शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

इंग्रजी शाळा म्हणजे खाटीक खाना - भालचंद्र नेमाडे

By admin | Updated: June 15, 2015 09:12 IST

इंग्रजी शाळांचा आग्रह धरून पालक मुलांना खाटीक खान्यात टाकत आहेत. खरेतर मुलांचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच व्हायला हवे, इंग्रजी शाळेत शिकलेली मुले बारावीनंतर मूर्ख होतात, सध्या आपल्या शिक्षणाचा उकिरडा झाला असे,मार्मिक मत ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ज्येष्ठ साहित्यिक डॉ.भालचंद्र नेमाडे यांनी रविवारी व्यक्त केले.

पुणे: महाराष्ट्रानेच इंग्रजीचे स्तोम वाढविले असून इंग्रजीमध्ये शिकल्यामुळे ज्ञान वाढते ही केवळ अंधश्रध्दा आहे. काही निवडक देश सोडले तर जगात कुठेही इंग्रजी बोलले जात नाही. इंग्रजी शाळांचा आग्रह धरून पालक मुलांना खाटीक खान्यात टाकत आहेत. खरेतर मुलांचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच व्हायला हवे, इंग्रजी शाळेत शिकलेली मुले बारावीनंतर मूर्ख होतात, सध्या आपल्या शिक्षणाचा उकिरडा झाला असे,मार्मिक मत ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ज्येष्ठ साहित्यिक डॉ.भालचंद्र नेमाडे यांनी रविवारी व्यक्त केले.शिक्षण प्रसारक मंंडळीच्या स.प.महाविद्यालयाच्या शताब्दी वर्ष महोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानात नोमाडे बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ.दिलीप शेठ,ॲड.जयंत शाळीग्राम,डॉ.गोरख थोरात उपस्थित होते.नेमाडे म्हणाले, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील काही शिक्षकांनाही इंग्रजी शिकवता येत नाही.मराठी माणसांसाठी विनाकारण इंग्रजीचे महत्त्व वाढवून ठेवले आहे. त्यातही पुण्यातील इंग्रजी म्हणजे चांगले हा वेगळाच शोध लावण्यात आला आहे.आजही इंग्रजी शाळेत शिक्षण घेतलेला विद्यार्थी इंग्रजीचा प्राध्यापक होत नाही तर खेड्यातील माराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेला विद्यार्थी होतो.भावनीतेने नाही तर इंग्रजीचा प्राध्याकम म्हणून मी तुम्हाला आव्हान करतो की मुलांचा इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेवून त्यांना खाटीक खान्यात टाकू नका.नेमाडे म्हणाले,आपल्या साहित्याची व संस्कृतीची परंपरा फार जुनी असून ती 16 व्या किंवा 12 व्या शतकापर्यंत जात नाही तर ती 60 हजार वर्षांपूर्वीची आहे. ज्ञानेश्वरी एवढ्याच तोडीचे अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत.परंतु,आपण याबाबत खूप अज्ञान बाळगतो. त्याच प्रमाणे विनोबा भावे,इरावती कर्वे यांच्यापासून ते अत्रे यांच्यापर्यंत मराठी भाषा खूप सुंद होती.परंतु,सध्याच्या लेखकांच्या भाषेमध्ये ती सुंदरता दिसून येत नाही. मराठी माणसांमध्ये युध्दखोर वृत्ती व उच्च राष्ट्रवादाची भावना वाढत चालली आहे,असे स्पष्ट करून मराठा आरक्षणाबाबत बोलताना नोमाडे म्हणाले,1901 पूर्वी मराठा जात कुठेही अस्तित्वात नव्हती.त्याच प्रमाणे जातीमुळे समाजात संघर्ष निर्माण झालेला नाही.तर धर्माधर्मात भेव भाव वाढल्यामुळे संघर्ष होतो.धर्माचा उन्मात झाल्याने देश फाटला आहे.पूर्वी जातीयता नव्हती,महिलांवर अन्याय होत नव्हते.परंतु,आज कोणत्याही क्षणी दंगे होऊ शकतात,अशी स्थिती निर्माण झाली आहे.जातीय व्यवस्थेवर बोलताना नेमाडे म्हणाले,जाती व्यवस्था अनेकांना मोडता आली नाही.त्यामुळे याबाबीवर उथळपणे विचार करून चालणार नाही.दुस-या देशात जाती व्यवस्था नाही म्हणून आपल्याकडे नसावी,असा विचार करणे योग्य नाही.