शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नाथजलसाठी अधिकचे पाच रुपये नाही दिले तर गरम पाणी देणार का? प्रवाशांच्या खिशाला कात्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 12:50 IST

'नाथजल' या एसटी महामंडळाच्या अधिकृत बाटलीबंद पाण्याची किंमत १५ रुपये असली तरी ही बॉटल बसस्थानकांमध्ये सर्रास २० रुपयांत विकली जाते.

छत्रपती संभाजीनगर : उन्हाचा चटका वाढत असून, प्रवासादरम्यान बाटलीबंद पाणी घेऊन प्रवासी तहान भागवितात. परंतु थंड पाण्यासाठी प्रवाशांना ‘एमआरपी’पेक्षा ५ रुपये अधिक मोजावे लागत असल्याची स्थिती बसस्थानक आणि रेल्वेस्टेशनवर पाहायला मिळाली.

'नाथजल' या एसटी महामंडळाच्या अधिकृत बाटलीबंद पाण्याची किंमत १५ रुपये असली तरी ही बॉटल बसस्थानकांमध्ये सर्रास २० रुपयांत विकली जाते. अधिक पैसे आकारण्याविषयी विक्रेत्यांना विचारल्यानंतर थंड करण्यासाठी ५ रुपये अधिक लागत असल्याचे सांगितले जाते. हे ५ रुपये दिले नाही तर मग उन्हाळ्यात प्रवाशांना गरम पाणी देणार का, असा सवाल प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.

१५ ची बॉटल २० रुपयांनारेल्वेस्थानक : रेल्वेस्टेशनवर १५ रुपये ‘एमआरपी’ असलेल्या पाणी बाटलीसाठी २० रुपये आकारण्यात आले. अधिक रक्कम घेण्यावरून जाब विचारल्यानंतर विक्रेत्याने ५ रुपये परत केले.

बसस्थानक : मध्यवर्ती बसस्थानकात 'नाथजल' या १५ रुपयांच्या बाटलीसाठी २० रुपये आकारण्यात आले. ५ रुपये परत देण्याची मागणी करण्यात आल्यानंतर थंड पाण्यासाठी ५ रुपये अधिक लागतात, असे विक्रेत्याने सांगितले.

म्हणे बाटली थंड करण्याचे पाच रुपयेमध्यवर्ती बसस्थानकावर ‘नाथजल’साठी ५ रुपये अतिरिक्त का घेतले, अशी विचारणा केली असता, थंड बाटलीसाठी ५ रुपये अधिक लागतात. थंड नसलेली बाटली १५ रुपयांतच देतो, असे विक्रेत्याने सांगितले.

तक्रार कोठे करायची?बसस्थानकात पाण्याच्या बाटलीसाठी ‘एमआरपी’पेक्षा जास्त रक्कम घेतल्याबाबत स्थानकप्रमुख, आगार व्यवस्थापकांकडे तक्रार करता येते. रेल्वेस्टेशनवर स्टेशन मॅनेजरकडे तक्रार करता येईल.

कारवाई केली जाईलरेल्वेस्टेशनवर ‘एमआरपी’नुसारच पाणी विकले जावे, यासाठी आम्ही विक्रेत्यांना वेळावेळी सूचना देतो. प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे घेतल्यास कडक कारवाई केली जाईल. अधिक पैसे आकारल्यास स्टेशनवरील अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे ‘दमरे’चे अधिकारी म्हणाले.

१५ ला देणे बंधनकारकनियमानुसार ‘नाथजल’ १५ रुपयांनाच विक्री केली पाहिजे. थंड बाटलीसाठी अतिरिक्त पैसे घेता कामा नये. यासंदर्भात संबंधित विक्रेत्यांना सक्त सूचना केली जाईल.- संगीता सूर्यवंशी, आगार व्यवस्थापक, मध्यवर्ती बसस्थानक

टॅग्स :Waterपाणीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर