शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

दहावी झाली आता पुढे काय? मुकबधिर विद्यार्थी व पालकांपुढील प्रश्न

By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST

पुणे : तल्लख बुध्दी असली तरी बोलता व ऐकू न येणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांपुढे दहावी झाली आता पुढे काय? हा प्रश्न पडला आहे. दहावीनंतर पुढे अकरावी-बारावी करून उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असली तरी त्यांच्यासाठी विशेष महाविद्यालये नसल्याने त्यापासून दुर राहण्याची वेळ येत आहे. अशावेळी काही विद्यार्थी आयटीआय किंवा इतर व्यवसाय कौशल्य अभ्यासक्रमाचे शिक्षण घेवून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पुणे : तल्लख बुध्दी असली तरी बोलता व ऐकू न येणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांपुढे दहावी झाली आता पुढे काय? हा प्रश्न पडला आहे. दहावीनंतर पुढे अकरावी-बारावी करून उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असली तरी त्यांच्यासाठी विशेष महाविद्यालये नसल्याने त्यापासून दुर राहण्याची वेळ येत आहे. अशावेळी काही विद्यार्थी आयटीआय किंवा इतर व्यवसाय कौशल्य अभ्यासक्रमाचे शिक्षण घेवून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.
वि. रा. रूईया मुकबधिर विद्यालयातील बारा विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत यश मिळविले आहे. विद्यालयातील १६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थी प्रथम श्रेणीत आले आहेत. केतन गव्हाणे या विद्यार्थ्याने ६४.६० टक्के गुण मिळवित शाळेत पहिला क्रमांक पटकावला आहे. तो मुळचा भीमा कोरेगावचा. इयत्ता सहावीपासून तो या शाळेत शिकत आहे. मागील सहा वर्ष तो दररोज बसने प्रवास करून शाळेत येत होता. सकाळी आठ वाजता घरातून निघायचे आणि पुन्हा बारा तासांनंतर घरी जायचे. हा त्याचा दररोजचा दिनक्रम. मात्र, तरीही त्याने जिद्दीने आणि चिकाटीने अभ्यास करून प्रथम श्रेणी मिळवत शाळेत पहिला क्रमांक मिळविला आहे. असे असले तरी आता त्याचे वडील अरूण गव्हाणे यांच्यापुढे त्याला कोणते शिक्षण द्यायचे हा प्रश्न पडला आहे. ते भीमा कोरेगावमध्येच शेती करतात.
गव्हाणे म्हणाले, त्याची पुढे शिक्षण्याची खुप इच्छा आहे. मात्र इथे जवळपास कुठेच त्यांना शिक्षण देणार्‍या संस्था नाहीत. किंवा तशी सुविधाही कुठल्या संस्थेत नाहीत. त्यामुळे थेट आयटीआयला प्रवेश घेवून त्याला स्वत:च्या पायावर उभे करण्याचा विचार आहे. पण तो आयटीआय करण्यास नकार देत आहे. हैद्राबादमध्ये एक संस्था असून तिथे जाण्याची त्याची इच्छा आहे. पण त्यासाठी किती खर्च येणार, हे माहिती नाही. त्यानेही पुढे शिकले पाहिजे असेच वाटते. शिकला नाही तर पुढे काहीच भवितव्य नाही.
शाळेच मुख्याध्यापक आत्माराम दुतोंडे यांनी शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, मुलांमध्ये गुणवत्ता खुप असते. शाळेत शिक्षक तसेच सर्व कर्मचारी त्यांना चांगल्याप्रकारे मार्गदर्शन करतात. मात्र, पुढे त्यांच्यासाठी विशेष शिक्षणाचे मार्ग बंद होतात. काही विद्यार्थी नियमित विद्यार्थ्यांबरोबर प्रवेश घेतात. पण त्यांना खुप अडचणी येतात.
---------------
बातमी जोड आहे.