शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

 Women's Day Special : पोळ्या लाटून पैशांसोबत पुण्यही कमविणारी ‘अन्नपूर्णा’ : कमलबाई जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 11:57 IST

२५ वर्षांपासून पतीला साथ आणि कुटुंबालाही हात

- दीपक देशमुख

औरंगाबाद : परिश्रमाला प्रामाणिक प्रयत्नांची जोड मिळाली की संसाराचे नंदनवन होते, यावर विश्वास होता. माझाही संसार फुलविण्याचा विचार मनात ठसला अन् निर्र्धाराने पदर कमरेला खोचला. सात-आठ घरी पोळ्या लाटण्याचे काम मिळाले. आनंदाने हे काम स्वीकारले. कामाचा मोबदला मिळतोच, यासोबतच चार लोकांना चवदार पोळीभाजी करून खाऊ घालते त्याचाही आनंद मिळत गेला. या कामातून आर्थिक उन्नती साधली. मने जोडली. आता या सगळ्याला २५ वर्षे लोटली. हातपाय चालतील तोवर ही अन्नपूर्णेची भूमिका पार पाडत राहणार... कमलबाई जाधव यांनी हा निर्धार बोलून दाखविला. 

कमलबाई मूळच्या नाशिक जिल्ह्यातील ब्राह्मणगावच्या. गावात कामधंदा करून फार काही साध्य होणार नाही. मुलांना शिकवून मोठे करायचे हा विचार सतत दिनकर जाधव यांच्या मनात घोळत होता. या विचारानेच ते कमलबार्इंना सोबत घेऊन औरंगाबादेत आले. त्यांना एका सिक्युरिटी कंपनीमध्ये काम मिळाले; पण वेतन जेमतेमच. अशा परिस्थितीत कमलबार्इंनी त्यांंच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा विचार बोलून दाखविला. पतीच्या पाठीशी उभे राहिले आणि सुरू झाले नवे पर्व!

कमलबाई सांगतात, आर्थिक कमाई करण्यासोबतच आपल्याला आनंद देणारे आणि त्यातूनच पुण्य कमावता येणारे काम कोणते? हा विचार मनात घोळू लागला. यातूनच घरोघरी पोळी-भाजी करून देण्याचे काम आपण मिळवावे असे वाटले. अन्नपूर्णा होण्याचे पक्के झाले. कामही मिळाले आणि ते वाढत गेले. यातून चार पैसे तर मिळू लागले. चवदार जेवण बनवून दिल्यानंतर दाद मिळू लागली. त्यामुळे उत्साह वाढत गेला. 

संसारवेलीवर उमलेली दोन फुले, दोन्ही मुले शिकली. मोठा मनोज विमा कंपनीत, धाकटा एका ज्वेलर्सकडे ‘उत्तम कारागीर’ म्हणून काम करतो. दोघांचीही लग्न झाली. गावाकडे शेतीवाडी नव्हती. आपले स्वत:च्या मालकीचे घर असावे हे स्वप्न होते. तेही स्वप्न २००९ मध्ये पूर्ण झाले. संसारात अडचणी येतात; पण यातून मार्गही काढता येतो, यावर माझा विश्वास आहे. हाच अनुभव मीही घेतला. त्यातून सहज सावरताही आले. जबाबदाऱ्या ज्या काळात वाढत चालल्या होत्या त्याच वळणावर अडचणींनी आम्हा पती-पत्नीला गाठले होते. सारे काही सुरळीत सुरू असताना वादळेही अनुभवली. पतीची नजर क्षीण होत चालली होती. कालांतराने पतीची कमाई बंद झाली. तरीही आम्ही डगमगलो नाही. पोळ्याभाजी करण्याच्या कामातून बराच मोठा हातभार लागत होता. आता मुले कमावती झाली. ते आता आराम करा म्हणतात; पण गेली २५ वर्षे ज्यांच्याकडे पोळीभाजी केली, त्या सगळ्यांची मी कधी ‘मावशी’ झाली हे कळलेच नाही. आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे मी ‘निवृत्ती’ घेणार नाही. हातपाय चालतील तोवर मी हे काम करीत राहणार, असे सांगायलाही कमलबाई विसरल्या नाहीत. 

कधी पोळी करपली नाहीसकाळी ५ वाजता माझा दिवस सुरू होतो. सकाळचा चहा सगळ्यांसोबत गप्पाटप्पांमध्ये होतो. दिवसाची सुरुवात अशी रोज मोठ्या आनंदात होते. सकाळी ७ वाजता पोळ्या-भाजी करून देण्याच्या कामाला सुरुवात होते. हात यंत्रागत गतीने कधी चालायला सुरुवात होतात ते कळतच नाही. दुपारी १ वाजेपर्यंत घरोघरी जाऊन हे काम करते. गेल्या २५ वर्षांत पोळी करपल्याची कधी कोणाची तक्रार नाही आली, हे मला मोठे सुख देवून जाते, असे कमलाबाई स्वाभिमानाने सांगतात. 

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनWomenमहिलाAurangabadऔरंगाबाद