासांनंतर घरी जायचे. हा त्याचा दररोजचा दिनक्रम. मात्र, तरीही त्याने जिद्दीने आणि चिकाटीने अभ्यास करून प्रथम श्रेणी मिळवत शाळेत पहिला क्रमांक मिळविला आहे. असे असले तरी आता त्याचे वडील अरूण गव्हाणे यांच्यापुढे त्याला कोणते शिक्षण द्यायचे हा प्रश्न पडला आहे. ते भीमा कोरेगावमध्येच शेती करतात.
गव्हाणे म्हणाले, त्याची पुढे शिक्षण्याची खुप इच्छा आहे. मात्र इथे जवळपास कुठेच त्यांना शिक्षण देणार्‍या संस्था नाहीत. किंवा तशी सुविधाही कुठल्या संस्थेत नाहीत. त्यामुळे थेट आयटीआयला प्रवेश घेवून त्याला स्वत:च्या पायावर उभे करण्याचा विचार आहे. पण तो आयटीआय करण्यास नकार देत आहे. हैद्राबादमध्ये एक संस्था असून तिथे जाण्याची त्याची इच्छा आहे. पण त्यासाठी किती खर्च येणार, हे माहिती नाही. त्यानेही पुढे शिकले पाहिजे असेच वाटते. शिकला नाही तर पुढे काहीच भवितव्य नाही.
शाळेच मुख्याध्यापक आत्माराम दुतोंडे यांनी शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, मुलांमध्ये गुणवत्ता खुप असते. शाळेत शिक्षक तसेच सर्व कर्मचारी त्यांना चांगल्याप्रकारे मार्गदर्शन करतात. मात्र, पुढे त्यांच्यासाठी विशेष शिक्षणाचे मार्ग बंद होतात. काही विद्यार्थी नियमित विद्यार्थ्यांबरोबर प्रवेश घेतात. पण त्यांना खुप अडचणी येतात.
---------------
बातमी जोड आहे.