शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

लघु व मध्यम उद्योगांसाठीच्या जयपूर औद्योगिक वसाहतीचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 20:02 IST

जमिनीचा १०० टक्के ताबा घेतल्यानंतर त्याठिकाणी पायाभूत सुविधा देण्याचे नियोजन ‘एमआयडीसी’ची अभियांत्रिकी शाखा करणार आहे.

ठळक मुद्देशेंद्र्यालगत उदयास येत असलेल्या ‘एमआयडीसी’साठी ८० टक्के भूसंपादन

- विजय सरवदे  औरंगाबाद : लघु व मध्यम उद्योगांना परवडतील या दरात भूखंड उपलब्ध करून देण्यासाठी शेंद्र्यालगत १९२ हेक्टरवर नवीन जयपूर औद्योगिक वसाहत उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 

वाळूज, शेंद्रा तसेच ‘डीएमआयसी’ या औद्योगिक वसाहतींमध्ये उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे तेथे भूखंडाचे दरही जास्त आहेत. याशिवाय वाळूज तसेच शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये आता भूखंड शिल्लक नाहीत. लघु- मध्यम उद्योगांना जास्तीच्या दरात भूखंड घेणे परवडत नाही. त्यासाठी लघु व मध्यम उद्योग डोळ्यांसमोर ठेवून जयपूर औद्योगिक वसाहत नव्याने विकसित केली जात आहे. याठिकाणी त्यांना परवडेल, अशा दरात भूखंड उपलब्ध करून दिले जातील. 

यासंदर्भात ‘एमआयडीसी’चे सहमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास जाधव यांनी सांगितले की, या ठिकाणी १८१ हेक्टर खाजगी व ११ हेक्टर सरकारी जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. यापैकी जवळपास ८० टक्के जमिनीचा ताबा घेतला असून २० टक्के जमिनीचा मावेजा देणे बाकी आहे. जमिनीचा १०० टक्के ताबा घेतल्यानंतर त्याठिकाणी पायाभूत सुविधा देण्याचे नियोजन ‘एमआयडीसी’ची अभियांत्रिकी शाखा करणार आहे. उर्वरित मावेजाची रक्कम शासनाकडून लवकरच प्राप्त होईल, असे ‘एमआयडीसी’च्या प्रादेशिक विभागातील उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी सांगितले. 

नवा बेल्ट विकसितऔरंगाबाद जिल्हा औद्योगिक विकासाच्या गतीवर मार्गक्रमण करण्याच्या दृष्टीने मागील काही वर्षांत जालना रोडवरील औद्योगिक परिसर विकसित झाला आहे. सुरुवातीला शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहत निर्माण झाली. त्यानंतर आलेल्या डीएमआयसी आणि आॅरिक सिटीने या परिसराचे रुपच पालटून टाकले. बिडकीनचा परिसरही आकार घेत आहे. आता जयपूरची वसाहत अंतिम टप्प्यात आहे. 

आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘एमआयडीसी’औरंगाबादेतील दिल्ली-मुंबई इंड्रस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) ही आंतरराष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत उदयास येत आहे. याशिवाय मानगाव व सातारा येथेही अशाप्रकारची ‘एमआयडीसी’ उदयास येत आहे. देशातील ८ राज्यांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘एमआयडीसी’ उदयास येत असल्या तरी आपल्या राज्यातच अशा औद्योगिक वसाहतींचे काम पूर्ण झाले असून, प्लॉट वाटपही सुरू झाले आहेत. भविष्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणाऱ्या औद्योगिक वसाहती वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. 

उद्योगांबाबतचे धोरण कॅबिनेटसमोर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त उद्योगांना आकर्षित करण्यासाठी राज्यातील सर्व ‘एमआयडीसीं’साठी एक धोरण (पॉलिसी) निश्चित करण्यात आले असून, ते मंजुरीसाठी कॅ बिनेटसमोर ठेवले आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात त्यास मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा सहमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास जाधव यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :MIDCएमआयडीसीAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसाय