शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

यमदूतही थकला असणार...महिनाभरात ४५० कोरोना, ९९१ नैसर्गिक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 12:17 IST

death rate increases in Aurangabad १५ मार्च ते १५ एप्रिल या एक महिन्यातील धक्कादायक माहिती 

ठळक मुद्देशहरात दररोज सरासरी ६२ पार्थिवांवर अंत्यसंस्काररुग्णालयात दररोज मृतदेहांची रांग

औरंगाबाद : कोरोनारूपी राक्षस जिल्ह्यात अक्षरश: थैमान घालत आहे. दररोज ३० ते ४० नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू होतोय. नैसर्गिक मृत्यूंची संख्याही तीन पटीने वाढली आहे. १५ मार्च ते १५ एप्रिल या एका महिन्यात एकट्या औरंगाबाद शहरातील ४५० नागरिकांचा मृत्यू झाला. ९९१ नागरिकांचा नैसर्गिक मृत्यू झाला. १४४१ नागरिक शहरातील तर कोरोनामुळे मरण पावलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांवर देखील शहरातच अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. या महिनाभरात शहरातील स्मशानभूमीत १ हजार ८५९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

कोरोनाच्या मृत्यू सोबत नैसर्गिक मृत्यू सुद्धा वाढत आहेत. घाटी रुग्णालयाच्या शवागारात मृतदेहांची रांग दिसते. स्मशानभूमीत तर अंत्यसंस्कारासाठी कित्येक तास वाट पाहावी लागते. असे विदारक चित्र यापूर्वी शहराने कधीच बघितले नव्हते. मृत्यूचे आकडे हादरवून टाकणारे आहेत. ६ मार्चपासून शहरात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर हळूहळू वाढू लागला. मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत त्याची तीव्रता अधिक वाढत गेली. ३१ मार्चपर्यंत २११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. हा सिलसिला एप्रिल महिन्यात आहे सुरूच आहे. १५ एप्रिलपर्यंत शहरातील २३९ कोरोना रुग्णांनी दम तोडला. एका महिन्यात ४५० जणांचा मृत्यू झाला. कोरोना मृत्यूची लाट सुरू असतानाच नैसर्गिक मृत्यूची संख्या ही अफाट वाढत आहे. मागील महिनाभरात ९९१ नागरिकांचा नैसर्गिक मृत्यू झाला.

एका अंत्यसंस्काराला किमान ३ तासशहरातील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी मागील महिनाभरापासून अक्षरशः रांगा लागत आहेत. जागा मिळेल तेथे स्मशानजोगी अंत्यसंस्कार करीत आहेत. एका अंत्यसंस्काराची आग शमवण्यासाठी किमान ३ तास लागतात. ही आग विझेपर्यंत आसपास दुसरे सरण रचता येत नाही. आग पूर्णपणे थंड झाल्यानंतरच बाजूला दुसऱ्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करता येऊ शकतात, असे पुष्पनगरी येथील स्मशानजोगी गोविंद गायकवाड यांनी सांगितले.

जिल्ह्यातील, इतर जिल्ह्यांतील मृतदेहांवरही अंत्यसंस्कारकोरोना झालेले असंख्य रुग्ण मराठवाडा आणि इतर भागातून शहरात दाखल होत आहेत. इतर जिल्ह्यातील रुग्ण मरण पावल्यावर त्याच्यावर शहरातच अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. अशा मृतदेहांची संख्या जवळपास ४१८ आहे. एकंदरीत सर्व मृतदेहांची बेरीज केली तर १८५९ एवढी होत आहे. एका महिन्यात जवळपास दोन हजार नागरिकांना यमसदनी नेताना यमदूतही थकला असेल...!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद