शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

Women's Day Special : पतीच्या आत्महत्येनंतर दोन लेकरांना जगविण्याच्या जिद्दीने मिळाले बळ : वैशाली येडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 12:31 IST

वैशाली यांचा सहभाग असलेले आत्महत्याग्रस्त विधवा आणि शेतकऱ्यांच्या लेकीचं ‘तेरवं’ हे नाटक लक्षवेधून घेत आहे

- राम शिनगारे

औरंगाबाद : आम्ही अल्पभूधारक शेतकरी. दुष्काळ पाचवीलाच पूजलेला. नवऱ्याकडे खाजगी सावकाराचे कर्ज. शेतीत काहीच पिकत नसल्यामुळे सावकारांनी कर्जाच्या परतफेडीसाठी लावलेल्या तगाद्यामुळे नवऱ्याने आत्महत्या केली. मी नुकतीच बाळांतीण झालेली. दीड वर्षाचा मुलगा, एक महिन्याची मुलगी. तीन जीव कसे जगवणार असा प्रश्न होता. पण दोन लेकरांना जगविण्याच्या जिद्दीने आणि मेहनतीमुळे खडतर प्रवास सुरळीत सुरू असल्याचे वैशाली येडे यांनी सांगितले.

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या यावर्षीच्या उद्घाटक आंतरराष्ट्रीय लेखिका नयनतारा सहगल यांचे आमंत्रण ऐनवेळी रद्द केल्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकरी पत्नीच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील राजूर येथील वैशाली येडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तेव्हापासून परिचित झालेल्या वैशाली यांचा सहभाग असलेले आत्महत्याग्रस्त विधवा आणि शेतकऱ्यांच्या लेकीचं ‘तेरवं’ हे नाटक महिला दिनानिमित्त एमजीएम संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात शुक्रवारी दुपारी होणार आहे. यानिमित्ताने वैशाली येडे यांचा जीवनप्रवास जाणून घेतला.

पतीच्या मृत्यूची वार्ता येताच पायाखालची जमीन हादरली. पोरगा दीड वर्षाचा, मुलगी एक महिन्याची. तीन जिवांना काय खाऊ घालावे? कसे जगवावे? असे अनेक प्रश्न समोर होते. वडिलांनी वर्षभर मदत केली. या वर्षाच्या कालावधीत शिवणकाम शिकले. वडिलांनी एक मशीन घेऊन दिली. २०१३ मध्ये दोन लेकरं घेऊन सासरी राहण्यास आले. घरातील लोक मदत करण्यास तयार नव्हते. याच वेळी अंगणवाडीत सेविका म्हणून अर्ज निघाले होते. अर्ज भरल्यानंतर नोकरी लागली. अंगणवाडी सेविकेच्या नोकरीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या मदतीसह शिवणकाम सुरूच ठेवले. वेळ मिळेल तेव्हा दुसऱ्याच्या शेतात रोजंदारी सुरू केली. घरातील लोक लेकरं देऊन गाव सोडून जा म्हणून दबाव टाकत होते. त्यास ठाम नकार दिला. याच वेळी यवतमाळच्या एका संस्थेशी संबंध आला. त्या संस्थेत महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत होते. मीही त्यात प्रशिक्षण घेतले. त्यात काही मशीन मिळाल्या. यातून आत्मविश्वास बळावत गेला. त्यानंतर एकल महिला किसान संघटनेत सहभाग घेतला. तेथे अनेक एकल महिलांची भेट झाली. भेटलेल्या महिलांपेक्षा आपले दु:ख कमी असल्याची जाणीव झाली. पुढे नाम फाऊंडेशनने एकल महिलांना मदत वाटप केली. त्यात मला लाभ मिळाला नव्हता. त्यामुळे समन्वयक हरीश इथापे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यांनी परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर १५ हजारांची मदत मिळाली. तेव्हाच हरीश इथापे यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आणि शेतकऱ्यांच्या लेकींना घेऊन ‘तेरवं’ या नाट्यातून शेतकऱ्यांची परिस्थिती समाजापुढे मांडत असल्याचे त्यांनी सांगितले. 

पती गेला तेव्हा बाळंतपणासाठी माहेरीवैशाली यांचे २००९ साली लग्न झाले. त्यांना त्याच वर्षी ३१ डिसेंबर रोजी एक मुलगा झाला. पतीसह त्या शेतात राबत होत्या. त्या कालावधीतील दोन वर्षात शेतात कष्ट करूनही उत्पन्न मिळाले नाही. शेतात खर्च करण्यासाठी बँकेकडून कर्जही मिळाले नाही. त्यासाठी खाजगी सावकाराकडून नवऱ्याने पैसे घेतले. भरमसाठ व्याजामुळे पैसे जास्त झाले. माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा ७० ते ८० हजार रुपये व्याजाचे होते. पण पतीने आत्महत्या केल्यानंतर अनेक जण म्हणत होते की आमचेही पैसे आहेत म्हणून. पतीने २ आॅक्टोबर २०११ रोजी आत्महत्या केली. तेव्हा बाळंतपणासाठी माहेरी होते. २४ आॅगस्ट २०११ रोजी मुलगी झाली होती.

जगण्याच बळ पंखात भरल २०११ साली दीड वर्षाचा मुलगा, एक महिन्याची मुलगी. पतीची आत्महत्या. अशा कठीण परिस्थितीतून सुरू झालेला प्रवास इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. आज जगण्याचे बळ पंखात भरलेले आहे. अंगणवाडीत नोकरी, शिवणकाम, एकल महिला किसान संघटना, नाम फाऊंडेशनसह ‘तेरवं’ नाट्यातून अभिनयापर्यंत मजल मारली आहे.- वैशाली येडे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनWomenमहिलाAurangabadऔरंगाबाद