ऊन, भारनियमन, पाणीटंचाईचा तडाखा

By Admin | Updated: May 25, 2014 01:32 IST2014-05-25T01:26:36+5:302014-05-25T01:32:35+5:30

औरंगाबाद : शनिवारचा दिवस औरंगाबादकरांसाठी त्रासदायक ठरला. उन्हाच्या जोरदार झळांनी नागरिकांना बाहेर पडणे अवघड झाले.

Wool, weight loss, water scarcity | ऊन, भारनियमन, पाणीटंचाईचा तडाखा

ऊन, भारनियमन, पाणीटंचाईचा तडाखा

औरंगाबाद : शनिवारचा दिवस औरंगाबादकरांसाठी त्रासदायक ठरला. उन्हाच्या जोरदार झळांनी नागरिकांना बाहेर पडणे अवघड झाले. शहराचे तापमान ४१.२८ अंश सेल्सिअसपर्यंत गेले. उन्हाचा तडाखा चालू असतानाच काही भागांमध्ये अघोषित भारनियमनामुळे लहानथोर घामाघूम झाले. या दोन संकटांचा मुकाबला करतानाच विस्कळीत पाणीपुरवठ्याचा परिणाम म्हणून शहरवासीयांना आज पाण्यासाठी भटकंती करावी लागली व धावपळही करावी लागली. अनेक व्हॉल्व्हची दुरुस्ती न झाल्यामुळे कमी दाबाने अनेक भागात पाणीपुरवठा होत असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत.: महिन्यापासून शहराचे तापमान वाढतच आहे. शनिवारी तापमान ४१.२८ अंश सेल्सिअसवर गेले होते. त्यामुळे गजबजलेल्या रस्त्यांवरील वर्दळ घटली होती. नेहमी वर्दळ असणार्‍या क्रांतीचौक, पैठणगेट, गुलमंडी, औरंगपुरा, कॅनॉट गार्डन, सिडको, हडको भागात गर्दी घटली होती. असह्य उन्हामुळे नागरिकांनी घरात राहणे पसंद केले. उन्हामुळे बाजारपेठेवरही परिणाम झाला. ग्राहकांची उपस्थिती लक्षणीय घटली होती. रस्त्यावर तुरळक वाहने दिसत होती. बहुतेक महिला व पुरुषांनी उन्हापासून संरक्षणासाठी तोंडाला रुमाल बांधला होता. बाजारपेठेत जी वर्दळ दिसत होती त्यांच्यापैकी बहुतेकांकडे छत्री होती. सुट्यांचा आनंद घेण्यासाठी लहान मुले उन्हामुळेच उद्यान व मैदानावर दिसली नाहीत. गेल्या महिन्याभराचे तापमान पाहता रविवारीही पारा चढलेलाच राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. लग्नसराईच्या खरेदीसाठी आज शहरात आलेल्या नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी नाकातोंडाला गमचे बांधलले दिसले. शहागंज परिसरात थंड पेयाच्या गाड्यांवर नागरिकांची गर्दी दिसली. येत्या दोन ते तीन दिवसांत शहरातील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.औरंगाबाद शहराचे मे महिन्याचे तापमान हे सरासरी ३९ अंश सेल्सिअस इतके आहे. गेल्या वर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल आणि मे महिन्यांत तापमान सातत्याने अधिकतम राहिले होते. यंदाही मे महिन्यात तापमानाने उंची गाठली. मे महिन्यात पारा ४४.६ अंश सेल्सिअसपर्यंत गेला. गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहर आणि परिसरात तापमान वाढलेले दिसत आहे.

Web Title: Wool, weight loss, water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.