शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

भाज्या महागल्याने महिलांचे बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 15:30 IST

पाणीटंचाईचा परिणाम भाजीपाला उत्पादनावर

ठळक मुद्देजिल्ह्यातून आवक झाली कमीनाशिक, पुण्याहून येताहेत बहुतांश भाज्या

औरंगाबाद : श्रावण घेवडा ८० रुपये, हिरवी मिरची ८० रुपये, वांगे, गवार, भेंडी ६० रुपये प्रतिकिलो हे भाव ऐकले की, सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होत आहेत. शहरात येणाऱ्या बहुतांश भाज्या नाशिक, पुण्याहून आणल्या जात आहेत. आवक कमी झाल्याने भाज्या महागल्या आहेत. सर्वसामान्य महिलांचे बजेट कोलमडले आहे. 

पाणीटंचाईने भाजीपाल्याच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. जिल्ह्यातूनच आवक कमी होत असल्याने अडत व्यापारी नाशिक, पुण्याहून भाज्या मागवीत आहेत. आवक कमी व मागणी जास्त असल्याने भाज्यांचे भाव वधारले आहेत. लिंबू ८० रुपये किलो, हिरवी मिरची ८० रुपये, टोमॅटो ५० ते ६० रुपये, पत्ताकोबी २० ते २५ रुपये, फुलकोबी ४० ते ५० रुपये, कारले ६० रुपये, दुधी भोपळा २५ ते ३० रुपये, तर शेवग्याच्या शेंगा ६० रुपये प्रतिकिलोने विकत आहेत. एवढेच नव्हे, तर लसूण व अद्रकच्या भावाने प्रतिकिलो १०० रुपयांचा आकडा गाठला आहे. हायब्रीड लसूण ८० ते गावरान लसून १०० रुपये किलोने विकत आहे. एरव्ही भाज्या स्वस्त झाल्या की, गल्लीबोळांतून फिरणाऱ्या हातगाड्या आता गायब झाल्या आहेत. कारण, हातगाडीवर महागड्या भावात ग्राहक भाज्या खरेदी करीत नाहीत. त्यासाठी ग्राहक परिसरातील भाजीमंडीतच जात आहेत. हातगाड्यावर लसूण विक्रीला येत आहे. मात्र, गावरान म्हणून ग्राहकांना हायब्रीड लसूण दिला जात आहे. १५ ते २० रुपये किलोदरम्यान कांदे व बटाटे विकले जात आहेत. अनेक ग्राहक १५ दिवस पुरतील एवढेच कांदे, बटाटे खरेदी करीत आहेत. येत्या काळात सतत पाऊस राहिला तर भाज्यांचे भाव वाढतील. जर अंतराने पाऊस पडत राहिला तर उत्पादन वाढून भाव कमी होतील, असे भाजी विक्रेत्यांनी सांगितले. 

पालेभाज्याही महागच पालेभाज्यांची आवकही कमी झाली आहे. जिथे औरंगपुरा भाजीमंडीत ४ ते ५ हजार गड्डी पालेभाज्या येतात तिथे सध्या १ ते दीड हजार गड्डी पालेभाज्या विक्रीसाठी येत आहे. परिणामी, पालेभाज्या महागल्या आहेत. सर्वात महाग मेथी २० रुपये गड्डी विकली जात आहे. गावरान कोथिंबीर, कांदापात १५ रुपये, तर पालक, चुका, शेपू या भाज्या प्रत्येकी १० रुपयांना मिळत आहेत. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादvegetableभाज्याRainपाऊस