शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

यमदूतही थकला असणार...महिनाभरात ४५० कोरोना, ९९१ नैसर्गिक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 12:17 IST

death rate increases in Aurangabad १५ मार्च ते १५ एप्रिल या एक महिन्यातील धक्कादायक माहिती 

ठळक मुद्देशहरात दररोज सरासरी ६२ पार्थिवांवर अंत्यसंस्काररुग्णालयात दररोज मृतदेहांची रांग

औरंगाबाद : कोरोनारूपी राक्षस जिल्ह्यात अक्षरश: थैमान घालत आहे. दररोज ३० ते ४० नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू होतोय. नैसर्गिक मृत्यूंची संख्याही तीन पटीने वाढली आहे. १५ मार्च ते १५ एप्रिल या एका महिन्यात एकट्या औरंगाबाद शहरातील ४५० नागरिकांचा मृत्यू झाला. ९९१ नागरिकांचा नैसर्गिक मृत्यू झाला. १४४१ नागरिक शहरातील तर कोरोनामुळे मरण पावलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांवर देखील शहरातच अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. या महिनाभरात शहरातील स्मशानभूमीत १ हजार ८५९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

कोरोनाच्या मृत्यू सोबत नैसर्गिक मृत्यू सुद्धा वाढत आहेत. घाटी रुग्णालयाच्या शवागारात मृतदेहांची रांग दिसते. स्मशानभूमीत तर अंत्यसंस्कारासाठी कित्येक तास वाट पाहावी लागते. असे विदारक चित्र यापूर्वी शहराने कधीच बघितले नव्हते. मृत्यूचे आकडे हादरवून टाकणारे आहेत. ६ मार्चपासून शहरात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर हळूहळू वाढू लागला. मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत त्याची तीव्रता अधिक वाढत गेली. ३१ मार्चपर्यंत २११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. हा सिलसिला एप्रिल महिन्यात आहे सुरूच आहे. १५ एप्रिलपर्यंत शहरातील २३९ कोरोना रुग्णांनी दम तोडला. एका महिन्यात ४५० जणांचा मृत्यू झाला. कोरोना मृत्यूची लाट सुरू असतानाच नैसर्गिक मृत्यूची संख्या ही अफाट वाढत आहे. मागील महिनाभरात ९९१ नागरिकांचा नैसर्गिक मृत्यू झाला.

एका अंत्यसंस्काराला किमान ३ तासशहरातील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी मागील महिनाभरापासून अक्षरशः रांगा लागत आहेत. जागा मिळेल तेथे स्मशानजोगी अंत्यसंस्कार करीत आहेत. एका अंत्यसंस्काराची आग शमवण्यासाठी किमान ३ तास लागतात. ही आग विझेपर्यंत आसपास दुसरे सरण रचता येत नाही. आग पूर्णपणे थंड झाल्यानंतरच बाजूला दुसऱ्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करता येऊ शकतात, असे पुष्पनगरी येथील स्मशानजोगी गोविंद गायकवाड यांनी सांगितले.

जिल्ह्यातील, इतर जिल्ह्यांतील मृतदेहांवरही अंत्यसंस्कारकोरोना झालेले असंख्य रुग्ण मराठवाडा आणि इतर भागातून शहरात दाखल होत आहेत. इतर जिल्ह्यातील रुग्ण मरण पावल्यावर त्याच्यावर शहरातच अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. अशा मृतदेहांची संख्या जवळपास ४१८ आहे. एकंदरीत सर्व मृतदेहांची बेरीज केली तर १८५९ एवढी होत आहे. एका महिन्यात जवळपास दोन हजार नागरिकांना यमसदनी नेताना यमदूतही थकला असेल...!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद