विद्यापीठाला भूमिपुत्र कुलगुरूमिळणार का?
By Admin | Updated: May 29, 2014 01:13 IST2014-05-29T01:05:42+5:302014-05-29T01:13:59+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी २९ आणि ३० मे रोजी मुंबई विद्यापीठात मुलाखती होत आहेत.

विद्यापीठाला भूमिपुत्र कुलगुरूमिळणार का?
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी २९ आणि ३० मे रोजी मुंबई विद्यापीठात मुलाखती होत आहेत. या मुलाखतीसाठी देशभरातून २९ तज्ज्ञांना बोलावण्यात आलेले असून, त्यात येथील विद्यापीठातील सात जणांचा समावेश आहे. दरम्यान, कुलगुरू निवडीकडे मराठवाड्यातील शिक्षणक्षेत्रातील मंडळींचे लक्ष लागले आहे. भूमिपुत्र कुलगुरू व्हावा, अशी अपेक्षा प्राध्यापक आणि कर्मचारी व विद्यार्थी संघटनांनी व्यक्त केली आहे. तर काहींनी तज्ज्ञ आणि जाणकार, निर्भीड कुलगुरूची निवड करण्याची मागणी केली आहे. कुलगुरूपदी भूमिपुत्र अथवा अन्य मराठवाड्याबाहेरील व्यक्तीची निवड होते, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांनी न्यायमूर्ती सी. के. ठक्कर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीचे सदस्य सचिव म्हणून शिक्षण विभागाचे सचिव संजयकुमार, विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून परवीरसिंग आहुजा आहेत. २९ आणि ३० मे रोजी पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम मुंबई विद्यापीठातील कलिना सभागृहात होणार आहे. त्यासाठी त्यांना गुरुवारी सकाळी ९ वाजता बोलाविण्यात येणार आहे. मुलाखतीनंतर निवड समिती पाच व्यक्तींच्या नावाचा बंद लिफाफा राज्यपालांकडे सादर करतात. इच्छुक प्राध्यापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रा. डॉ. देवानंद शिंदे, डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. वि. ल. धारूरकर, डॉ. व्ही. बी. भिसे, डॉ. बी. एस. वाघमारे, डॉ. वाय. के. खिल्लारे, डॉ. एम. बी. मुळे हे प्राध्यापक कुलगुरूपदासाठी इच्छुक आहेत.