शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

सहा महिन्यांत ‘लम्पी’ने दगावली २७६ जनावरे; २०० पशुपालकांना अर्थसहाय्याची प्रतीक्षा

By विजय सरवदे | Published: October 23, 2023 6:20 PM

‘लम्पी’ साथ आता नियंत्रणात; या रोगावर नियंत्रण मिळविण्यात पशुसंवर्धन विभागाला बऱ्यापैकी यश आले आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात लम्पी हा विषाणूजन्य त्वचारोग आता नियंत्रणात आला आहे. जिल्हाभरात सध्या २९८ जनावरे बाधित असून, गेल्या सहा महिन्यांत बाधित २७६ गोवंशीय जनावरे दगावली आहेत. यापैकी ७१ पशुपालकांना १६ लाख ३९ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे.असे असले तरी आणखी सुमारे २०० पशुपालक अर्थसहाय्यासाठी रांगेतच आहेत.

‘लम्पी’मुळे दगावलेल्या गोवंशीय पशुधनाच्या पालकांना शासनाने ३१ मार्चनंतर अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया थांबविली होती. मात्र, राज्यभरात ‘लम्पी’चा प्रादुर्भाव वाढल्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. त्यानंतर अर्थसहाय्य सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. साधारणपणे सप्टेंबर २०२२ पासून ‘लम्पी’ने संपूर्ण जिल्हा कवेत घेतला होता. यामुळे १२ हजारांहून अधिक जनावरे बाधित झाली. त्यापैकी १ हजार ३१९ जनावरे दगावली. उद्भवलेल्या लम्पी आजारावर नियंत्रण आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने गोठ्यांची स्वच्छता, फवारणी तसेच युद्धपातळीववर लसीकरणाची मोहीम हाती घेतली. आता पाऊस कमी झाल्यामुळे गोमाशा आणि गोचिडाचे प्रमाणही कमी झाले असून, पशुपालकांमध्ये जागृती आली आहे. त्यामुळे या रोगावर नियंत्रण मिळविण्यात पशुसंवर्धन विभागाला बऱ्यापैकी यश आले आहे. दरम्यान, रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी जनावरांना पौष्टिक चारा द्यावा, बाधित जनावरांना क्वारंटाइन (विलगीकरण) करावे. गोठे स्वच्छ ठेवावेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त प्रदीप झोड यांनी केले आहे.

समितीसमोर १२० प्रस्ताव सादर ‘लम्पी’मुळे मयत गाईसाठी ३० हजार रुपये, बैलाचा मृत्यू झाल्यास २५ हजार, तर वासराचा मृत्यू झाल्यास १६ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य संबंधित पशुपालकांना देण्यात येते. गेल्या सहा महिन्यांत दगावलेल्या गोवंश पशुधनाचे अर्थसहाय्याचे ७१ प्रस्ताव मंजूर झाले असून, संबंधित पशुपालकांच्या बँक खात्यात १६ लाख ३९ हजार रुपयांचे अर्थसहाय्य जमा करण्यात आले. उर्वरित १२० प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष असलेल्या समितीसमोर सादर करण्यात आले आहेत, तर ८० ते ८५ प्रस्तावांची छाननी सुरू आहे. तालुकास्तरावरून जसजसे प्रस्ताव प्राप्त होतील, त्यानुसार परिपूर्ण प्रस्ताव मंजुरीसाठी समितीसमोर सादर करण्यात येतात.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी