शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
6
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
7
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
8
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
9
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
10
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
11
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
12
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
13
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
14
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
15
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
16
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
17
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
18
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
19
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
20
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...

औरंगाबादच्या मोरे कुटुंबीयांनी प्राणपणाने जपल्या आहेत बाबासाहेबांच्या अस्थी

By स. सो. खंडाळकर | Updated: December 6, 2022 13:18 IST

''डॉ. बाबासाहेबांच्या अस्थींचे दर्शन सर्वांना घेता यावे, हीच आमची इच्छा आहे.''

- स. सो. खंडाळकर

औरंगाबाद : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी औरंगाबादच्या मोरे कुटुंबीयांनी प्राणपणाने जपून ठेवल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नियोजित संशोधन केंद्र व वस्तुसंग्रहालयात सन्मानपूर्वक या अस्थी ठेवण्याची या कुटुंबीयांची इच्छा आहे. पण ती कधी फलद्रूप होईल, हे मात्र अनिश्चित आहे. कारण तत्कालीन कुलगुरू बी.ए. चोपडे यांनी पुढाकार घेतलेला हा प्रकल्प थंड्या बस्त्यातच आहे. हे संग्रहालय होणार की नाही, संघर्षातून मिळवलेल्या बाबासाहेबांच्या नावाच्या विद्यापीठात हे संग्रहालय होणार नसेल तर याला काय म्हणावे, असे सारेच प्रश्न अनुत्तरित आहेत. आंबेडकरवादी संघटनांनी त्यात लक्ष घालण्याची गरज आहे.

डॉ. बाबासाहेबांच्या अस्थींचे दर्शन सर्वांना घेता यावे, हीच आमची इच्छा आहे. ६ डिसेंबरला या अस्थिदर्शनासाठी परभणीत असतील. ज्ञानमंदिर उभारून तेथून संशोधक व अभ्यासकांनी विद्यार्जन करावे, अशीच वडील भाऊसाहेब मोरे यांची इच्छा होती, असे वरिष्ठ अधिकारी असलेले प्रवीण मोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

शपथ घेतली होती.....६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे दिल्लीत निधन झाले. १९५६ साली ९ डिसेंबरला अहमदनगर येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा झाली. यावेळी बाबासाहेबांचे प्रमुख अनुयायी उपस्थित होते. ‘समाज एकसंध ठेवू, विभक्त होऊ देणार नाही, फूट पडू देणार नाही, बाबासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहू’ अशी शपथ घेण्यात आली होती.

मंडळाने अस्थी सुपूर्द केल्या होत्या......डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मंडळ नेमण्यात आले. मखमली कापडात गुंडाळलेल्या बाबासाहेबांच्या अस्थी फेडरेशनच्या सर्व प्रांताध्यक्षांना सुपूर्द करण्यात आल्या. यात मराठवाड्याचे प्रांताध्यक्ष भाऊसाहेब मोरे, नाशिकचे अध्यक्ष दादासाहेब गायकवाड, मुंबई प्रांताचे अध्यक्ष बी. सी. कांबळे, अहमदनगरचे अध्यक्ष दादासाहेब रोहम, नागपूर- चंद्रपूर-भंडाऱ्याचे बॅ. राजाभाऊ खोब्रागडे, पुण्याचे पी. एन. राजभोज, साताऱ्याचे प्रांताध्यक्ष आर. डी. भांगरे, बी. पी. मौर्य यांना या अस्थी सोपविण्यात आल्या होत्या. या सर्वांनी या अस्थी जिवापाड जपल्या.

‘जय भीम’चा नारा.....भाऊसाहेब मोरे यांनी तर कन्नडच्या मकरणपूर येथे त्या काळात बाबासाहेबांच्या सभेेचे नियोजन केले होते व तेथे ‘ जय भीम’चा नारा बुलंद केला होता. आज हा नारा किती जिवाभावाचा झाला आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरAurangabadऔरंगाबाद