शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

इंग्रजी शाळा म्हणजे खाटीक खाना - भालचंद्र नेमाडे

By admin | Updated: June 15, 2015 09:12 IST

इंग्रजी शाळांचा आग्रह धरून पालक मुलांना खाटीक खान्यात टाकत आहेत. खरेतर मुलांचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच व्हायला हवे, इंग्रजी शाळेत शिकलेली मुले बारावीनंतर मूर्ख होतात, सध्या आपल्या शिक्षणाचा उकिरडा झाला असे,मार्मिक मत ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ज्येष्ठ साहित्यिक डॉ.भालचंद्र नेमाडे यांनी रविवारी व्यक्त केले.

पुणे: महाराष्ट्रानेच इंग्रजीचे स्तोम वाढविले असून इंग्रजीमध्ये शिकल्यामुळे ज्ञान वाढते ही केवळ अंधश्रध्दा आहे. काही निवडक देश सोडले तर जगात कुठेही इंग्रजी बोलले जात नाही. इंग्रजी शाळांचा आग्रह धरून पालक मुलांना खाटीक खान्यात टाकत आहेत. खरेतर मुलांचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच व्हायला हवे, इंग्रजी शाळेत शिकलेली मुले बारावीनंतर मूर्ख होतात, सध्या आपल्या शिक्षणाचा उकिरडा झाला असे,मार्मिक मत ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ज्येष्ठ साहित्यिक डॉ.भालचंद्र नेमाडे यांनी रविवारी व्यक्त केले.शिक्षण प्रसारक मंंडळीच्या स.प.महाविद्यालयाच्या शताब्दी वर्ष महोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानात नोमाडे बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ.दिलीप शेठ,ॲड.जयंत शाळीग्राम,डॉ.गोरख थोरात उपस्थित होते.नेमाडे म्हणाले, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील काही शिक्षकांनाही इंग्रजी शिकवता येत नाही.मराठी माणसांसाठी विनाकारण इंग्रजीचे महत्त्व वाढवून ठेवले आहे. त्यातही पुण्यातील इंग्रजी म्हणजे चांगले हा वेगळाच शोध लावण्यात आला आहे.आजही इंग्रजी शाळेत शिक्षण घेतलेला विद्यार्थी इंग्रजीचा प्राध्यापक होत नाही तर खेड्यातील माराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेला विद्यार्थी होतो.भावनीतेने नाही तर इंग्रजीचा प्राध्याकम म्हणून मी तुम्हाला आव्हान करतो की मुलांचा इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेवून त्यांना खाटीक खान्यात टाकू नका.नेमाडे म्हणाले,आपल्या साहित्याची व संस्कृतीची परंपरा फार जुनी असून ती 16 व्या किंवा 12 व्या शतकापर्यंत जात नाही तर ती 60 हजार वर्षांपूर्वीची आहे. ज्ञानेश्वरी एवढ्याच तोडीचे अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत.परंतु,आपण याबाबत खूप अज्ञान बाळगतो. त्याच प्रमाणे विनोबा भावे,इरावती कर्वे यांच्यापासून ते अत्रे यांच्यापर्यंत मराठी भाषा खूप सुंद होती.परंतु,सध्याच्या लेखकांच्या भाषेमध्ये ती सुंदरता दिसून येत नाही. मराठी माणसांमध्ये युध्दखोर वृत्ती व उच्च राष्ट्रवादाची भावना वाढत चालली आहे,असे स्पष्ट करून मराठा आरक्षणाबाबत बोलताना नोमाडे म्हणाले,1901 पूर्वी मराठा जात कुठेही अस्तित्वात नव्हती.त्याच प्रमाणे जातीमुळे समाजात संघर्ष निर्माण झालेला नाही.तर धर्माधर्मात भेव भाव वाढल्यामुळे संघर्ष होतो.धर्माचा उन्मात झाल्याने देश फाटला आहे.पूर्वी जातीयता नव्हती,महिलांवर अन्याय होत नव्हते.परंतु,आज कोणत्याही क्षणी दंगे होऊ शकतात,अशी स्थिती निर्माण झाली आहे.जातीय व्यवस्थेवर बोलताना नेमाडे म्हणाले,जाती व्यवस्था अनेकांना मोडता आली नाही.त्यामुळे याबाबीवर उथळपणे विचार करून चालणार नाही.दुस-या देशात जाती व्यवस्था नाही म्हणून आपल्याकडे नसावी,असा विचार करणे योग्य नाही.