शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

औरंगाबादच्या मोरे कुटुंबीयांनी प्राणपणाने जपल्या आहेत बाबासाहेबांच्या अस्थी

By स. सो. खंडाळकर | Updated: December 6, 2022 13:18 IST

''डॉ. बाबासाहेबांच्या अस्थींचे दर्शन सर्वांना घेता यावे, हीच आमची इच्छा आहे.''

- स. सो. खंडाळकर

औरंगाबाद : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी औरंगाबादच्या मोरे कुटुंबीयांनी प्राणपणाने जपून ठेवल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नियोजित संशोधन केंद्र व वस्तुसंग्रहालयात सन्मानपूर्वक या अस्थी ठेवण्याची या कुटुंबीयांची इच्छा आहे. पण ती कधी फलद्रूप होईल, हे मात्र अनिश्चित आहे. कारण तत्कालीन कुलगुरू बी.ए. चोपडे यांनी पुढाकार घेतलेला हा प्रकल्प थंड्या बस्त्यातच आहे. हे संग्रहालय होणार की नाही, संघर्षातून मिळवलेल्या बाबासाहेबांच्या नावाच्या विद्यापीठात हे संग्रहालय होणार नसेल तर याला काय म्हणावे, असे सारेच प्रश्न अनुत्तरित आहेत. आंबेडकरवादी संघटनांनी त्यात लक्ष घालण्याची गरज आहे.

डॉ. बाबासाहेबांच्या अस्थींचे दर्शन सर्वांना घेता यावे, हीच आमची इच्छा आहे. ६ डिसेंबरला या अस्थिदर्शनासाठी परभणीत असतील. ज्ञानमंदिर उभारून तेथून संशोधक व अभ्यासकांनी विद्यार्जन करावे, अशीच वडील भाऊसाहेब मोरे यांची इच्छा होती, असे वरिष्ठ अधिकारी असलेले प्रवीण मोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

शपथ घेतली होती.....६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे दिल्लीत निधन झाले. १९५६ साली ९ डिसेंबरला अहमदनगर येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा झाली. यावेळी बाबासाहेबांचे प्रमुख अनुयायी उपस्थित होते. ‘समाज एकसंध ठेवू, विभक्त होऊ देणार नाही, फूट पडू देणार नाही, बाबासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहू’ अशी शपथ घेण्यात आली होती.

मंडळाने अस्थी सुपूर्द केल्या होत्या......डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मंडळ नेमण्यात आले. मखमली कापडात गुंडाळलेल्या बाबासाहेबांच्या अस्थी फेडरेशनच्या सर्व प्रांताध्यक्षांना सुपूर्द करण्यात आल्या. यात मराठवाड्याचे प्रांताध्यक्ष भाऊसाहेब मोरे, नाशिकचे अध्यक्ष दादासाहेब गायकवाड, मुंबई प्रांताचे अध्यक्ष बी. सी. कांबळे, अहमदनगरचे अध्यक्ष दादासाहेब रोहम, नागपूर- चंद्रपूर-भंडाऱ्याचे बॅ. राजाभाऊ खोब्रागडे, पुण्याचे पी. एन. राजभोज, साताऱ्याचे प्रांताध्यक्ष आर. डी. भांगरे, बी. पी. मौर्य यांना या अस्थी सोपविण्यात आल्या होत्या. या सर्वांनी या अस्थी जिवापाड जपल्या.

‘जय भीम’चा नारा.....भाऊसाहेब मोरे यांनी तर कन्नडच्या मकरणपूर येथे त्या काळात बाबासाहेबांच्या सभेेचे नियोजन केले होते व तेथे ‘ जय भीम’चा नारा बुलंद केला होता. आज हा नारा किती जिवाभावाचा झाला आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरAurangabadऔरंगाबाद