शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

'बालोद' जिल्हा बनला देशाचा पहिला बालविवाह मुक्त जिल्हा; छत्तीसगडनं रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 10:21 IST

छत्तीसगडच्या या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर एक मैलाचा दगड मानले जात आहे. “बालविवाह मुक्त भारत" अभियान वेगाने पुढे नेण्यात हे यश इतर राज्यांसाठी प्रेरणास्रोत ठरेल.

रायपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ ऑगस्ट २०२४ रोजी सुरू केलेल्या “बालविवाह मुक्त भारत” या राष्ट्रीय अभियानांतर्गत छत्तीसगडने एक ऐतिहासिक यश मिळवलं आहे. राज्याचा बालोद जिल्हा हा देशातील पहिला जिल्हा ठरला आहे, ज्याला अधिकृतपणे बालविवाह मुक्त घोषित केले जाऊ शकते. बालोद जिल्ह्यातील सर्व ४३६ ग्रामपंचायती आणि ९ नगरपालिकांना कायदेशीर प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

बालोद बनलं राष्ट्रीय उदाहरण

मागील दोन वर्षांत बालोद जिल्ह्यातून बालविवाहाची एकही घटना समोर आलेली नाही. कागदपत्रांची तपासणी आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता जिल्ह्यातील सर्व पंचायत व नगरपालिका बालविवाह मुक्त घोषित झाल्या आहेत. या अभूतपूर्व यशासोबतच बालोद जिल्हा संपूर्ण देशासाठी एक आदर्श मॉडेल ठरला आहे. बालोद जिल्हाधिकारी दिव्या उमेश मिश्रा यांनी सांगितले की, हे यश प्रशासन, लोकप्रतिनिधी, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि समाजाच्या सामूहिक सहभागामुळे शक्य झाले आहे. त्यांनी या प्रयत्नात सक्रिय सहकार्य दिल्याबद्दल सर्व पंचायत व नगरपालिकांचे आभार मानले.

सूरजपूरच्या ७५ ग्रामपंचायतीही बालविवाह मुक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सूरजपूर जिल्ह्यातील ७५ ग्रामपंचायतींना बालविवाह मुक्त ग्रामपंचायत घोषित करण्यात आले. गत दोन वर्षांत या पंचायतांमधूनही बालविवाहाची एकही घटना नोंदली गेलेली नाही. राज्य सरकारने याला सामाजिक सुधाराच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल असं संबोधलं आहे.

बालविवाह निर्मूलन हे केवळ सरकारी अभियान नाही, सामाजिक परिवर्तनाचा संकल्प – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी सांगितले की, छत्तीसगड सरकारने बालविवाह निर्मुलनाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. टप्प्याटप्प्याने वर्ष २०२८-२९ पर्यंत संपूर्ण राज्याला बालविवाह मुक्त घोषित करण्याचं आमचं लक्ष्य आहे. हे केवळ एक सरकारी अभियान नाही, तर सामाजिक परिवर्तनाचा संकल्प आहे. इतर जिल्ह्यांमध्येही पंचायत व नगरपालिकांना बालविवाह मुक्त घोषित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे. ज्या जिल्ह्यांत मागील दोन वर्षांत बालविवाहाची एकही घटना नोंदलेली नाही, त्यांना लवकरच प्रमाणपत्र दिले जाईल असं त्यांनी सांगितले. 

समाज आणि सरकारच्या एकत्रित प्रयत्नांना यश

महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी राजवाडे यांनी या यशाला केवळ छत्तीसगडसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरवले आहे.  बालोदचे हे यश सिद्ध करते की जर समाज आणि सरकार मिळून कार्य करतात तर बालविवाहासारखी कुप्रथा मुळापासून नष्ट करता येते. सूरजपूरचे यशही या दिशेने एक मजबूत पाऊल आहे. या अभियानात युनिसेफचे सहकार्यही महत्त्वाचे राहिले आहे. संस्थेने तांत्रिक सहकार्य, जनजागृती कार्यक्रम आणि देखरेखीची यंत्रणा मजबूत करण्यास मदत केली असं त्यांनी सांगितले. 

दरम्यान, छत्तीसगडच्या या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर एक मैलाचा दगड मानले जात आहे. “बालविवाह मुक्त भारत" अभियान वेगाने पुढे नेण्यात हे यश इतर राज्यांसाठी प्रेरणास्रोत ठरेल. जर छत्तीसगडच्या धर्तीवर सामुदायिक सहभाग आणि शिक्षणाला केंद्रस्थानी ठेवून काम केले तर देशातून बालविवाहासारखी कुप्रथा पूर्णपणे नष्ट करणे शक्य आहे असं तज्ज्ञांचे मत आहे. राज्य सरकार आता टप्प्याटप्प्याने इतर जिल्ह्यांना देखील बालविवाह मुक्त बनवण्याची तयारी करत आहे. २०२९ पर्यंत संपूर्ण छत्तीसगडला बालविवाह मुक्त करण्याचे लक्ष्य केवळ राज्यालाच नव्हे तर देशालाही बालविवाह मुक्त भारताच्या संकल्पाच्या अधिक जवळ नेईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Balod Becomes India's First Child Marriage-Free District: Chhattisgarh Achieves Milestone

Web Summary : Chhattisgarh's Balod district is India's first officially child marriage-free district. With collective efforts, all its panchayats are certified. Surajpur's 75 panchayats are also declared child marriage-free, marking a significant step towards social reform. The state aims to eradicate child marriage by 2029.
टॅग्स :marriageलग्न