शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

जळगाव रस्त्याचे काम पैशाअभावी बंद; लक्ष कोण देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 18:13 IST

अजिंठा आणि जळगावपर्यंत जाणाऱ्या नागरिकांचे हाल

ठळक मुद्देदीड वर्षापासून काम चालूऔरंगाबाद ते अजिंठापासून पुढे फर्दापूर ते जळगावपर्यंत हा रस्ता करण्यात येणार आहे. तीन टप्प्यांत ८७० कोटींच्या आसपास खर्च होणार आहे.

- विकास राऊत 

औरंगाबाद : जळगाव ते औरंगाबाद या चौपदरी रस्त्याचे काम पैशांअभावी बंद पडले असून, कंत्राटदाराला बँकेकडून हमी मिळत नसल्यामुळे त्याने तोंड दडविण्यास सुरुवात केली आहे. रस्त्याचे ३० टक्केच काम झाले असून, उर्वरित काम पैसे मिळाले तरच वेगाने होण्याची शक्यता आहे. 

राज्य महामार्ग प्राधिकरणाची सर्व सूत्रे मुंबईतून हालत असल्यामुळे स्थानिक कार्यालयातील अभियंत्यांना कंत्राटदार काहीही दाद देईना, तर मुंबई आणि दिल्लीतून पैसे देण्यासाठी कुणीही लक्ष घालेना. परिणामी, पर्यटक, शासकीय कर्मचारी आणि सामान्य नागरिकांना औरंगाबाद ते जळगावपर्यंत जाण्यासाठी रोज धूळ आणि चिखलातून प्रवास करत जावे लागते आहे. 

जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांकडे जाण्यासाठी चौपदरी रस्ता असावा, यासाठी लोकमतने तीन वर्षे वृत्तांच्या माध्यमातून पाठपुरावा केला. त्यानंतर केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी लोकमतच्या पाठपुराव्याची दखल घेत भूमिपूजनाच्या दिवशी त्या रस्त्याच्या कामाला चौपदरीकरणाची तत्त्वत: मंजुरी दिली. त्यामुळे रस्त्याच्या खर्चाचा आकडा ८७० कोटींत गेला; परंतु कागदोपत्री तरतूद होण्यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने उशीर केला. दरम्यानच्या काळात कंत्राटदाराने पूर्ण रस्ता खोदून टाकला. सरकारी कार्यालये आणि लेण्यांकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि पाठीच्या दुखण्यासह नागरिक दीड वर्षापासून त्रस्त आहेत.  

औरंगाबाद ते अजिंठापासून पुढे फर्दापूर ते जळगावपर्यंत हा रस्ता करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन टप्प्यांत ८७० कोटींच्या आसपास खर्च होणार आहे. आंध्र प्रदेशमधील ऋत्विक एजन्सी या संस्थेकडे त्या कामाचे कंत्राट असून, चौपदरीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळावी यासाठी राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी दिल्ली मुख्यालयाकडे २० हेलपाटे मारल्यानंतर मंजुरी मिळाली; पण पैसे मिळण्यास दिल्लीकरांनी हात आखडता घेतला. 

अधीक्षक अभियंत्यांचे मत असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता एल.एस. जोशी यांनी सांगितले, अजिंठा ते सिल्लोड या टप्प्यातील कामाला पैसे मिळालेले नाहीत. दोन टप्प्यांतील पैसे मिळालेले आहेत. कंत्राटदाराला पुढील टप्प्यासाठी बँक गॅरंटी मिळालेली नाही. एका बाजूचे शेवटच्या अडीच किलोमीटरमध्ये काम बाकी आहे. फुलंब्री ते पाल फाट्यापर्यंत एका बाजूने काम झाले आहे. दुसरी बाजू पूर्णत: बाकी आहे. ३० टक्केच काम झाले आहे. सुधारित करार कंत्राटदाराबरोबर करावा लागणार आहे. तेव्हा कामाची डेडलाईन ठरेल. कंत्राटदाराला बँक गॅरंटी मिळण्यात आहे.

५० टक्के रक्कम तरीही ३० टक्केच काम ८७० कोटींपैकी सुमारे ६०० कोटींची नव्याने वाढीव तरतूद झाली आहे. मूळ काम २७0 कोटींचेच होते. साडेसात मीटर रुंद व मध्यवर्ती भागात दुभाजकासह तो रस्ता होईल. शहरात आल्यावर रस्त्याची रुंदी वाढेल. ५० टक्के रक्कम कंत्राटदाराला आजवर दिली आहे.३०४ कोटी पहिल्या टप्प्यात२५० कोटी दुसऱ्या टप्प्यात३१६ कोटी तिसऱ्या टप्प्यात 

टॅग्स :highwayमहामार्गAurangabadऔरंगाबादtourismपर्यटनfundsनिधीpwdसार्वजनिक बांधकाम विभाग