शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

भाज्या महागल्याने महिलांचे बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 15:30 IST

पाणीटंचाईचा परिणाम भाजीपाला उत्पादनावर

ठळक मुद्देजिल्ह्यातून आवक झाली कमीनाशिक, पुण्याहून येताहेत बहुतांश भाज्या

औरंगाबाद : श्रावण घेवडा ८० रुपये, हिरवी मिरची ८० रुपये, वांगे, गवार, भेंडी ६० रुपये प्रतिकिलो हे भाव ऐकले की, सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होत आहेत. शहरात येणाऱ्या बहुतांश भाज्या नाशिक, पुण्याहून आणल्या जात आहेत. आवक कमी झाल्याने भाज्या महागल्या आहेत. सर्वसामान्य महिलांचे बजेट कोलमडले आहे. 

पाणीटंचाईने भाजीपाल्याच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. जिल्ह्यातूनच आवक कमी होत असल्याने अडत व्यापारी नाशिक, पुण्याहून भाज्या मागवीत आहेत. आवक कमी व मागणी जास्त असल्याने भाज्यांचे भाव वधारले आहेत. लिंबू ८० रुपये किलो, हिरवी मिरची ८० रुपये, टोमॅटो ५० ते ६० रुपये, पत्ताकोबी २० ते २५ रुपये, फुलकोबी ४० ते ५० रुपये, कारले ६० रुपये, दुधी भोपळा २५ ते ३० रुपये, तर शेवग्याच्या शेंगा ६० रुपये प्रतिकिलोने विकत आहेत. एवढेच नव्हे, तर लसूण व अद्रकच्या भावाने प्रतिकिलो १०० रुपयांचा आकडा गाठला आहे. हायब्रीड लसूण ८० ते गावरान लसून १०० रुपये किलोने विकत आहे. एरव्ही भाज्या स्वस्त झाल्या की, गल्लीबोळांतून फिरणाऱ्या हातगाड्या आता गायब झाल्या आहेत. कारण, हातगाडीवर महागड्या भावात ग्राहक भाज्या खरेदी करीत नाहीत. त्यासाठी ग्राहक परिसरातील भाजीमंडीतच जात आहेत. हातगाड्यावर लसूण विक्रीला येत आहे. मात्र, गावरान म्हणून ग्राहकांना हायब्रीड लसूण दिला जात आहे. १५ ते २० रुपये किलोदरम्यान कांदे व बटाटे विकले जात आहेत. अनेक ग्राहक १५ दिवस पुरतील एवढेच कांदे, बटाटे खरेदी करीत आहेत. येत्या काळात सतत पाऊस राहिला तर भाज्यांचे भाव वाढतील. जर अंतराने पाऊस पडत राहिला तर उत्पादन वाढून भाव कमी होतील, असे भाजी विक्रेत्यांनी सांगितले. 

पालेभाज्याही महागच पालेभाज्यांची आवकही कमी झाली आहे. जिथे औरंगपुरा भाजीमंडीत ४ ते ५ हजार गड्डी पालेभाज्या येतात तिथे सध्या १ ते दीड हजार गड्डी पालेभाज्या विक्रीसाठी येत आहे. परिणामी, पालेभाज्या महागल्या आहेत. सर्वात महाग मेथी २० रुपये गड्डी विकली जात आहे. गावरान कोथिंबीर, कांदापात १५ रुपये, तर पालक, चुका, शेपू या भाज्या प्रत्येकी १० रुपयांना मिळत आहेत. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादvegetableभाज्याRainपाऊस