मराठवाड्याने मोडला यंदा टँकरचा रेकॉर्ड
By Admin | Updated: May 17, 2016 00:34 IST2016-05-17T00:17:56+5:302016-05-17T00:34:48+5:30
औरंगाबाद : मराठवाडा विभागातील २,७१६ गावे आणि ९६० वाड्यांना ३,६५० टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. विभागात ५६ लाख १६ हजार ६६६ ग्रामीण भागातील

मराठवाड्याने मोडला यंदा टँकरचा रेकॉर्ड
३,६५० टँकर : ५६ लाख लोकांची पाण्यासाठी वणवण
औरंगाबाद : मराठवाडा विभागातील २,७१६ गावे आणि ९६० वाड्यांना ३,६५० टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. विभागात ५६ लाख १६ हजार ६६६ ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्याासाठी वणवण करावी लागते आहे. गेल्या वर्षी मेअखेरपर्यंत ३ हजारांच्या आसपास टँकरचा आकडा गेला होता. यावर्षी मेअखेरपर्यंत ४ हजार टँकरचा आकडा जाण्याची शक्यता आहे.
विभागात १५ मेअखेर औरंगाबाद जिल्ह्यात ६१६ गावे व २३ वाड्यांसाठी ८३२ टँकरद्वारे, जालन्यात ४६६ गावे आणि ७४ वाड्यांसाठी ५४८ टँकर, परभणीत १९१ गावे ४७ वाड्यांसाठी २५० टँकर, हिंगोलीत ३९ गावे एका वाडीसाठी ४१ टँकर, नांदेडमध्ये १९९ गावे १४३ वाड्यांसाठी ३३१ टँकर, बीडमध्ये ७१० गावे आणि ६०४ वाड्यांसाठी ९१० टँकर, लातूरमध्ये २३५ गावे ५२ वाड्यांसाठी ३२३ टँकर, तर उस्मानाबादमध्ये २६० गावे आणि १६ वाड्यांसाठी ४१५ टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. मागील आठवड्यात २,६१५ गावे आणि ९४९ वाड्यांना ३,४९५ टँकरद्वारे पाणी पुरविले जात होते.
४१८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
मराठवाड्यात १३ मेपर्यंत ४१८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्यातील १८७ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत देण्यात आली आहे. ९४ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत.
१२३ प्रकरणांत चौकशी सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ६४, जालन्यात ४३, परभणी ३९, हिंगोली २६, नांदेड ६२, बीडमध्ये ७५, लातूर ५५, उस्मानाबादमध्ये ५४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.