शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंपचालकांची व्यथा : दर तीन महिन्याला बिले मिळेनात, हजारोंची बिले एकदाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 18:47 IST

शेतकऱ्यांकडून नवीन कृषिपंप वीज धोरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देबिल न देताच महावितरणकडून केली जाते वसुली

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : महाकृषी ऊर्जा अभियानात जिल्ह्यातील २ लाख २७ हजार कृषिपंप ग्राहकांना वीजबिल कोरे करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही बाब शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी ठरत असून, या ग्राहकांना दर तीन महिन्याला बिले दिली जात असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे; परंतु कृषिपंप ग्राहकांना वर्षानुवर्षे वीजबिलेच मिळत नाहीत. तसेच बिल जेव्हा येते, त्यावेळी हाती पैसे नसतात. त्यामुळे थकबाकी वाढत असल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होत आहे.

शेतकऱ्यांकडून नवीन कृषिपंप वीज धोरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबर २०२०मध्ये नवीन कृषिपंप वीज धोरण जाहीर झाले. या धोरणात थकबाकी भरण्यासाठी महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत विविध सवलती जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर औरंगाबाद परिमंडळात १ मार्चपर्यंत ४२ हजार २६३ शेतकऱ्यांनी २१ कोटी ९५ लाखांचा भरणा केला आहे. यासंदर्भात शेतकरी लक्ष्मण चंदेल (शिल्लेगाव) म्हणाले, दोन-तीन वर्षांपूर्वी पाऊस नव्हता. त्यामुळे विहिरीला पाणी नव्हते, तरीही वीजबिल आले. सचिन वाल्मीकराव शेलार (शहाजतपूर) म्हणाले, कोरोना काळात शेतकरी हातघाईस आले असून, वीजबिल माफ केले पाहिजे. विजेचा वापर कमी होत असताना बिले मात्र जास्तीची येत आहेत, ही मोठी अडचण आहे.

तालुकानिहाय कृषिपंपचालकऔरंगाबाद - २८,८०७गंगापूर - २७,९०६कन्नड - ३१,४९१खुलताबाद - ११,३०६पैठण - ३१,४४६फुलंब्री - १९,१७१सिल्लोड - २७,७४०सोयगाव - ९,३०७वैजापूर - ३९,९४९जिल्ह्यातील कृषिपंपचालक - २,२७,१२३वीजबिल थकबाकी - २,६७२ कोटी

कृषिपंपधारकांना दर तीन महिन्यांनी वीजबिल दिले जाते. शिवाय मोबाईवरही बिल कळवले जाते. ज्यांनी मोबाईल नंबरची नोंदणी केली नसेल, त्यांना माहिती मिळत नसेल. नियमितपणे वीजबिलाचे वितरण केले जाते.- संजय अकोडे, अधीक्षक अभियंता, (ग्रामीण) महावितरण

मी चार वर्षांपूर्वी कृषी संजीवनी योजनेत जुने थकीत बिल भरले व बेबाकी करून विहिरीवर विद्युत मीटर बसवला; परंतु चार वर्षांत एकदाही मीटर रिडींग न घेता, मला ६३ हजारांचे बिल देण्यात आले. विशेष म्हणजे, माझ्या मीटरमध्ये आज रोजी ९ हजार ७४१ युनिट असताना ३६ हजार ५३० युनिटचे बिल पाठवले आहे.- एस. लक्ष्मण, लाडसावंगी

महावितरण कंपनी तीन ते चार वर्षांत एकदा वसुलीसाठी येते. ज्याचे लाख-दोन लाख बिल थकले, त्याच्याकडून पाच हजार रुपये व ज्याचे दहा ते वीस हजारांचे बिल थकले, त्याच्याकडूनही पाच हजार रुपयेच वसूल केले जातात.- राजेंद्र डवणे, सय्यदपूर

ज्यावेळेस पैसे असतात, त्यावेळी बिल येत नाही. ज्यावेळी शेतकऱ्यांकडे पैसे नसतात, त्यावेळी वीजबिल येते. विजेसंदर्भात असलेल्या अडचणीही सोडवल्या जात नाहीत. महावितरणने वाढीव बिलाची समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले पाहिजे.- रामेश्वर निघोटे, हडस पिंपळगाव

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरण