शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

इंग्रजी शाळा म्हणजे खाटीक खाना - भालचंद्र नेमाडे

By admin | Updated: June 15, 2015 09:12 IST

इंग्रजी शाळांचा आग्रह धरून पालक मुलांना खाटीक खान्यात टाकत आहेत. खरेतर मुलांचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच व्हायला हवे, इंग्रजी शाळेत शिकलेली मुले बारावीनंतर मूर्ख होतात, सध्या आपल्या शिक्षणाचा उकिरडा झाला असे,मार्मिक मत ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ज्येष्ठ साहित्यिक डॉ.भालचंद्र नेमाडे यांनी रविवारी व्यक्त केले.

पुणे: महाराष्ट्रानेच इंग्रजीचे स्तोम वाढविले असून इंग्रजीमध्ये शिकल्यामुळे ज्ञान वाढते ही केवळ अंधश्रध्दा आहे. काही निवडक देश सोडले तर जगात कुठेही इंग्रजी बोलले जात नाही. इंग्रजी शाळांचा आग्रह धरून पालक मुलांना खाटीक खान्यात टाकत आहेत. खरेतर मुलांचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच व्हायला हवे, इंग्रजी शाळेत शिकलेली मुले बारावीनंतर मूर्ख होतात, सध्या आपल्या शिक्षणाचा उकिरडा झाला असे,मार्मिक मत ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ज्येष्ठ साहित्यिक डॉ.भालचंद्र नेमाडे यांनी रविवारी व्यक्त केले.शिक्षण प्रसारक मंंडळीच्या स.प.महाविद्यालयाच्या शताब्दी वर्ष महोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानात नोमाडे बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ.दिलीप शेठ,ॲड.जयंत शाळीग्राम,डॉ.गोरख थोरात उपस्थित होते.नेमाडे म्हणाले, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील काही शिक्षकांनाही इंग्रजी शिकवता येत नाही.मराठी माणसांसाठी विनाकारण इंग्रजीचे महत्त्व वाढवून ठेवले आहे. त्यातही पुण्यातील इंग्रजी म्हणजे चांगले हा वेगळाच शोध लावण्यात आला आहे.आजही इंग्रजी शाळेत शिक्षण घेतलेला विद्यार्थी इंग्रजीचा प्राध्यापक होत नाही तर खेड्यातील माराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेला विद्यार्थी होतो.भावनीतेने नाही तर इंग्रजीचा प्राध्याकम म्हणून मी तुम्हाला आव्हान करतो की मुलांचा इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेवून त्यांना खाटीक खान्यात टाकू नका.नेमाडे म्हणाले,आपल्या साहित्याची व संस्कृतीची परंपरा फार जुनी असून ती 16 व्या किंवा 12 व्या शतकापर्यंत जात नाही तर ती 60 हजार वर्षांपूर्वीची आहे. ज्ञानेश्वरी एवढ्याच तोडीचे अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत.परंतु,आपण याबाबत खूप अज्ञान बाळगतो. त्याच प्रमाणे विनोबा भावे,इरावती कर्वे यांच्यापासून ते अत्रे यांच्यापर्यंत मराठी भाषा खूप सुंद होती.परंतु,सध्याच्या लेखकांच्या भाषेमध्ये ती सुंदरता दिसून येत नाही. मराठी माणसांमध्ये युध्दखोर वृत्ती व उच्च राष्ट्रवादाची भावना वाढत चालली आहे,असे स्पष्ट करून मराठा आरक्षणाबाबत बोलताना नोमाडे म्हणाले,1901 पूर्वी मराठा जात कुठेही अस्तित्वात नव्हती.त्याच प्रमाणे जातीमुळे समाजात संघर्ष निर्माण झालेला नाही.तर धर्माधर्मात भेव भाव वाढल्यामुळे संघर्ष होतो.धर्माचा उन्मात झाल्याने देश फाटला आहे.पूर्वी जातीयता नव्हती,महिलांवर अन्याय होत नव्हते.परंतु,आज कोणत्याही क्षणी दंगे होऊ शकतात,अशी स्थिती निर्माण झाली आहे.जातीय व्यवस्थेवर बोलताना नेमाडे म्हणाले,जाती व्यवस्था अनेकांना मोडता आली नाही.त्यामुळे याबाबीवर उथळपणे विचार करून चालणार नाही.दुस-या देशात जाती व्यवस्था नाही म्हणून आपल्याकडे नसावी,असा विचार करणे योग्य नाही.