शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिपीठ महामार्गाचे घोडे मोबदल्यावर अडणार का? संभ्रम पसरला

By विकास राऊत | Updated: July 29, 2025 16:27 IST

समृद्धी महामार्गाला जमीन देणाऱ्यांना वाटाघाटीने दिली होती रक्कम

छत्रपती संभाजीनगर : शक्तिपीठ या नवीन महामार्गासाठी जमीनमालकांना २०१३ चा भूसंपादन कायदा आणि महाराष्ट्र हायवे ॲक्टनुसार मोबदला दिला जाईल. तसेच, या मार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असल्याने २५ टक्के अतिरिक्त रक्कम संमती देणाऱ्यास अदा करण्याचा दावा करण्यात येत असला, तरी याबाबत सार्वजनिकरीत्या कोणतीही स्पष्टता एमएसआरडीसी आणि महसूल प्रशासनाने जाहीर केलेली नाही. प्रशासकीय पातळीवर बैठकांचा सोपस्कार सुरू असून, मोबदल्याबाबत स्पष्टता नसल्यामुळे शक्तिपीठाचे घोडे अडते की काय, अशी परिस्थिती आहे.

हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव या सहा जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार आहे. सुमारे ५०० एकर जमीन या जिल्ह्यांतून संपादित करावी लागेल.

‘समृद्धी’साठी भूसंपादन कसे केले होते ?भूसंपादनासाठी भूमी अधिग्रहण कायदा २०१३ लागू करून मोबदला दिला गेला. सरासरी बाजारभावाच्या २ ते ४ पट दर होता. जमीन कुठल्या उपयोगासाठी आहे (शेती, निवासी, व्यावसायिक) याचा विचार केला गेला. मागील ३ वर्षांत त्या भागातील नोंदणीकृत झालेले खरेदी-विक्री व्यवहारही लक्षात घेतले गेले होते. जमीनमालकाच्या खात्यात थेट एनईएफटी, आरटीजीएसद्वारे पैसे गेले. मंजूर यादीनुसार, प्रत्येक मालकाला त्याच्या क्षेत्रफळाप्रमाणे रक्कम दिली. जी जमीन संमतीने दिली गेली होती, तसे लिखित करार झाले. अनेक ठिकाणी फेरफार, वारसांमध्ये वाद, जमीन कागदपत्रांची कमतरता, बोगस दस्तऐवज, चुकीचा बाजारभाव, दलालांच्या मध्यस्थीमुळे शेतकऱ्यांना योग्य रक्कम मिळाली नाही. तसेच, निवाड्याने घेतलेल्या जमिनींची काही प्रकरणे न्यायालयात गेली.

एमएसआरडीसीचीचे म्हणणे...समृद्धीप्रमाणेच शक्तिपीठसाठी भूसंपादन होईल. २०१३ आणि महाराष्ट्र हायवे ॲक्टनुसारच प्रक्रिया होणार आहे. समृद्धीच्या वेळी असलेले जमिनीचे दर आणि आजचे दर यात फरक आहे. कायद्यात अनेक तरतुदी आहेत. भूसंपादन एसडीएम किती सकारात्मकरीत्या काम करतील, त्यावर भूसंपादन प्रक्रियेचे भविष्य अवलंबून आहे, असे एमएसआरडीसी सूत्रांनी सांगितले.

हा मार्ग कशासाठी ?शेतकऱ्यांना खरी गरज महामार्गाची नसून शाश्वत पाण्याची आहे. रत्नागिरी ते कोल्हापूर महामार्ग असताना हा मार्ग कशासाठी, असा प्रश्न आहे. सरकारला खरेच शेतकरी समृद्ध करायचा असेल, तर जिल्ह्यासाठी ५ हजार कोटी रुपये पाण्यासाठी उपलब्ध करून द्यावेत.- अभिजीत देशमुख, बेगडा, धाराशिव

उपजीविकेचा प्रश्नशक्तिपीठ महामार्गासाठी आमची ५ एकर जमीन संपादित होणार आहे. ही जमीन सिंचनाखालील असून, त्यात पारंपरिक पिके, तसेच भाजीपाला पिकवितो. ही जमीन महामार्गात गेल्यास कुटुंबातील ९ जणांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे.- संभाजी फरताडे, मेडसिंगा, धाराशिव

टॅग्स :Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गMarathwadaमराठवाडा