शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कलावंतांना मानधन व घरकुल द्या; अन्यथा मंत्रालयासमोर गोंधळ-जागर

By साहेबराव हिवराळे | Updated: May 21, 2023 21:24 IST

महाराष्ट्र बैठकीत निघाला सूर : कोरोनात हाल; सध्याही नाही हाती जगण्याचे साधन

छत्रपती संभाजीनगर : कलावंतांना त्यांच्या कला सादरीकरणास वाव दिला तर त्यांची कुटुंबे उभी राहतात, अन्यथा त्यांना रोजंदारीवरही कुणी कामाला नेत नाहीत, त्यामुळे शासनाने मानधन तसेच घरकुलाची योजना राबवावी, अन्यथा कलावंत मंत्रालयासमोर गोंधळ-जागर आंदोलन करून व्यथा मांडणार असल्याचा इशारा रविवारी महाराष्ट्रस्तरीय बैठकीत छत्रपती संभाजीनगरात देण्यात आला.

मौलाना आझाद संशोधन केंद्रात महाराष्ट्र राज्य कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने महाराष्ट्रातील कलवंतांच्या दिशादर्शक बैठक रविवारी झाली. यात मार्गदर्शन करताना प्रदेश अध्यक्ष सोमनाथ गायकवाड म्हणाले की, कलावंतांचे सर्वत्र हाल असून, त्यांना जीवन जगताना चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दाखवावे लागते. परंतु त्या तुलनेत त्यांच्या पदरी काही पडत नाही. राहण्यापासून ते कलाची साधन सांभाळताना होणारी तारेवरची कसरत जीवघेणी ठरत आहे. बहुतांश कलावंतांना मानधनापासून वंचित राहावे लागत आहे. कला सादरीकरणाच्या वेळेत त्यांच्या हक्काची जाणीव कुणी करून देत नाहीत. त्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन उभारणार आहोत. त्यासाठी कलावंतांनी साथ देण्याची गरज आहे, असेही सोमनाथ गायकवाड स्पष्ट केले. राज्यव्यापी कलावंत क्रांती परिषद, मानधनप्राप्ताची व वंचिताची यादी तयार करणे, प्रत्येक जिल्ह्यात कलावंताची नोंदणी, घरकुल व मानधन तसेच इतर कलावंताच्या प्रश्नावर आवाज उठविणे इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली.

देवगिरी सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन नितीन देशमुख यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले तर यावेळी माजी सरपंच उत्तम अंबिलढगे, बबनभाई शेख, तेजराव सपकाळ,छाया नांदेडकर , मेघा डोळस, नानासाहेब कारके, ॲड. शाम खंदारे आदींची उपस्थिती होती. कडूबाई खरात, मीरा उमप या गायकांनी भीमगीताने मौलाना आझाद संशोधन केंद्रातील वातावरण प्रफुल्लित केले होते. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दोन्ही गायकांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम अंबिलढगे यांनी केले, तर मान्यवरांची स्वागत छाया नांदेडकर यांनी मानले.कॅप्शन... मौलाना आझाद संशोधन केंद्रात महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने महाराष्ट्रातील कलावंतांच्या दिशादर्शक बैठकीत कडूबाई खरात, मीरा उमप या गायिकांनी भीमगीत गायन करताना.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद