शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

उपाशी पोटी धडपडणाऱ्या जिवांसाठी उभी राहिली ‘महिला धान्य बँक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 11:41 IST

हजारो लोकांचे पोट भरण्यात यश 

ठळक मुद्देजालना जिल्ह्यात ‘मैत्र मांदियाळी’चा उपक्रम३५० महिला सदसस्या कार्यरत

- ऋचिका पालोदकर

औरंगाबाद : कुठे पंचपक्वान्नाने भरलेले ताट, तर कुठे उपाशीपोटी झोपणारे जीव, अशी दोन टोके आपल्या अवतीभवती सहज दिसून येतात. खपाटीला गेलेले पोट, कृश बालके, असे विदारक चित्र त्यांना अस्वस्थ करून गेले. कोणीही उपाशीपोटी झोपू नये म्हणून त्यांनी मैत्र मांदियाळी प्रतिष्ठान अंतर्गत महिला धान्य बँक सुरू केली. 

प्रत्येक उपाशी जिवापर्यंत अन्न पोहोचावे, या उद्देशाने जालना येथील मैत्र मांदियाळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय किंगरे यांनी ‘धान्य बँक’ या योजनेची संकल्पना मांडली आणि प्रतिष्ठानच्या महिला कार्यकर्त्यांनी झपाटून काम करत अल्पावधीतच जालना जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वी करून दाखविला. या उपक्रमाचा सर्व कारभार महिलांकडून पाहिला जातो, म्हणून ‘महिला धान्य बँक’ म्हणून हा उपक्रम ओळखला जातो. जालना जिल्ह्यात जानेवारी- २०१९ मध्ये या उपक्रमाला सुरुवात झाली असून, आजपर्यंत हजारो लोकांचे पोट भरण्यात सदस्यांना यश मिळाले आहे. या उपक्रमांतर्गत महिला धान्य बँकेच्या सदस्यांकडून आपापल्या परिसरातील किंवा ओळखीच्या महिलांना दर महिन्याला दोन किलो गहू देण्यासाठी आवाहन केले जाते. दोन किलो गव्हाची किंमत साधारणपणे ६० रुपये एवढी गृहीत धरून ज्यांना गहू द्यायचे असतील त्यांनी गहू किंवा ज्यांना पैसे द्यायचे असतील त्यांनी पैसे द्यावेत, असे सुचविले जाते. 

ग्रामीण जनतेनेही घेतली प्रेरणा या उपक्रमांतर्गत चालणारे काम पाहून जालना जिल्ह्यातील चंदनहिरा गावातील लोकांनी प्रेरणा घेतली असून, त्यांच्या गावातही धान्य बँकेला सुरुवात केली आहे.

३५० महिला सदसस्या कार्यरतहा उपक्रम फक्त काही लोकांपुरता मर्यादित राहू नये म्हणून एका महिलेने कमीत कमी पाच महिलांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, असे सांगण्यात आले आहे. सध्या या उपक्रमांतर्गत ३५० महिला सदस्य कार्यरत आहेत. ही संख्या १००० पर्यंत नेण्याचा मानस असल्याचे काही सदस्यांनी सांगितले. ३०० पेक्षाही अनेक कुटुंबे नियमितपणे या उपक्रमाशी जोडल्या गेले आहेत. 

5200 किलो धान्य जमा उपक्रम सुरू झाल्यापासून आतापर्यंत धान्य बँकेने ५२०० किलो धान्य जमा केले आहे. यापैकी शांतीवन येथील दुष्काळी छावणीसाठी २१०० किलो तांदूळ पाठविण्यात आला असून, अन्नयज्ञ संस्थेला २५०० किलो धान्य पाठविण्यात आले आहे. गरजू कुटुंबांनाही जवळपास २०० किलो धान्य वाटप करण्यात आले आहे. जालनासोबतच महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमधील दानशूर व्यक्ती या उपक्रमाशी जोडल्या गेल्या असून, अवघ्या महाराष्ट्रातूनच मदतीचा ओघ सुरू आहे. 

सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळालेले गहू किंवा पैसे संकलित करून बँकेत जमा करण्यात येतात आणि नंतर ही मदत जालना येथील अन्नयज्ञ या संस्थेला दिली जाते. ६० रुपये प्रतिमहिना याप्रमाणे ७२० रुपये प्रतिवर्ष एवढी रक्कम देणे अनेकांना सहजशक्य असल्यामुळे या उपक्रमाला सुरुवातीपासूनच अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सदस्यांनी सांगितले. 

टॅग्स :Socialसामाजिकsocial workerसमाजसेवकAurangabadऔरंगाबादJalanaजालना