शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

भाज्या महागल्याने महिलांचे बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 15:30 IST

पाणीटंचाईचा परिणाम भाजीपाला उत्पादनावर

ठळक मुद्देजिल्ह्यातून आवक झाली कमीनाशिक, पुण्याहून येताहेत बहुतांश भाज्या

औरंगाबाद : श्रावण घेवडा ८० रुपये, हिरवी मिरची ८० रुपये, वांगे, गवार, भेंडी ६० रुपये प्रतिकिलो हे भाव ऐकले की, सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होत आहेत. शहरात येणाऱ्या बहुतांश भाज्या नाशिक, पुण्याहून आणल्या जात आहेत. आवक कमी झाल्याने भाज्या महागल्या आहेत. सर्वसामान्य महिलांचे बजेट कोलमडले आहे. 

पाणीटंचाईने भाजीपाल्याच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. जिल्ह्यातूनच आवक कमी होत असल्याने अडत व्यापारी नाशिक, पुण्याहून भाज्या मागवीत आहेत. आवक कमी व मागणी जास्त असल्याने भाज्यांचे भाव वधारले आहेत. लिंबू ८० रुपये किलो, हिरवी मिरची ८० रुपये, टोमॅटो ५० ते ६० रुपये, पत्ताकोबी २० ते २५ रुपये, फुलकोबी ४० ते ५० रुपये, कारले ६० रुपये, दुधी भोपळा २५ ते ३० रुपये, तर शेवग्याच्या शेंगा ६० रुपये प्रतिकिलोने विकत आहेत. एवढेच नव्हे, तर लसूण व अद्रकच्या भावाने प्रतिकिलो १०० रुपयांचा आकडा गाठला आहे. हायब्रीड लसूण ८० ते गावरान लसून १०० रुपये किलोने विकत आहे. एरव्ही भाज्या स्वस्त झाल्या की, गल्लीबोळांतून फिरणाऱ्या हातगाड्या आता गायब झाल्या आहेत. कारण, हातगाडीवर महागड्या भावात ग्राहक भाज्या खरेदी करीत नाहीत. त्यासाठी ग्राहक परिसरातील भाजीमंडीतच जात आहेत. हातगाड्यावर लसूण विक्रीला येत आहे. मात्र, गावरान म्हणून ग्राहकांना हायब्रीड लसूण दिला जात आहे. १५ ते २० रुपये किलोदरम्यान कांदे व बटाटे विकले जात आहेत. अनेक ग्राहक १५ दिवस पुरतील एवढेच कांदे, बटाटे खरेदी करीत आहेत. येत्या काळात सतत पाऊस राहिला तर भाज्यांचे भाव वाढतील. जर अंतराने पाऊस पडत राहिला तर उत्पादन वाढून भाव कमी होतील, असे भाजी विक्रेत्यांनी सांगितले. 

पालेभाज्याही महागच पालेभाज्यांची आवकही कमी झाली आहे. जिथे औरंगपुरा भाजीमंडीत ४ ते ५ हजार गड्डी पालेभाज्या येतात तिथे सध्या १ ते दीड हजार गड्डी पालेभाज्या विक्रीसाठी येत आहे. परिणामी, पालेभाज्या महागल्या आहेत. सर्वात महाग मेथी २० रुपये गड्डी विकली जात आहे. गावरान कोथिंबीर, कांदापात १५ रुपये, तर पालक, चुका, शेपू या भाज्या प्रत्येकी १० रुपयांना मिळत आहेत. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादvegetableभाज्याRainपाऊस