शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

हसो , खुश रहो! रडून, थांबून कसं चालेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 3:40 PM

ती व्यक्ती थोडेच दिवस का येते आपल्या आयुष्यात? इमोशनली ढपलेल्या आपल्या जगण्याला थोडासा आनंदाचा शिपका द्यायला? कठीण प्रसंगात तुम्हाला मदत करायला? आपलं कुणीच नाही जवळचं असं वाटत असताना तुमच्यासाठी काय वाट्टेल ते करण्याची तयारी दाखवायला, कोण येतं मदतीला ? ते दोस्तच ना...

-चिन्मय लेले

 

माणसं आयुष्यात येतात. जातात.

काही माणसं येतात फक्त एक ‘निमित्त’ होऊन;

काही कामापुरती, काही कारणांपुरती!

काम संपलं की, जातात निघून!!

आणि काही माणसं मात्र ऋतूंसारखी.

येतात आणि जगण्याचा मौसमच बदलून टाकतात.

आपण त्यांच्या रंगात रंगतो,

त्या मौसमाचेच होऊन जातो!

काही माणसं मात्र ‘जगणं’ होऊन येतात;

आपलं जगणं त्यांच्या जगण्याचाच भाग होऊन जातं;

ते येतात आणि आयुष्यभर राहतात.

कधी प्रत्यक्षात; तर कधी आठवणी बनून.

पण ती माणसं आयुष्यभर राहण्यासाठीच येतात.

***

निमित्त होऊन आलेली माणसं;

घटकाभरच्या प्रवासात भेटल्यासारखी.

प्रवास मजेत होतं, खूप गप्पा होतात,

मस्त गट्टी जमते, आपण हरखून जातो;

पण प्रवास संपतो,

त्या माणसाचा किंवा आपला थांबा येतो

आणि ती माणसं निघून जातात,

अनोळखी चेहर्‍यात हरवून जातात.

मग ती माणसं आपल्या आयुष्यात नाहीत

म्हणून रडून, थांबून कसं चालेल?

उलट विचार करुन पहा;

ती व्यक्ती थोडेच दिवस  का आपल्या आयुष्यात?

इमोशनली ढपलेल्या आपल्या जगण्याला

थोडासा आनंदाचा शिपका द्यायला?

कठीण प्रसंगात तुम्हाला मदत करायला?

आपलं कुणीच नाही जवळचं असं वाटत असताना

तुमच्यासाठी काय वाट्टेल ते करण्याची तयारी दाखवायला?

तुम्ही किती स्पेशल आहात, हे तुम्हाला समजावून द्यायला?

**

आपलं प्रत्येकाचं कारण असेलही वेगळं.

पण अशी निमित्तानं आलेली माणसं

आपलं जगणं उजळून टाकताता काही काळासाठी!

आणि मग निघून जातात.

***

त्यांच्या जाण्याचा खूप त्रास होतो.

आपण खूप त्रागाही करतो

स्वतर्‍ला किंवा त्या व्यक्तीला दोष देतो.

आणि जे मिळालेलं असतं ते ही नाकारत बसतो.

**

असं का करायचं?

आपण जे जगतो ते भरपूर जगायचं.

आपल्यासोबत असलेल्या माणसांना

बांधून घालण्यापेक्षा,

अपेक्षांची ओझी लादण्यापेक्षा जाऊ द्यावं, जायचं असेल तर.

आणि म्हणावं की, चार क्षण का होईना;

किती आनंद मिळाला.

किती सुंदर झाला प्रवास.

***

आपले हसरे क्षण

हीच आपली पूंजी.

ती रडक्या आठवणींवर का खर्च करायची?

( इंटरनेटवर फॉरवर्ड होत असलेल्या ‘रिझन-सिझन’ मेसेजचा मुक्त अनुवाद)