शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जागतिक संग्रहालय दिन : पर्यटन राजधानीतील ऐतिहासिक संग्रहालये पर्यटकांच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 17:25 IST

संग्रहालयांचा प्रचार व प्रसार करण्यात कमी पडतेय यंत्रणा

औरंगाबाद : शालिवाहन राजवटीची समृद्धता उपभोगलेले आपले शहर इतिहासाच्या अनेक खाणाखुणा जपून आहे. इथल्या इतिहासप्रेमींनी गतकाळाचे वैभव सांगणाऱ्या अनेक मौल्यवान वस्तू सांभाळल्या, जपल्या. आज या वस्तूंची संग्रहालयेही शहरात उभी आहेत; पण संग्रहालयांची ओळख निर्माण करण्यात यंत्रणा कमी पडल्यामुळे या ऐतिहासिकनगरीतील संग्रहालये अजूनही पर्यटकांच्या प्रतीक्षेतच आहेत.

१८ मे हा दिवस जागतिक संग्रहालय दिन म्हणून साजरा केला जातो. औरंगाबादसारख्या ऐतिहासिक शहराच्या दृष्टीने तर या दिवसाचे महत्त्व अधिकच आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संग्रहालय, सोनेरी महाल परिसरातील राज्य पुरातत्व विभागाचे संग्रहालय, महानगरपालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय, मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्रहालय अशी अतिशय समृद्ध वारसा जपणारी संग्रहालये सध्या शहरात आहेत. असे असतानाही तुरळक पर्यटक संग्रहालये पाहण्यासाठी येतात. कारण या शहरात संग्रहालये आहेत, हीच गोष्ट मुळात त्यांना माहिती नसते.

रेल्वेस्टेशन, बसस्थानक, विमानतळ यासारख्या ठिकाणी कोठेही पुरातन वस्तू संग्रहालयाबाबत माहिती देणारे फलकलावलेले नाहीत. एमटीडीसीच्या संकेतस्थळावरही या संग्रहालयांचा उल्लेख नाही. त्यामुळे पर्यटक इथपर्यंत पोहोचूच शकत नाहीत. विद्यापीठातील अतिशय संपन्न असणाऱ्या संग्रहालयात दरवर्षी १० हजारांच्या आसपास पर्यटक भेट देतात. दरवर्षी अजिंठा-वेरूळ लेणी पाहायला येणाऱ्या पर्यटकांच्या तुलनेत हा आकडा खूपच कमी आहे. या ऐतिहासिक ठेवींबाबत शासन दरबारी असणारी अनास्था हेही यामागचे प्रमुख कारण आहे, असे म्हटले जाते.

संग्रहालयांची माहितीपुस्तिका तयार व्हावीमुळात आपल्याकडच्या अजिंठा-वेरूळ या जगप्रसिद्ध स्थळांचीच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटकांमध्ये नीट प्रसिद्धी होत नाही. असे असताना संग्रहालयांचा प्रचार आणि प्रसार करणे तर खूपच दूरचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संग्रहालयातील एकेक वस्तू पीएच.डी. करण्यासारखी आहे. या वस्तू जेव्हा पर्यटक पाहतात, तेव्हा ते आम्हाला सांगतात की या संग्रहालयांचा उल्लेख त्यांना पर्यटन विभागाच्या कोणत्याही पुस्तिकेत आढळलेला नाही. आपल्याकडील संग्रहालयांबाबत पर्यटकांना माहितीच नसते. त्यामुळे संग्रहालयांची योग्य माहितीपुस्तिका तयार करणे, एखादे संकेतस्थळ तयार करून त्यावर पुरेशी माहिती देणे यासारखे काम होण्याची गरज आहे. याशिवाय आपले शहर औद्योगिक दृष्ट्या पुढे आणण्याकडेच राजकारण्यांचा कल आहे. पर्यटनाच्या दृष्टीने शहराचा विकास करू पाहणारा नेता आपल्याक डे नाही. - दुलारी कुरेशी

विशेष उपक्रम आयोजित करावेतप्रत्येक संग्रहालयांमध्ये ऐतिहासिक वस्तूंचा एक विशिष्ट ठेवा असतो. जो काही खास वेळेतच काढला जातो. उदाहरणार्थ दिल्ली येथील संग्रहालयात खास ‘निजाम ज्वेलरी’चे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात येते, जे वर्षातून काही दिवसच असते, असे काही उपक्रम आपल्या शहरातील संग्रहालयांमध्ये झाले पाहिजेत. शाळा, महाविद्यालयांच्या सहली येथे आवर्जून नेल्या पाहिजेत, तसेच ज्या संग्रहालयाचे जे वैशिष्ट्य असेल त्यावर भाष्य करणाऱ्या तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित करणे, अशा उपक्रमांच्या माध्यमातून शहरातील संग्रहालयांचा प्रचार आणि प्रचार करणे गरजेचे आहे. - शिवाकांत वाजपेयी, उपअधीक्षक,भारतीय पुरातत्व सर्वेक्षण

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटनhistoryइतिहास