नेपाळमध्ये एक महिला सुरक्षित
By Admin | Updated: April 28, 2015 00:27 IST2015-04-28T00:13:32+5:302015-04-28T00:27:55+5:30
जालना : नेपाळ व उत्तर भारतात झालेल्या भुकंपात अडकलेल्या व्यक्तींमध्ये जालन्यातील महिला शांताबाई कचरूलाल नवलखा (वय ६५, रा. महिको कॉलनी, जालना) यांचा समावेश असून

नेपाळमध्ये एक महिला सुरक्षित
जालना : नेपाळ व उत्तर भारतात झालेल्या भुकंपात अडकलेल्या व्यक्तींमध्ये जालन्यातील महिला शांताबाई कचरूलाल नवलखा (वय ६५, रा. महिको कॉलनी, जालना) यांचा समावेश असून त्या सुखरूप असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी जिल्हा प्रशासनाकडे दिली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा प्रशासनाकडून नेपाळमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. मनोजकुमार कुंकुलोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मामी शांताबाई नवलखा या औरंगाबाद येथील नातेवाईक शशिकांत बोरा, त्यांच्या पत्नी तसेच जीपचालक हे जैन आचार्य महाश्रमणी यांच्या सेवेकरीता काठमांडू येथे गेलेले आहेत. सध्या ते सुखरूप असून त्यांच्याशी २७ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता संपर्क झाल्याची माहिती कुंकुलोळ यांनी दिली. शांताबाई व अन्य सदस्य सध्या ज्योती निवास जैन भवनजवळ काठमांडू येथे आहेत. त्यांना परतीकरीता कोणतेही साधन उपलब्ध नसल्याचे जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)