शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
4
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
5
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
6
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
7
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिटकवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
8
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
9
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
10
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
11
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
12
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
13
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
14
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
15
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
16
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
17
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
18
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
19
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
20
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना

यमदूतही थकला असणार...महिनाभरात ४५० कोरोना, ९९१ नैसर्गिक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 12:17 IST

death rate increases in Aurangabad १५ मार्च ते १५ एप्रिल या एक महिन्यातील धक्कादायक माहिती 

ठळक मुद्देशहरात दररोज सरासरी ६२ पार्थिवांवर अंत्यसंस्काररुग्णालयात दररोज मृतदेहांची रांग

औरंगाबाद : कोरोनारूपी राक्षस जिल्ह्यात अक्षरश: थैमान घालत आहे. दररोज ३० ते ४० नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू होतोय. नैसर्गिक मृत्यूंची संख्याही तीन पटीने वाढली आहे. १५ मार्च ते १५ एप्रिल या एका महिन्यात एकट्या औरंगाबाद शहरातील ४५० नागरिकांचा मृत्यू झाला. ९९१ नागरिकांचा नैसर्गिक मृत्यू झाला. १४४१ नागरिक शहरातील तर कोरोनामुळे मरण पावलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांवर देखील शहरातच अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. या महिनाभरात शहरातील स्मशानभूमीत १ हजार ८५९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

कोरोनाच्या मृत्यू सोबत नैसर्गिक मृत्यू सुद्धा वाढत आहेत. घाटी रुग्णालयाच्या शवागारात मृतदेहांची रांग दिसते. स्मशानभूमीत तर अंत्यसंस्कारासाठी कित्येक तास वाट पाहावी लागते. असे विदारक चित्र यापूर्वी शहराने कधीच बघितले नव्हते. मृत्यूचे आकडे हादरवून टाकणारे आहेत. ६ मार्चपासून शहरात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर हळूहळू वाढू लागला. मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत त्याची तीव्रता अधिक वाढत गेली. ३१ मार्चपर्यंत २११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. हा सिलसिला एप्रिल महिन्यात आहे सुरूच आहे. १५ एप्रिलपर्यंत शहरातील २३९ कोरोना रुग्णांनी दम तोडला. एका महिन्यात ४५० जणांचा मृत्यू झाला. कोरोना मृत्यूची लाट सुरू असतानाच नैसर्गिक मृत्यूची संख्या ही अफाट वाढत आहे. मागील महिनाभरात ९९१ नागरिकांचा नैसर्गिक मृत्यू झाला.

एका अंत्यसंस्काराला किमान ३ तासशहरातील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी मागील महिनाभरापासून अक्षरशः रांगा लागत आहेत. जागा मिळेल तेथे स्मशानजोगी अंत्यसंस्कार करीत आहेत. एका अंत्यसंस्काराची आग शमवण्यासाठी किमान ३ तास लागतात. ही आग विझेपर्यंत आसपास दुसरे सरण रचता येत नाही. आग पूर्णपणे थंड झाल्यानंतरच बाजूला दुसऱ्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करता येऊ शकतात, असे पुष्पनगरी येथील स्मशानजोगी गोविंद गायकवाड यांनी सांगितले.

जिल्ह्यातील, इतर जिल्ह्यांतील मृतदेहांवरही अंत्यसंस्कारकोरोना झालेले असंख्य रुग्ण मराठवाडा आणि इतर भागातून शहरात दाखल होत आहेत. इतर जिल्ह्यातील रुग्ण मरण पावल्यावर त्याच्यावर शहरातच अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. अशा मृतदेहांची संख्या जवळपास ४१८ आहे. एकंदरीत सर्व मृतदेहांची बेरीज केली तर १८५९ एवढी होत आहे. एका महिन्यात जवळपास दोन हजार नागरिकांना यमसदनी नेताना यमदूतही थकला असेल...!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद