शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक मूत्रपिंड दिन : मूत्रपिंड प्रत्यारोपणाची वेळेच येऊ देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 19:52 IST

मराठवाड्यात प्रत्यारोपणासाठी ३०८ लोकांना प्रतीक्षा मूत्रपिंडाची

- संतोष हिरेमठ  

औरंगाबाद : औरंगाबाद विभागात म्हणजे मराठवाड्यात तब्बल ३०८ जण मूत्रपिंड मिळण्याच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती पुढे आली आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे. मात्र, आरोग्याची योग्य काळजी घेतली, तर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची वेळच येणार नाही, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

दरवर्षी मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार जागतिक मूत्रपिंड दिन म्हणून पाळण्यात येतो. सामान्य लोकसंख्येच्या ३ पैकी एका व्यक्तीस मूत्रपिंडाचा आजार होण्याची शक्यता असते, अशी माहिती आरोग्य संघटनांच्या आकडेवारीवरुन समोर येते. त्यासाठी अनेक कारणे आहे. मूत्रपिंड निकामी झाल्यानंतर डायलिसिस (रक्तशुद्धीकरण) आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण या सारखे उपचार करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरील आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक खबरदारी घेतली, तर डायलिसिस, प्रत्यारोपणाची परिस्थिती टाळणे शक्य असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.

मूत्रपिंड विकाराची लक्षणे- भूक मंदावणे.- थकवा जाणवणे.- रक्तदाब खूप वाढणे.- अंगावर सूज येणे.- मूत्रपिंडातून रक्त, पू जाणे.- मूत्रपिंडाच्या मागील भागात पाठीत दुखणे.

यांना सर्वाधिक धोका- मधुमेह असणे.- उच्च रक्तदाब असणे.- स्थूलता.- कुटुंबात एखाद्या व्यक्तीस मूत्रपिंड विकार.

ही घ्या काळजी- नियमितपणे व्यायाम करणे.- रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे.- स्थूलता वाढू न देणे.- रक्तदाब १४०-९० च्या खाली ठेवणे.- जंकफूड टाळणे.- विनासल्ला पेनकिलर घेणे टाळण- रोज किमान अडीच लिटर पाणी पिणे.- मूतखड्याचा वेळीच उपचार करणे.

असा वाढतोय आलेख- मराठवाड्यात आॅगस्ट २०१९ मध्ये २७६ रुग्ण मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत होते. - रुग्णांची संख्या जानेवारी २०२० मध्ये २९३ वर गेली आहे.- मार्च महिन्याच्या १० तारखेपर्यंत ही संख्या आता ३०८ वर पोहोचली आहे. 

योग्य आहार घ्यावामूत्रपिंड विकार टाळण्यासाठी नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. दररोज २ कि.मी. चालले पाहिजे, शक्य झाले तर धावले पाहिजे. सकस आहार घेतला पाहिजे. वजन नियंत्रणात ठेवले पाहिजे. - डॉ. सुहास बावीकर, मूत्रपिंडविकारतज्ज्ञ

विनासल्ला औषधी नकोमूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेसाठी वर्षातून एका तज्ज्ञाकडून तपासणी करून घेतली पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधी, विशेषत: पेनकिलर घेता कामा नये. रोज किमान अडीच लिटर पाणी प्यावे.- डॉ. रवींद्र भट्टू, मूत्रपिंडविकारतज्ज्ञ 

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टर