शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंपचालकांची व्यथा : दर तीन महिन्याला बिले मिळेनात, हजारोंची बिले एकदाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 18:47 IST

शेतकऱ्यांकडून नवीन कृषिपंप वीज धोरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देबिल न देताच महावितरणकडून केली जाते वसुली

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : महाकृषी ऊर्जा अभियानात जिल्ह्यातील २ लाख २७ हजार कृषिपंप ग्राहकांना वीजबिल कोरे करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही बाब शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी ठरत असून, या ग्राहकांना दर तीन महिन्याला बिले दिली जात असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे; परंतु कृषिपंप ग्राहकांना वर्षानुवर्षे वीजबिलेच मिळत नाहीत. तसेच बिल जेव्हा येते, त्यावेळी हाती पैसे नसतात. त्यामुळे थकबाकी वाढत असल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होत आहे.

शेतकऱ्यांकडून नवीन कृषिपंप वीज धोरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबर २०२०मध्ये नवीन कृषिपंप वीज धोरण जाहीर झाले. या धोरणात थकबाकी भरण्यासाठी महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत विविध सवलती जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर औरंगाबाद परिमंडळात १ मार्चपर्यंत ४२ हजार २६३ शेतकऱ्यांनी २१ कोटी ९५ लाखांचा भरणा केला आहे. यासंदर्भात शेतकरी लक्ष्मण चंदेल (शिल्लेगाव) म्हणाले, दोन-तीन वर्षांपूर्वी पाऊस नव्हता. त्यामुळे विहिरीला पाणी नव्हते, तरीही वीजबिल आले. सचिन वाल्मीकराव शेलार (शहाजतपूर) म्हणाले, कोरोना काळात शेतकरी हातघाईस आले असून, वीजबिल माफ केले पाहिजे. विजेचा वापर कमी होत असताना बिले मात्र जास्तीची येत आहेत, ही मोठी अडचण आहे.

तालुकानिहाय कृषिपंपचालकऔरंगाबाद - २८,८०७गंगापूर - २७,९०६कन्नड - ३१,४९१खुलताबाद - ११,३०६पैठण - ३१,४४६फुलंब्री - १९,१७१सिल्लोड - २७,७४०सोयगाव - ९,३०७वैजापूर - ३९,९४९जिल्ह्यातील कृषिपंपचालक - २,२७,१२३वीजबिल थकबाकी - २,६७२ कोटी

कृषिपंपधारकांना दर तीन महिन्यांनी वीजबिल दिले जाते. शिवाय मोबाईवरही बिल कळवले जाते. ज्यांनी मोबाईल नंबरची नोंदणी केली नसेल, त्यांना माहिती मिळत नसेल. नियमितपणे वीजबिलाचे वितरण केले जाते.- संजय अकोडे, अधीक्षक अभियंता, (ग्रामीण) महावितरण

मी चार वर्षांपूर्वी कृषी संजीवनी योजनेत जुने थकीत बिल भरले व बेबाकी करून विहिरीवर विद्युत मीटर बसवला; परंतु चार वर्षांत एकदाही मीटर रिडींग न घेता, मला ६३ हजारांचे बिल देण्यात आले. विशेष म्हणजे, माझ्या मीटरमध्ये आज रोजी ९ हजार ७४१ युनिट असताना ३६ हजार ५३० युनिटचे बिल पाठवले आहे.- एस. लक्ष्मण, लाडसावंगी

महावितरण कंपनी तीन ते चार वर्षांत एकदा वसुलीसाठी येते. ज्याचे लाख-दोन लाख बिल थकले, त्याच्याकडून पाच हजार रुपये व ज्याचे दहा ते वीस हजारांचे बिल थकले, त्याच्याकडूनही पाच हजार रुपयेच वसूल केले जातात.- राजेंद्र डवणे, सय्यदपूर

ज्यावेळेस पैसे असतात, त्यावेळी बिल येत नाही. ज्यावेळी शेतकऱ्यांकडे पैसे नसतात, त्यावेळी वीजबिल येते. विजेसंदर्भात असलेल्या अडचणीही सोडवल्या जात नाहीत. महावितरणने वाढीव बिलाची समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले पाहिजे.- रामेश्वर निघोटे, हडस पिंपळगाव

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरण