शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

महिन्याभरात मृतसाठयातील जायकवाडी धरण ७६ टक्क्यांवर, आज माजलगावसाठी केला विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 18:27 IST

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७५.९ टक्क्यावर पोहोचला आहे.

- दादासाहेब गलांडेपैठण ( बीड) : जायकवाडीच्या नाथसागर धरणाची परिस्थिती जुलै  महिन्यात अगदी मृत साठ्यात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र ऑगस्ट महिन्यात नाशिकसह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्याप्रमाणावर आवक वाढली. यामुळे आज धरणाचा पाणीसाठा आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७५.९ टक्क्यावर पोहोचला आहे. दरम्यान, वाढती आवक लक्षात घेऊन शून्य टक्के पाणी असलेल्या माजलगाव धरणात उजव्या कालव्यातून दुपारी १ वाजता १०० क्युसेक विसर्ग करण्यात आल्याची माहिती आहे. 

पाणलोट क्षेत्रात झालेला मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि वरच्या भागातील नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण भरल्याने जायकवाडी धरणात आवक वाढली. यामुळे जुलै महिन्यात मृतसाठ्यात असलेलले जायकवाडी धरण ऑगस्ट महिना संपतासंपता ७५.९ टक्क्याच्या पुढे गेले आहे. आता येणाऱ्या पाण्याची आवक थोडी मंदावली असून ४६ हजार ६८२ क्युसेकने पाणी धरणात येत आहे.  दरम्यान, माजलगावच्या ३२ टीएमसीच्या धरणासाठी जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून दुपारी एक वाजता शंभर क्युसेकने पाणी सोडण्यात आले. तसेच रात्रीतून हळूहळू पाण्याचा वेग वाढवला जाणार असल्याचे शाखा अभियंता विजय काकडे म्हणाले.

जायकवाडी नाथसागर धरण शंभरीकडे वाटचाल करीत आहे. धरणाची पातळी १५२२ फूट आहे. आज रोजी पाणी पातळी १५१७.६९ फूट झाली आहे. माजलगाव धरण ३२ टीएमसीचे आहे. माजलगाव धरण 0% टक्क्यावर असल्यामुळे आज दुपारी १ वाजता जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून १०० क्युसेकने पाणी  सोडण्यात आले आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणMajalgaon Damमाजलगाव धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबाद